शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

निर्दयी गुन्हेगारांना उचित शिक्षा करणे न्यायालयाचे कर्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:11 IST

नागपूर : समाजाचे घातक गुन्ह्यांपासून संरक्षण व्हावे व त्यांचा न्यायालयावरील विश्वास वाढावा, याकरिता निर्दयी गुन्हेगारांना उचित शिक्षा करणे न्यायालयाचे ...

नागपूर : समाजाचे घातक गुन्ह्यांपासून संरक्षण व्हावे व त्यांचा न्यायालयावरील विश्वास वाढावा, याकरिता निर्दयी गुन्हेगारांना उचित शिक्षा करणे न्यायालयाचे कर्तव्य आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्राणघातक हल्ला प्रकरणावरील निर्णयात नोंदविले, तसेच प्रकरणातील आरोपीवर दया दाखविण्यास नकार देऊन, त्याची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली.

न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला. आरोपीचे नाव चंद्रशेखर रामचंद्र कटरे असून, तो भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यातील बाघेडा येथील रहिवासी आहे. त्याने प्रथम पत्नी आशा व सासू भगिरथा बोपचे या दोघींवर घातक हत्याराने वार करून, त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यामुळे दोघींनाही अतिशय गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या होत्या. त्यानंतर, त्यांना अनेक दिवस तोंडी सूचना कळत नव्हत्या. त्यांना पूर्णपणे बरे करण्यासाठी नागपूरमध्ये प्लास्टीक सर्जरी करावी लागली. असे असताना आरोपीवर दया दाखवून शिक्षा कमी करण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली होती. आरोपी ४४ वर्षांचा असून, त्याला दोन अल्पवयीन मुली, एक मुलगा व वृद्ध आई-वडील आहेत, असे न्यायालयाला सांगण्यात आले होते. न्यायालयाने आरोपीची क्रूरता पाहता, वरील निरीक्षण नोंदवून ही विनंती अमान्य केली. स्वत:ला वाचविण्याची क्षमता नसलेल्या दोन्ही महिलांना आरोपीला ठार मारायचे होते, परंतु त्या सुदैवाने बचावल्या. त्यांच्या वेदना व दु:खाकडे आणि समाजाच्या अपेक्षांकडे न्यायालय दुर्लक्ष करू शकत नाही. आरोपीने केलेला गुन्हा जघन्य स्वरूपाचा असून, हा गुन्हा अत्यंत निर्दयीपणे करण्यात आला. त्यामुळे समाजमन सुन्न झाले असेही न्यायालयाने हा निर्णय देताना नमूद केले.

-------------------

अपील फेटाळून लावले

७ नोव्हेंबर, २०१७ रोजी भंडारा सत्र न्यायालयाने आरोपीला प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने आरोपीविरुद्ध उपलब्ध असलेले ठोस पुरावे लक्षात घेता, ते अपील फेटाळून लावले. सत्र न्यायालयात आरोपीविरुद्ध १२ साक्षीदार तपासण्यात आले होते.

-------------------

मटण कापण्याच्या हत्याराने हल्ला

ही घटना २६ जानेवारी, २०१५ रोजी रात्री ९.१५च्या सुमारास घाडली. आराेपीने आशा व भगिरथा यांना केस पकडून घराबाहेर ओढत आणले. त्यानंतर, त्यांना ठार मारण्यासाठी त्यांच्यावर मटण कापण्याच्या हत्याराने सपासप वार केले. या हल्ल्यामुळे भगिरथाच्या एका हाताचा पंचा मनगटापासून वेगळा झाला, तर आशाच्या डाव्या हाताचे एक बोट कापून काढावे लागले, तसेच दोघींच्याही डोक्याला खोलवर जखमा झाल्या. हल्ला केल्यानंतर आरोपी पळून गेला होता.

------------------

आरोपीच्या कपड्यांवर जखमींचे रक्त

आरोपीचे रक्ताने माखलेले कपडे व हल्ल्यात वापरलेले हत्यार पोलिसांनी जप्त केले. त्यावरील रक्त व जखमींचे रक्त रासायनिक परीक्षणात सारखे आढळून आले. आरोपीने संबंधित हत्यार शेतातील झुडपात लपवून ठेवले होते. त्याने स्वत: पोलिसांना ते हत्यार काढून दिले.

------------------

हल्ल्यामागील उद्देश सिद्ध झाला

आरोपीचे आशासोबत दीर्घकाळ प्रेमसंबंध होते. आशाला आरोपीपासून १२ वर्षांचा मुलगा आहे. दरम्यान, आरोपीने आशाला सोडून दुसऱ्या माहिलेसोबत लग्न केले. त्यामुळे आशाने आरोपीविरुद्ध विविध कारणांवरून पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी केल्या. परिणामी, आरोपीने आशा व तिच्या आईला कायमचे संपविण्यासाठी हा हल्ला केला, हे पुराव्यांवरून सिद्ध झाले.