शहरं
Join us  
Trending Stories
1
“NDAत येण्यासाठी उद्धव ठाकरेंचा PM मोदींना अनेक लोकांच्या माध्यमातून मेसेज”; शिंदे गटाचा दावा
2
OMA vs NAM : नामिबियाचा 'सुपर' विजय! ओमानची कडवी झुंज; केवळ ११० धावा पण सामना गाजला
3
Exit Poll सुद्धा 'कन्फ्युज'! महाराष्ट्राचा नेमका कौल असणार तरी काय?
4
Share Market : शेअर बाजाराला 'एक्झिट पोल'चा बूस्टर; सेन्सेक्समध्ये २६०० अंकांपेक्षा अधिक तेजी
5
"EVM मध्ये छेडछाड झाली नाही तर हिमाचलमधील चारही जागा काँग्रेसला मिळतील"
6
जून ते सप्टेंबर ९९टक्के पाऊस; कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज
7
NAM vs OMA : WHAT A MATCH! ओमानने नामिबियाच्या तोंडचा घास पळवला, Super Over मध्ये निकाल
8
अनेक वर्षे होती सत्ता, पण या राज्यात काँग्रेसला उमेदवारा मिळेनात, ४१ जागांवर केलं सरेंडर
9
लग्नमंडपात पसरली शोककळा; मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू, 15 जखमी
10
मध्यरात्री लपून झाडांची कत्तल केल्याप्रकरणी पाेलिसांकडून पुण्यातील गेरा बिल्डरवर गुन्हा
11
'येऊ कशी तशी मी नांदायला' फेम अभिनेता झाला बाबा, चाहत्यांकडून अभिनंदन
12
आजचे राशीभविष्य: सरकारी लाभ, यश-कीर्ती वृद्धी; पद-प्रतिष्ठा वाढ, सुखकारक दिवस
13
शिव ठाकरे डेझी शाहसोबत करणार लग्न?, अखेर अभिनेत्रीनं सोडलं मौन
14
Godfrey Phillipsचे कार्यकारी संचालक समीर मोदी यांनी आईवरच केला हल्ल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
15
Exit Polls चा परिणाम : आज 'मोदी स्टॉक्स'मध्ये दिसू शकते तेजी, काय म्हणताहेत एक्सपर्ट्स? जाणून घ्या
16
'या' चार राज्यांमध्ये मोठा उलटफेर होणार; भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता
17
"मला T20 World Cup बघायचाही नाही, जेव्हा मी...", रियान परागचं अनोखं विधान
18
प्रदोष शिवरात्रीचा शुभ संयोग: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता
19
पंचग्रही अद्भूत शुभ योग: ७ राशींना लाभ, लॉटरीची संधी; राजकारण्यांना यश, इच्छापूर्तीचा काळ!
20
मे महिन्यात देशभरात उष्माघाताचे ४६ बळी; तीन महिन्यांत ५६ मृत्यू, महाराष्ट्रात ११ जण मृत्युमुखी

इतवारी रेल्वे स्टेशनला ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ यांचे नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2023 10:57 PM

Nagpur News इतवारी रेल्वे स्टेशनला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव देण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संमतीनंतर राज्य सरकारने अधिसूचना जारी केली असून, हे स्टेशन नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने ओळखले जाईल.

 

नागपूर : इतवारी रेल्वे स्टेशनला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव देण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संमतीनंतर राज्य सरकारने अधिसूचना जारी केली असून, हे स्टेशन नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने ओळखले जाईल.

१६ जून रोजी सहसचिव सिद्धार्थ खरात यांच्या स्वाक्षरीने जारी अधिसूचनेत असे म्हटले आहे की, नामांतरणाच्या प्रस्तावाला केंद्रीय गृहमंत्रालयाने २३ मे रोजी नाहरक प्रमाणपत्र जारी केले आहे. याचा आधार घेत राज्य सरकारने इतवारी रेल्वे स्टेशनला आता नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्टेशन असे नाव देण्याचे निर्देशित केले आहे. यासोबतच सर्व शासकीय कार्यालयांना दस्तावेजांमध्ये बदललेल्या नावानुसार दुरुस्ती करण्याचे निर्देशही या अध्यादेशात देण्यात आले आहेत. ही मागणी सातत्याने लावून धरणारे आमदार कृष्णा खोपडे यांनी राज्य सरकारच्या या अधिसूचनेचा हवाला देत सांगितले की, सोमवार दक्षिण मध्य पूर्व रेल्वे मंडल रेल प्रबंधक यांची भेट घेऊन नामांतरणासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्याची विनंती केली जाईल.

रेल्वे प्रशासन तूर्तास अनभिज्ञ

- दक्षिण मध्य पूर्व रेल्वे नागपूर मंडळाकडे रात्रीपर्यंत या संबंधात कुठलीही माहिती आली नव्हती. झोनचे मुख्य जनसंपर्क अधिकारी साकेत रंजन म्हणाले की, अद्याप अशी कुठलीही माहिती आलेली नाही. माहिती मिळताच कळविले जाईल.

 

असा आहे घटनाक्रम

वर्ष २०२२ : महापालिकेने एकमताने प्रस्ताव पारित केला.

२३ ऑगस्ट २०२२ : राज्य मंत्रिमंडळाने इतवारी स्टेशनला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला.

६ सप्टेंबर २०२२ : राज्य सरकारने केंद्राला प्रस्ताव पाठविला.

२३ मे २०२३ : केंद्रीय गृहमंत्रालयाने संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करून राज्याला नाहरकत प्रमाणपत्र पाठविले.

१६ जून २०२३ : राज्य सरकारने अधिसूचना जारी केली.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे