शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
2
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
3
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
4
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
5
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
6
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
7
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
8
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
9
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
10
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
11
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
12
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
13
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
14
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
15
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
16
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
17
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
18
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
19
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक

पाऊस पडला ९९ टक्के, शिवार मात्र कोरडेच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 11:25 IST

Nagpur News पर्जन्यमानाच्या अहवालामध्ये १८ जुलैपर्यंत सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडल्याची नोंद आहे. प्रत्यक्षात शिवार मात्र कोरडेच आहे. आठवडाभरापासून विदर्भात पावसाने दांडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

ठळक मुद्देआठवडाभरापासून पावसाची दांडी शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे

 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : यंदा हवामान विभागाने दमदार पावसाचा अंदाज वर्तविला होता. पर्जन्यमानाच्या अहवालामध्ये १८ जुलैपर्यंत सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडल्याची नोंद आहे. प्रत्यक्षात शिवार मात्र कोरडेच आहे. आठवडाभरापासून विदर्भात पावसाने दांडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

पर्जन्यमानाच्या वार्षिक नोंदीनुसार, नागपूर जिल्ह्यात १ जून ते ३१ मे पर्यंतचा वार्षिक पाऊस १४,८०६ मिमी (सरासरी १०५७.६० मिमी) असतो. विदर्भातील पाऊस साधारणत: ऑक्टोबरपर्यंत पडतो. नोंदीनुसार, १ जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंतचा वार्षिक पाऊस १३,६७४.७३ मिमी (सरासरी ९७६.७७ मिमी) असतो. मागील वर्षी १८ जुलैपर्यंत ४,८७८.९४ मिमी (सरासरी ४४८.५०) पाऊस पडला. यंदा १७ जुलैपर्यंत ४,८५४.७४ मिमी (सरासरी ३४६.१२) पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. या हिशेबाने ही टक्केवारी ९९.३२ आहे. टक्केवारीमध्ये पाऊस चांगला दिसत असला तरी प्रत्यक्षात पिकांसाठी पुरेसा नाही. नागपूर जिल्ह्याचा विचार करता पावसाचा असमतोल दिसत आहे. कोणत्या तालुक्यात १०० टक्क्यांवर पाऊस, तर कुठे ९० टक्क्यांपेक्षाही कमी अशी स्थिती आहे. नरखेड, कळमेश्वर, उमरेड, काटोल, नागपूर ग्रामीण या तालुक्यांमध्ये पावसाची टक्केवारी कमी आहे. यामुळे स्थानिक पीक परिस्थितीवर याचा परिणाम जाणवत आहे.

१८ जूनपर्यंतचा जिल्ह्यातील सरासरी पाऊस

नागपूर शहर : ११३.६३ मिमी

नागपूर ग्रामीण : ८६.२५ मिमी

कामठी : ११०.८५ मिमी

हिंगणा : १०३.८२ मिमी

काटोल : ७७.५२ मिमी

नरखेड : ७८.५७ मिमी

सावनेर : १२३.४५ मिमी

कळमेश्वर : ६४.१७ मिमी

रामटेक : ९९.२७ मिमी

पारशिवणी : ११४.२५ मिमी

मौदा : ९१.८३ मिमी

उमरेड : ८७.६६ मिमी

भिवापूर : १२४.४२ मिमी

कुही : १०८.६१ मिमी

 

विदर्भात पावसाचा इशारा

वेधशाळेच्या अनुमानानुसार, पुढील ४८ तासांत नागपूरसह वर्धा, अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मेघजर्गनेसह आणि विजांच्या कडकडाटासह एक-दोन ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतच्या पुढील ४८ तासांमध्ये म्हणजे २१ आणि २२ जुलैला गडचिरोली, चंद्रपूर, गोंदीया, भंडारा या जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

धानाच्या रोवण्या खोळंबल्या

नागपूरसह पूर्व विदर्भातील सर्वच धान उत्पादक जिल्ह्यांमध्ये धानाच्या रोवण्या खोळंबल्या आहेत. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार फक्त ३० ते ३३ टक्के कृषी क्षेत्रावर आतापर्यंत धानाची लागवड झाली आहे. पुरेशा पावसाअभावी चिखल होऊ शकत नसल्याने राेवण्या लांबणीवर पडल्या आहेत. टाकलेले पऱ्हे जगविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दमट हवामानामुळे सोयाबीनवर खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढला आहे.

...

टॅग्स :Rainपाऊस