शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

इतवारी रेल्वे स्टेशनला ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ यांचे नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2023 22:58 IST

Nagpur News इतवारी रेल्वे स्टेशनला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव देण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संमतीनंतर राज्य सरकारने अधिसूचना जारी केली असून, हे स्टेशन नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने ओळखले जाईल.

 

नागपूर : इतवारी रेल्वे स्टेशनला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव देण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संमतीनंतर राज्य सरकारने अधिसूचना जारी केली असून, हे स्टेशन नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने ओळखले जाईल.

१६ जून रोजी सहसचिव सिद्धार्थ खरात यांच्या स्वाक्षरीने जारी अधिसूचनेत असे म्हटले आहे की, नामांतरणाच्या प्रस्तावाला केंद्रीय गृहमंत्रालयाने २३ मे रोजी नाहरक प्रमाणपत्र जारी केले आहे. याचा आधार घेत राज्य सरकारने इतवारी रेल्वे स्टेशनला आता नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्टेशन असे नाव देण्याचे निर्देशित केले आहे. यासोबतच सर्व शासकीय कार्यालयांना दस्तावेजांमध्ये बदललेल्या नावानुसार दुरुस्ती करण्याचे निर्देशही या अध्यादेशात देण्यात आले आहेत. ही मागणी सातत्याने लावून धरणारे आमदार कृष्णा खोपडे यांनी राज्य सरकारच्या या अधिसूचनेचा हवाला देत सांगितले की, सोमवार दक्षिण मध्य पूर्व रेल्वे मंडल रेल प्रबंधक यांची भेट घेऊन नामांतरणासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्याची विनंती केली जाईल.

रेल्वे प्रशासन तूर्तास अनभिज्ञ

- दक्षिण मध्य पूर्व रेल्वे नागपूर मंडळाकडे रात्रीपर्यंत या संबंधात कुठलीही माहिती आली नव्हती. झोनचे मुख्य जनसंपर्क अधिकारी साकेत रंजन म्हणाले की, अद्याप अशी कुठलीही माहिती आलेली नाही. माहिती मिळताच कळविले जाईल.

 

असा आहे घटनाक्रम

वर्ष २०२२ : महापालिकेने एकमताने प्रस्ताव पारित केला.

२३ ऑगस्ट २०२२ : राज्य मंत्रिमंडळाने इतवारी स्टेशनला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला.

६ सप्टेंबर २०२२ : राज्य सरकारने केंद्राला प्रस्ताव पाठविला.

२३ मे २०२३ : केंद्रीय गृहमंत्रालयाने संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करून राज्याला नाहरकत प्रमाणपत्र पाठविले.

१६ जून २०२३ : राज्य सरकारने अधिसूचना जारी केली.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे