शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
2
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
5
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
6
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
7
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
8
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
9
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
10
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
11
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
12
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
13
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
14
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
15
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
16
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
17
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
18
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
19
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
20
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!

महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे रेटावा लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 01:12 IST

अ.भा. आंबेडकरी महिला साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ‘स्त्री-मुक्ती : मूल्यांत्तरोत्तर आंबेडकरी विचार आणि ब्राह्मणवादी पितृसत्ताक व्यवस्था’ या विषयावर प. बंगालच्या साहित्यिक कल्याणी ठाकूर यांच्या अध्यक्षतेत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संजीव चंदन, डॉ. वर्षा अय्यर, डॉ. सुलभा पाटोळे, डॉ. नंदा तायवाडे, डॉ. लता प्र.म. यांनी सहभाग घेतला.

ठळक मुद्देआंबेडकरी महिला संमेलनातील परिसंवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ.भा. आंबेडकरी महिला साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ‘स्त्री-मुक्ती : मूल्यांत्तरोत्तर आंबेडकरी विचार आणि ब्राह्मणवादी पितृसत्ताक व्यवस्था’ या विषयावर प. बंगालच्या साहित्यिक कल्याणी ठाकूर यांच्या अध्यक्षतेत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संजीव चंदन, डॉ. वर्षा अय्यर, डॉ. सुलभा पाटोळे, डॉ. नंदा तायवाडे, डॉ. लता प्र.म. यांनी सहभाग घेतला.दिल्लीचे प्रा. संजीव चंदन यांनी या स्त्री मुक्तीच्या चळवळीचे विश्लेषण केले. महात्मा फुले यांच्यानंतर खऱ्या अर्थाने महिलांसाठी ठोस भूमिका घेतली ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच. त्याकाळी महिलांच्या मातृत्वाच्या रजेचा मुद्दा उपस्थित करणारे ते एकमेव व्यक्ती होते. महिलांच्या अधिकाराचा अजेंडा त्यांनी ठेवला, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य शासनांना धोरण राबविण्याची सूचना त्यांनी दिली. महिलांबद्दल समानतेचा दृष्टिकोन ठेवायला समाज तयार नाही, अशावेळी शासनाने कठोरपणे त्यांच्या अधिकारासाठी पावले उचलावी, अशी तरतूद त्यांनी संविधानाच्या माध्यमातून केली आहे. या मूल्यामुळे महिलांमध्ये एक जाणीव निर्माण झाली. मात्र संघर्षाचे दोन गट पडले. स्त्री मुक्तीच्या आंदोलनात जातीभेदाचा मुद्दा नसलेला एक गट आणि हा मुद्दा घेऊनच संघर्ष उभा करणारा दलित महिलांचा दुसरा गट. मात्र जातीभेदाचा मुद्दा नसला तरी बोलण्याचा, लग्नाचा व निर्णयाचा अधिकार पहिल्या गटातही असल्याने त्यांचे आंदोलनही ब्राह्मणवादी पितृसत्ताक व्यवस्थेला आव्हानच होते. त्यामुळे महिलांचा प्रत्येक संघर्ष हा कोणत्याही अर्थाने पितृसत्ताक व्यवस्थेला आव्हानच ठरलेला आहे. आज राजकीय व्यवस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण आणि खासगी क्षेत्रातही आरक्षणाचा मुद्दा पुढे करून आंदोलन उभारण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी कल्याणी ठाकूर यांनी बाबासाहेबांना पश्चिम बंगालमधून संविधान सभेत पाठविण्यात आल्याचा उल्लेख केला. ही बाब बंगाल आणि महाराष्ट्राला एका धाग्यात जोडत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कम्युनिस्टांच्या अजेंड्यात जातीभेद निर्मूलनाचा समावेश नव्हता. स्त्री-मुक्तीचे आंदोलन वर्गवारीवर आधारीतच होते व फेमिनिझममुळे उच्चवर्णीय महिलांपुरते मर्यादित होते. त्यात दलित महिलांचा समावेश नव्हता. बंगालमध्ये दलित उत्थानासाठी गुरुचंद ठाकूर व त्यांचा मुलगा होरीचंद ठाकूर यांच्या कार्याचा उल्लेख कल्याणी यांनी केला. महाराष्ट्राकडून प्रेरणा घेउन दलितांच्या प्रश्नावर बंगालमध्ये आंदोलन उभारण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. संचालन वंदना जीवने यांनी व आभार विशाखा लांजेवार यांनी मानले. 

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरWomenमहिला