शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

बीएडच्या जागी ‘आयटीईपी’; शिक्षकांसाठी चार वर्षांचा अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 11:19 IST

शिक्षक बनण्यासाठी आता विद्यार्थ्यांना बीएड अथवा डीएलएड करण्याची आवश्यकता नाही. राष्ट्रीय शिक्षक शिक्षा परिषद (एनसीटीई)ने नव्या शैक्षणिक सत्रापासून बॅचलर आॅफ एज्युकेशन (बीएड) अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देएनसीटीईच्या प्रस्तावाची विद्यापीठाला प्रतीक्षा

आशीष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षक बनण्यासाठी आता विद्यार्थ्यांना बीएड अथवा डीएलएड करण्याची आवश्यकता नाही. राष्ट्रीय शिक्षक शिक्षा परिषद (एनसीटीई)ने नव्या शैक्षणिक सत्रापासून बॅचलर आॅफ एज्युकेशन (बीएड) अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबदल्यात इंट्रीग्रेटेड टीचर एज्युकेशन प्रोग्राम (आयटीईपी) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अभ्यासक्रम चार वर्षाचा राहणार आहे. परंतु अद्यापही हे स्पष्ट नाही की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ह्या अभ्यासक्रमाला कधीपासून लागू करेल.लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात एनसीटीईने अद्यापपर्यंत विद्यापीठाला यासंदर्भात कुठलेही दिशानिर्देश दिलेले नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा या अभ्यासक्रमाची माहिती नाही. सूत्रांच्या मते जर एनसीटीईकडून प्रारूप आले तरी अभ्यासक्रम चालू करण्यासाठी विद्यापीठाला बराच वेळ लागणार आहे. कारण विद्यापीठात नव्या अभ्यासक्रमानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांची नियुक्ती करावी लागेल. सोबतच विद्यार्थ्यांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्या लागतील.त्याचबरोबर एनसीटीईच्या दिशानिर्देश आल्यानंतर विद्यापीठाला विद्वत परिषदेत पारित करावे लागले. त्यानंतर निर्देशानुसार अध्ययन मंडळाच्या बैठकीत अभ्यासक्रम तयार करावे लागेल.यासोबतच विद्यापीठाला एनसीटीईकडून अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी घ्यावी लागेल. सूत्रांच्या मते मंजुरीसाठी विद्यापीठाला २ ते २३ डिसेंबरदरम्यान अर्ज करावा लागेल. विद्यापीठासोबत संबंधित महाविद्यालयांना याच कालावधीत अर्ज करावा लागेल. यासंदर्भात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले की, एनसीटीईकडून कुठलेही दिशानिर्देश आलेले नाही. त्यांना काही महाविद्यालयाकडून यासंदर्भात माहिती मिळाली आहे. दिशानिर्देश आल्यानंतर प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

असा असेल अभ्यासक्रमएनसीटीईचा आयटीपीई अभ्यासक्रम चार वर्षाचा असेल. प्रवेशासाठी पात्रता बारावी निर्धारित करण्यात आली आहे. बारावीत ५० टक्केपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्याला अभ्यासक्रमात प्रवेश मिळेल. अभ्यासक्रम पूर्ण करणाºया विद्यार्थ्यांना बीएबीएडची डिग्री मिळेल. सध्या बीएड अभ्यासक्रम दोन वर्षाचा आहे. त्यापूर्वी बीएड एक वर्षाचे होते. एनसीटीईच्या मते शिक्षकांमध्ये गुणवत्ता विकसित करण्याच्या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ