शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेच्या मुद्यावर सत्ताधारी व विरोधक एकत्र

By admin | Updated: June 21, 2017 02:35 IST

शहराला स्मार्ट बनविण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, अस्वच्छता निर्माण करणे व अतिक्रमणाला आळा घालण्याची गरज आहे.

 सभागृहात एकमत : प्रभाग स्तरावर उपद्रव शोधपथक ; १५१ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहराला स्मार्ट बनविण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, अस्वच्छता निर्माण करणे व अतिक्रमणाला आळा घालण्याची गरज आहे. यासाठी आता प्रभाग स्ततरावर उपद्रव शोधपथक गठित करण्याचा निर्णय सर्वांच्या सहमतीने घेण्यात आला. स्वच्छतेच्या मुद्यावर महापालिकेतील सत्ताधारी व विरोधक एकत्र आल्याचे चित्र मंगळवारी सर्वसाधारण सभेत बघायला मिळाले. झोन स्तरावर उपद्रव शोधपथक गठित करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने दिला होता. परंतु गतकाळातील नागरी पोलिसांचा अनुभव चांगला नव्हता. त्यामुळे नागरी पोलिसांची संकल्पना नागपुरात नापास ठरली होती. त्यामुळे प्रशासनाच्या प्रस्तावात बदल करून प्रभाग स्तरावर उपद्रव शोधपथक गठित करण्याचा प्रस्ताव सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी मांडला. सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी याला पाठिंबा दर्शविला. त्यानुसार उपद्रव शोधपथक ासाठी १५१ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला महापौर नंदा जिचकार यांनी मंजुरी दिली. उपद्रव शोधपथक गठित करण्याला आमचा पाठिंबा आहे. यासाठी निधीची गरज भासल्यास नगरसेवकांच्या वॉर्ड फंडातील निधी घ्यावा, अशी भूमिका काँग्रेसचे मनोज सांगोळे यांनी मांडली. संदीप सहारे, बसपाचे जितेंद्र घोडेस्वार यांच्यासह विरोधी सदस्यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दर्शविला. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे व प्रफुल्ल गुडधे यांनीही शहर स्वच्छतेच्या मुद्यावर सकारात्मक भूमिका घेतली. सभागृहात गेल्या काही वर्षात प्रथमच सत्ताधारी व विरोधक एखाद्या मुद्यावर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करताना दिसले. महापालिका प्रशसनाने झोन स्तरावर उपद्रव शोधपथक गठित करण्याचा प्रस्ताव दिला होता. यात सुधारणा करून प्रभाग स्तरावर पथके गठित केली जाणार आहे. यात माजी सैनिकांचा समावेश राहणार आहे. भरती प्रक्रि या राबविण्याला मंजुरी देण्यात आली. स्थायी समिती ठरविणार वेतन उपद्रव शोधपथकातील अधिकारी व सुरक्षा रक्षकांचे वेतन निश्चित करण्याचा निर्णय स्थायी समितीने घ्यावा. प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवावा, अशी भूमिका अविनाश ठाकरे व बाल्या बोरकर यांनी मांडली. त्यानुसार संदीप जोशी यांनी सूचना केली. वेतन निश्चित करण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीकडे पाठविण्याचे निर्देश महापौरांनी दिले.