शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

नातेवाइकांना सोडायला जाणे झाले कठीण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:07 IST

नागपूर : घरी आलेल्या नातेवाइकांना निरोप देण्यासाठी अनेक जण रेल्वे स्थानकावर जाऊन त्यांना रेल्वेगाडीत बसवून देतात, परंतु गेल्या वर्षभरापासून ...

नागपूर : घरी आलेल्या नातेवाइकांना निरोप देण्यासाठी अनेक जण रेल्वे स्थानकावर जाऊन त्यांना रेल्वेगाडीत बसवून देतात, परंतु गेल्या वर्षभरापासून पाहुण्यांना निरोप देणे ही कठीण बाब होऊन बसली आहे. एका कुटुंबातील चार जण जरी नातेवाइकांना निरोप देण्यासाठी रेल्वे स्थानकावर गेले, तरी त्यांना प्लॅटफॉर्म तिकिटापोटी २०० रुपये मोजावे लागत आहेत. होय, रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर वाढविल्यामुळे नागरिकांना अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पूर्वीप्रमाणे प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर १० रुपये करण्याची मागणी जोर धरत आहे.

- सहा महिन्यांपासून ५० रुपयांचा भुर्दंड

कोरोनामुळे रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढविण्यात आले आहेत. १० रुपयांवरून प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये झाले आहे. मार्च महिन्यापासून आतापर्यंत प्लॅटफॉर्म तिकिटाचा भुर्दंड नागरिकांना बसत आहे. प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर १० रुपये झाल्यास नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

- रोज १,३०० प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री

नागपूर रेल्वे स्थानकावर दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. त्यांना निरोप देण्यासाठी हजारावर नागपूरकर रेल्वे स्थानकावर येऊन प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करतात. सध्या दिवसाकाठी १,३०० प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री होत आहे. या विक्रीच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाला एका दिवशी ६५ हजार रुपयांचा महसूल मिळत आहे.

-सध्या सुरू असलेल्या रेल्वे

-०२१९० नागपूर-मुंबई दुरांतो स्पेशल

-०२१०६ गोंदिया-मुंबई विदर्भ स्पेशल

-०२०३६ नागपूर-पुणे विशेष स्पेशल

-०२१७० नागपूर-मुंबई सेवाग्राम स्पेशल

-०२२२४ अजनी-पुणे स्पेशल

-०२१५९ नागपूर-जबलपूर स्पेशल

-०११३७ नागपूर-अहमदाबाद स्पेशल

०१४०३ नागपूर-कोल्हापूर स्पेशल

-०२०४२ नागपूर-पुणे स्पेशल

-०२०२५ नागपूर-अमृतसर स्पेशल

-०२११४ नागपूर-पुणे गरीबरथ स्पेशल

-०९२१४ नागपूर-इंदूर स्पेशल

..........

सद्याच तिकीट कमी करण्याचा विचार नाही

‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर १० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आले. सध्याच प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर कमी करण्याचा विचार नाही.’

- एस.जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग.

............