शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

अपघात रोखण्यासाठी ‘आयडीटीआर’; नागपुरात उभारले जाणार १७.९० कोटींचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 10:15 IST

एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याने ते निश्चितच टाळता येतात. याला घेऊनच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नागपुरात वाहन चालक प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेला (आयडीटीआर) मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देचालकांना मिळेल ‘परफेक्ट ट्रेनिंग’ 

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्ता अपघातात दर सहा मिनिटाला एक व्यक्ती दगावते तर दर मिनिटाला एक व्यक्ती जखमी होते. ही संख्या कोणत्याही प्रकाराच्या आजाराने किंवा नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या जीवहानीपेक्षाही मोठी आहे. विशेष म्हणजे, एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याने ते निश्चितच टाळता येतात. याला घेऊनच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नागपुरात वाहन चालक प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेला (आयडीटीआर) मंजुरी दिली आहे. १७ कोटी ९० लाख रुपये खर्चून ही संस्था कोराडी मार्गावरील गोधनी येथे उभारली जाणार आहे. या संस्थेमधून वाहनचालकांना अत्याधुनिक यंत्राच्या मदतीने प्रशिक्षण दिले जाईल. भारतात दररोज सरासरी २५० माणसे वाहन अपघातात मृत्युमुखी पडतात. ७०० व्यक्ती रोज जखमी अथवा कायमच्या अपंग होतात. रस्ता अपघात टाळण्यासारखे असतानाही त्याकडे लक्ष दिले जात नाही. वेळ, वेग व वाहतुकीचे नियम यामधील संतुलन बिघडल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. अधिक गतीने वाहन चालविणे, चालविताना वाहतुकीचे नियम तोडणे हल्ली ‘फॅशन’ झाली आहे, परंतु हीच ‘फॅशन’ जीवावर बेतणारी ठरत आहे. अपघातात एखादा तरुण मृत्युमुखी पडला, तर केवळ एक व्यक्ती जीव गमावत नाही, तर त्याचे सारे कुटुंब मृत्युमुखी पडते. त्याची वैयक्तिक चूक पुढील सारा अनर्थ घडविते. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘आयडीटीआर’ महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषत: राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांच्या चुका दाखवून त्या दुरुस्त करण्याचे कार्य या संस्थेतून चालणार आहे. आरटीओ नागपूरकडून गेल्या दोन वर्षांपासून या संस्थेच्या उभारणीसाठी प्रयत्न सुरू होते. अखेर केंद्राने नुकतीच याला मंजुरी देऊन १७ कोटी ९० लाख ५ हजार ८४२ रुपयांच्या खर्चाला मान्यता दिल्याचे पत्र प्राप्त झाले आहे.

२० टक्के अपघात कमी होण्याची शक्यतानागपूरच्या ‘आयडीटीआर’ या संस्थेत शासकीय वाहनचालकांसोबतच खासगी वाहन चालकांनादेखील प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्याची सोय राहणार आहे. विदर्भातील आगारातील वाहनचालकांना या ठिकाणी पाचारण करून त्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणामुळे आणि मार्गदर्शनामुळे २० टक्के अपघात कमी होण्याची शक्यता आहे.

काय आहे ‘आयडीटीआर’‘आयडीटीआर’ ही अत्याधुनिक यंत्राच्या साहाय्याने चालकांच्या वेगवेगळ्या चाचण्यात घेऊन त्यांना वाहन चालविण्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणारी संस्था आहे. या ठिकाणी वाहनचालकांच्या डोळ्यांच्या तपासणीपासून ते वाहनावर नियंत्रण मिळवणे, ‘रिअ‍ॅक्शन टेस्ट’ उपलब्ध करून दिले जाते. साधारण ५० चालकांचा एक गट तयार करून हे प्रशिक्षण दिले जाते.

वाहन चालविण्याचे पक्के लायसन्स मिळाल्यानंतरही अपघात होतात, कारण वाहनचालकांना आपल्या चुका कळत नाही, किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात. ‘आयडीटीआर’मधून वाहनचालकांच्या चुका दाखवून त्या दुरुस्त करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. परिणामी, संभावित अपघात टळतील, अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.-शरद जिचकार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा