शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
2
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
3
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
4
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
5
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
6
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
7
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
8
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
9
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
10
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
11
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
12
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
13
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
14
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
15
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
16
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
17
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
18
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
19
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
20
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.

अयोध्या मुद्यावर संयम ठेवणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 00:31 IST

अयोध्या प्रकरणात लवकर तोडगा निघेल, ही अपेक्षा अयोग्य आहे. या प्रकरणात इतक्या लवकर काहीच होणार नाही. संयम बाळगावा लागेल आणि सर्र्वांना एकत्रित प्रयत्न करावे लागतील, असे मत आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देश्री श्री रविशंकर यांनी सरसंघचालकांची घेतली भेटभेटीबाबत मौन

आॅनलाईन लोकमतनागपूर : अयोध्या प्रकरणात लवकर तोडगा निघेल, ही अपेक्षा अयोग्य आहे. या प्रकरणात इतक्या लवकर काहीच होणार नाही. संयम बाळगावा लागेल आणि सर्र्वांना एकत्रित प्रयत्न करावे लागतील, असे मत आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले. शनिवारी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांची भेट घेतली. या भेटीवर भाष्य करण्याचे मात्र त्यांनी टाळले.अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादात आध्यात्मिक नेते श्री श्री रविशंकर यांच्या मध्यस्थीच्या प्रयत्नामुळे धार्मिक संघटना व आखाड्यांचे राजकारण तापले आहे. रविशंकर यांच्या प्रयत्नांवर हिंदुत्ववादी संघटनांकडूनदेखील नाराजी व्यक्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी या मुद्यावर चर्चा केली . संघाच्या घोषपथकाच्या 'स्वरमोहिनी' कार्यक्रमाला देखील ते उपस्थित होते. संघ परिवारातील काही संघटनांकडूनदेखील रविशंकर यांच्या मध्यस्थीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे सरसंघचालकांसोबतच्या त्यांच्या भेटीला जास्त महत्त्व आले होते. रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात ही भेट झाली . मात्र या भेटीत नेमकी काय चर्चा झाली यावर श्री श्री रविशंकर यांनी भाष्य केले नाही.श्री श्री रविशंकर यांचा यू टर्नअयोध्या व लखनौ येथे आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सदस्यांशी त्यांनी चर्चा केली होती . त्यानंतर नागपुरात आल्यानंतर ते उत्साही वाटत होते व सकारात्मक असल्याचे त्यांनी प्रतिपादन देखील त्यांनी केले होते . मात्र शनिवारी त्यांनी ठोस वक्तव्य करण्याचे टाळले . नागपुरात आल्यावर सरसंघचालकांची भेट घेणार असे त्यांनी उघडपणे सांगितले . ही बाब संघाला रुचली नसून याबाबत संघातर्फे नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली . रविशंकर यांनी देखील यू टर्न घेत आपण फक्त कार्यक्रमासाठी आलो असल्याचे सांगितले .घोष पथकाच्या तालाने निनादले आसमंतराष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये घोष पथकाचे मोठे महत्त्व आहे. संघाच्या कार्यक्रमांमध्ये महत्त्वाचे पथक मानण्यात येणाऱ्या घोष पथकाचा नागपुरात भव्य कार्यक्रम झाला . या कार्यक्रमाला सरसंघचालक , श्री श्री रविशंकर, गायिका अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर,उदित नारायण, पंडित मनिप्रसाद , उल्हास कशाळकर, सुरेश तळवलकर प्रामुख्याने उपस्थित होते .देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिथे कुठे पथसंचलन होते, त्यावेळी घोष पथकाचा त्यात आवर्जून समावेश असतो. प्रत्येक शाखेचे घोष पथक असते. दलप्रमुख, घोषप्रमुख यांचा समावेश असलेल्या घोष पथकाद्वारे स्वर, नादांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती व देशाभिमान जागविणाऱ्या विविध गीतांचे सादरीकरण करण्यात आले . विशेष म्हणजे या सादरीकरणासाठी काही रचना खुद्द सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीदेखील रचल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Politicsराजकारण