शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

अयोध्या मुद्यावर संयम ठेवणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 00:31 IST

अयोध्या प्रकरणात लवकर तोडगा निघेल, ही अपेक्षा अयोग्य आहे. या प्रकरणात इतक्या लवकर काहीच होणार नाही. संयम बाळगावा लागेल आणि सर्र्वांना एकत्रित प्रयत्न करावे लागतील, असे मत आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देश्री श्री रविशंकर यांनी सरसंघचालकांची घेतली भेटभेटीबाबत मौन

आॅनलाईन लोकमतनागपूर : अयोध्या प्रकरणात लवकर तोडगा निघेल, ही अपेक्षा अयोग्य आहे. या प्रकरणात इतक्या लवकर काहीच होणार नाही. संयम बाळगावा लागेल आणि सर्र्वांना एकत्रित प्रयत्न करावे लागतील, असे मत आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले. शनिवारी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांची भेट घेतली. या भेटीवर भाष्य करण्याचे मात्र त्यांनी टाळले.अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादात आध्यात्मिक नेते श्री श्री रविशंकर यांच्या मध्यस्थीच्या प्रयत्नामुळे धार्मिक संघटना व आखाड्यांचे राजकारण तापले आहे. रविशंकर यांच्या प्रयत्नांवर हिंदुत्ववादी संघटनांकडूनदेखील नाराजी व्यक्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी या मुद्यावर चर्चा केली . संघाच्या घोषपथकाच्या 'स्वरमोहिनी' कार्यक्रमाला देखील ते उपस्थित होते. संघ परिवारातील काही संघटनांकडूनदेखील रविशंकर यांच्या मध्यस्थीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे सरसंघचालकांसोबतच्या त्यांच्या भेटीला जास्त महत्त्व आले होते. रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात ही भेट झाली . मात्र या भेटीत नेमकी काय चर्चा झाली यावर श्री श्री रविशंकर यांनी भाष्य केले नाही.श्री श्री रविशंकर यांचा यू टर्नअयोध्या व लखनौ येथे आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सदस्यांशी त्यांनी चर्चा केली होती . त्यानंतर नागपुरात आल्यानंतर ते उत्साही वाटत होते व सकारात्मक असल्याचे त्यांनी प्रतिपादन देखील त्यांनी केले होते . मात्र शनिवारी त्यांनी ठोस वक्तव्य करण्याचे टाळले . नागपुरात आल्यावर सरसंघचालकांची भेट घेणार असे त्यांनी उघडपणे सांगितले . ही बाब संघाला रुचली नसून याबाबत संघातर्फे नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली . रविशंकर यांनी देखील यू टर्न घेत आपण फक्त कार्यक्रमासाठी आलो असल्याचे सांगितले .घोष पथकाच्या तालाने निनादले आसमंतराष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये घोष पथकाचे मोठे महत्त्व आहे. संघाच्या कार्यक्रमांमध्ये महत्त्वाचे पथक मानण्यात येणाऱ्या घोष पथकाचा नागपुरात भव्य कार्यक्रम झाला . या कार्यक्रमाला सरसंघचालक , श्री श्री रविशंकर, गायिका अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर,उदित नारायण, पंडित मनिप्रसाद , उल्हास कशाळकर, सुरेश तळवलकर प्रामुख्याने उपस्थित होते .देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिथे कुठे पथसंचलन होते, त्यावेळी घोष पथकाचा त्यात आवर्जून समावेश असतो. प्रत्येक शाखेचे घोष पथक असते. दलप्रमुख, घोषप्रमुख यांचा समावेश असलेल्या घोष पथकाद्वारे स्वर, नादांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती व देशाभिमान जागविणाऱ्या विविध गीतांचे सादरीकरण करण्यात आले . विशेष म्हणजे या सादरीकरणासाठी काही रचना खुद्द सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीदेखील रचल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Politicsराजकारण