शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
4
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
5
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
6
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
7
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
8
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
9
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
10
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
11
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
12
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
13
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
14
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
15
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
16
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
17
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
18
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
19
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
20
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका

गळ्यातील चेन मोडायची वेळ आली, हे ‘कसले ब्रेक द चेन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:07 IST

नागपूर : गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने लॉकडाऊन लावताना ‘ब्रेक द चेन’ ...

नागपूर : गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने लॉकडाऊन लावताना ‘ब्रेक द चेन’ अभियान सुरू केले. त्यामुळे सर्वच बाजारपेठांमधील दुकाने ५ एप्रिलच्या रात्रीपासून बंद आहेत. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांचे जगणे कठीण बनले आहे. गेले संपूर्ण वर्ष असेच गेल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांच्यावर गळ्यातील चेन मोडायची वेळ आली आहे आणि हे कसले ‘ब्रेक द चेन’ असा सवाल छोट्या व्यापाऱ्यांचा आहे.

गेल्यावर्षी २४ मार्चपासून केंद्र सरकारने लॉकडाऊन लावल्यानंतर तब्बल चार महिने दुकाने बंद होती. त्यामुळे नागपुरातील बाजारपेठांमध्ये जवळपास ३५०० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. व्यवसाय नाही, उत्पन्नही नाही, पण बँकांच्या कर्जाचे व्याज वाढले. शिवाय कामगारांचा पगार, विजेचे बिल, शासनाचा कर, जीएसटी आणि अन्य खर्च कायम होता. खर्चाची जुळवाजुळव कशी केली, याचे उत्तर व्यापाऱ्यांजवळ नाही.

पुन्हा एकदा मार्चमध्ये १६ ते ३० मार्चपर्यंत दुकाने दुपारी १ आणि दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवण्याचे बंधन घातले. शिवाय ५ एप्रिलच्या रात्रीपासून दुकाने बंद आहेत. त्याचा फटका छोट्या आणि मध्यम दुकानदारांना बसत आहे. त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कर्मचाऱ्यांना पगार देणे कठीण बनले आहे. ३० एप्रिलपर्यंत असलेल्या ‘ब्रेक द चेन’ने आणखी नुकसान होणार आहे. अनेकांनी दुकाने बंद केली आहेत. संसाराचा गाडा चालविण्यासाठी पुढे काय करावे, असा प्रश्न सर्वच व्यापाऱ्यांसमोर उभा आहे. केंद्र आणि राज्य शासनाचा लॉकडाऊन नकोच, असे व्यापारी म्हणाले.

घर कसे चालवायचे...

लॉकडाऊनमुळे व्यवसाय डबघाईस आला असून घर कसे चालवायचे, असा सवाल आहे. दुकान आणि घरचा मोठा खर्च आहे. शिवाय मुलांचे शिक्षण आणि अन्य खर्चाचा बोजा आहे. लॉकडाऊनने उत्पन्नाच्या वाटा बंद झाल्या आहेत.

- नलिनी वसानी, गृहिणी.

दुकान बंद, उत्पन्न बंद

लॉकडाऊनमध्ये कपड्याचे दुकान बंद झाल्याने उत्पन्नाचे साधन तुटले आहे. बँकांचे कर्ज, कर्मचाऱ्यांचा पगार व अन्य खर्चासह घरखर्चाचा भार वाढला आहे. उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त असल्याने जमा रक्कम संपायच्या मार्गावर आहे. शासनाने दुकाने सुरू करावीत.

- वासंती जैन, गृहिणी.

दुकान बंद करणे हाच उपाय

जनरल स्टोअर्स बंद असल्यानंतरही व्यापाऱ्यांची उधारी, बँकांचे कर्ज, कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर खर्च कायम आहे. बँकेतील ठेवीतून खर्च सुरू आहे. घरखर्च आणि मुलांच्या उच्च शिक्षणासाठी कसा खर्च करायचा, हा सवाल आहे.

- देवांगी राठी, गृहिणी.

जमा ठेवीतून खर्च

इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने बंद असल्याने उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. यंदा गुढीपाडव्याला व्यवसायाची अपेक्षा होती, पण त्यावरही पाणी फेरले गेले. मालाची उधारी द्यायला पैसे नाहीत. शिवाय घरखर्च आटोक्यात करावा लागत आहे.

- स्मिता खानोरकर, गृहिणी.

चार महिने सुरू राहिला व्यवसाय,

कर्ज कसे फेडायचे?

गेल्यावर्षी कोरोना लॉकडाऊनमुळे २४ मार्चला केंद्र सरकारने लॉकडाऊन लावला. त्यामुळे व्यवसाय पूर्णपणे बंद झाला. लॉकडाऊन जूनपर्यंत होता. त्यानंतर अनलॉक सुरू झाले. दिवाळीला व्यवसाय झाला. त्यानंतर व्यवसाय पुन्हा मंदीत आला. आता कुठे व्यवसाय सुरू झाला होता, तोच मार्चमध्ये दुकानांच्या वेळेवर बंधने आली. आता पुन्हा ५ एप्रिलच्या रात्रीपासून राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’ अभियान सुरू केले. त्यामुळे दुकाने पूर्णत: बंद आहेत. कर्ज कसे फेडायचे, अशी समस्या मध्यम आणि गरीब व्यापाऱ्यांसमोर उभी आहे.

जिल्ह्यात १२० दिवस सुरू राहिली दुकाने