शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

'ईडब्ल्यूएस' कोट्यात 'एसईबीसी'ला सामावणे अवैध; इंजिनियर्सच्या नोकऱ्या वादाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2022 11:44 IST

ही भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

ठळक मुद्दे'मॅट'मध्ये अर्ज

नागपूर : आर्थिक दुर्बल घटकाकरिता आरक्षित ठेवण्यात आलेल्या सिव्हिल इंजिनियर्सच्या नोकऱ्यांमध्ये सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गातील उमेदवारांना सामावून घेण्याच्या वादग्रस्त निर्णयाविरुद्ध महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे ही भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

आर्थिक दुर्बल घटकातील शुभम मिश्रा व इतर आठ पीडित उमेदवारांनी हे अर्ज दाखल केले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सिव्हिल इंजिनियर्सची पदे भरण्याकरिता ३ एप्रिल २०१९ रोजी जाहिरात प्रकाशित केली होती. त्यात आर्थिक दुर्बल घटक आणि सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग या दोहोंसाठी जागा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर २८ जुलै २०२० रोजी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला व आर्थिक दुर्बल घटकातील १२६ व त्यावर गुण मिळविलेल्या उमेदवारांना पुढील फेरीसाठी पात्र ठरविण्यात आले होते.

दरम्यान, ५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाचे आरक्षण अवैध ठरवले. त्यामुळे राज्य सरकारने ९ सप्टेंबर २०२० पूर्वी अंतिम निकाल जाहीर झालेल्या, पण नियुक्ती प्रक्रिया प्रलंबित असलेल्या भरत्यांच्या बाबतीत, सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गातील उमेदवारांना आर्थिक दुर्बल घटकात सामावून घेण्याचा निर्णय घेतला, तसेच यासंदर्भात ३१ मे २०२१ रोजी जीआर जारी केला. परिणामी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २३ जुलै २०२१ रोजी सिव्हिल इंजिनियर्सच्या मुख्य परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर केला आणि आर्थिक दुर्बल घटकातील २१२ व त्यावर गुण मिळविलेल्या उमेदवारांना पुढील फेरीसाठी पात्र ठरविले. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील अनेक मूळ उमेदवार या भरती प्रक्रियेतून बाहेर पडले. अर्जदार उमेदवार यापैकीच असून त्यांनी सरकारचा वादग्रस्त निर्णय अवैध असल्याचा दावा केला आहे.

अंतिम निर्णयाधीन राहतील नियुक्त्या

या अर्जांवर न्यायाधिकरणचे उपाध्यक्ष श्री भगवान व न्यायिक सदस्य एम. ए. लोवेकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायाधिकरणाने आर्थिक दुर्बल घटकातून झालेल्या नियुक्त्या या अर्जांवरील अंतिम निर्णयाधीन राहतील, असा अंतरिम आदेश दिला, तसेच राज्य सरकारला नोटीस बजावून अर्जांवर चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. अर्जदारांच्यावतीने ॲड. मिहिर पुराणिक यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयjobनोकरीEducationशिक्षण