शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

उपराजधानीतील कोविड हॉस्पिटल्समध्ये एक बेड मिळणेही कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 10:50 IST

शहरातील १६ खासगी रुग्णालयांमधील १८७६ बेड्स कोरोना रुग्णांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. परंतु, रुग्णांची संख्या सतत वाढत असल्यामुळे हे बेड्स कमी पडत आहेत.

ठळक मुद्दे तीव्र गतीने वाढतेय संक्रमण आणि मृत्यूचे आकडेवेंटिलेटर्सचाही मोठा तुटवडा 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य भारताचे मेडिकल हब म्हणून ओळखले जाणारे नागपूर वर्तमानात जेवढे दिसतेय तेवढे हतबल कधीच दिसले नव्हते. कोरोना संक्रमणाने रोज सरासरी ४० हून जास्त लोक मृत्यूमुखी पडत आहेत. कोरोनाचे रुग्ण बेडसाठी हॉस्पिटल्सच्या चकरा मारत आहेत. वेंटिलेटर्सचाही प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. मोठमोठे दावे करणाऱ्या स्थानिक शासन आणि प्रशासनाची क्षमता तोकडी पडल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारच्या कार्यक्षमतेचा तर पत्ताच नाही.

सद्य:स्थिती दयनीय झाली आहे. ही स्थिती दर्शवणाऱ्या कथा सर्वत्र दिसून येत आहेत. रुग्ण जर गरीब किंवा मध्यमवर्गीय असेल तर त्यांच्यावर संकटाचा डोंगरच कोसळल्यासारखी स्थिती आहे. सर्वच गंभीर रुग्ण मेडिकल आणि मेयोमध्येच येत असल्याने तेथे बेड मिळणे कठीण झाले आहे. बेड्सचा तुटवडा निर्माण होणार नाही, असे मोठमोठाले दावे करणारी महानगरपालिका तोंडघशी पडली आहे. खाजगी हॉस्पिटल्समध्ये बेड्स उपलब्ध आहेत. मात्र, तेथील वास्तविकता वेगळीच आहे. कोणत्याही खाजगी हॉस्पिटलमध्ये फोन केल्यास, तेथून बेड रिकामे नसल्याचेच उत्तर मिळत आहे. रुग्ण जर गंभीर अवस्थेत असेल तरी बेड मिळण्याचा प्रश्नच नाही. काही अपवाद वगळता सर्वच खाजगी हॉस्पिटल्सची स्थिती हिच आहे. जे पैसा खर्च करण्याची क्षमता ठेवतात, त्यांनाही बेड मिळायला जागा नाही. त्यामुळे, मेडिकल आणि मेयो हेच गंभीर रुग्णांसाठी एकमात्र स्थळ उरले आहे.या दोन्ही हॉस्पिटल्सवरील ताण प्रचंड वाढला आहे. मेयोच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ६०० बेड्स आहेत. त्यातील २०० बेड्स आयसीयूसाठीचे आहेत. मात्र, सर्वात मोठी समस्या डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफच्या कमी असलेल्या संख्येची आहे. नियमानुसार कमीत कमी २८८ डॉक्टर्स असणे गरजेचे आहे. जेणेकरून २४ तास प्रत्येक रुग्णाला उत्तम उपचार मिळेल. परंतु, येथे केवळ ७० डॉक्टर्सच उपलब्ध आहेत. हे डॉक्टर्स नक्कीच परिश्रम घेत आहेत. मात्र, एवढ्या कमी संख्येमुळे स्थिती आणखीणच बिकट झाली आहे. मेयो प्रशासनाने १२६ डॉक्टरांची मागणी केली होती. परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पॅरामेडिकल स्टाफची संख्याही फारच तोकडी आहे. मेडिकलची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. येथेही किमान २८८ डॉक्टर्सची गरज आहे. परंतु, ४० टक्के डॉक्टर्सचा तुटवडा आहेच. चिकित्सा कर्मचारी आणि वेंटिलेटरच्या कमतरतेमुळे संक्रमितांना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागत आहे. अनेकदा तर वेळेवर ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याचेही दिसून येते.या कारणामुळे रुग्णांच्या मृत्यूची संख्या सतत वाढत आहे. आॅगस्टमध्ये ९१९ रुग्णांच्या मृत्यूनंतरही प्रशासनाने गांभीर्याने हालचाली केल्या नाही. त्यावरून शहराला निराधार सोडल्याचे दिसून येते. यावेळी प्रत्येक नागरिकाला प्रशासन एवढे हतबल का आहे, हा एकच प्रश्न भेडसावत आहे. खासगी रुग्णालयांत खाटा नाहीतशहरातील १६ खासगी रुग्णालयांमधील १८७६ बेड्स कोरोना रुग्णांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. परंतु, रुग्णांची संख्या सतत वाढत असल्यामुळे हे बेड्स कमी पडत आहेत. सध्या रोज ५ ते ६ हजार कोरोना चाचण्या होत आहेत व त्यातून सुमारे १४०० चाचण्या पॉझिटिव्ह येत आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम रुग्णांना खासगी रुग्णालयांत उपचार घ्यायचे असतात, पण बेड उपलब्ध होत नाही. बेड मिळालेच तर, भरमसाठ शुल्क मागितले जात आहे. मनपाने दर निश्चित केले आहेत, पण त्याचे पालन होत आहे का याचे उत्तर कोण देईल.

होम आयसोलेशनमधील रुग्ण वाऱ्यावरमहापालिकेची परिस्थिती दयनीय आहे. त्यांच्याकडे डॉक्टर व परिचारिका कमी आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांना घरी ठेवले जात आहे. अशा रुग्णांसोबत ८ ते १० दिवसानंतर संपर्क केला जात आहे. उल्लेखनीय म्हणजे, अशा रुग्णांना तत्काळ उपचाराची गरज असते. परंतु, अनेक प्रकरणात रुग्ण बरा झाल्यानंतर मनपाची चमू त्याच्या घरी गेली आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस