शहरं
Join us  
Trending Stories
1
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
2
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
3
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
4
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
5
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
6
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
7
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
8
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
9
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
10
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
11
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
12
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
13
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
14
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
15
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
16
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
17
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
18
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
19
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
20
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन ४० टक्क्यांवर नेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:37 IST

सद्यस्थितीत महाराष्ट्रात २२ टक्के शेतजमीन सिंचनाखाली आहे. शेतीला चांगले दिवस आणायचे असतील तर सिंचनक्षमता सुधारण्याची आवश्यकता आहे.

ठळक मुद्देनितीन गडकरी : शोभा फडणवीस यांच्या ‘धांडोळा शेतीचा’ या पुस्तकाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सद्यस्थितीत महाराष्ट्रात २२ टक्के शेतजमीन सिंचनाखाली आहे. शेतीला चांगले दिवस आणायचे असतील तर सिंचनक्षमता सुधारण्याची आवश्यकता आहे. असे झाले तरच शेतकरी आत्महत्या कमी होतील. पुढील दोन वर्षांत राज्यातील सिंचन ४० टक्क्यांवर नेणार, असा दावा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. माजी मंत्री शोभा फडणवीस यांनी लिहिलेल्या ‘धांडोळा शेतीचा’ या पुस्तकाचे रविवारी त्यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी गडकरी बोलत होते.डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, खा. विकास महात्मे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, आ. नागो गाणार, आ. समीर कुणावार, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर, विश्वास पाठक हे प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या देशात पंचवार्षिक योजना ज्या दिशेने गेली, त्यावर विचार करण्याची गरज आहे. समाजवाद, साम्यवाद आणि ‘पुंजीवाद’ या चक्रात कृषी धोरण आखताना गोंधळ झाला. सिंचनासाठी ज्यावेळी निधी देणे अपेक्षित होते तेव्हा एअर इंडियासाठी ७० हजार कोटींची विमाने विकत घेण्यात आली. मुळात आजच्या तारखेत सिंचनाला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. धरणे भरली असताना शेतकºयांना पाणी मिळत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे योग्य धोरण आखून सिंचन क्षमता वाढविण्यावर आमचा भर आहे. नदीजोड प्रकल्पात राज्यामध्ये प्रकल्पांचा समावेश आहे. यामुळे निश्चित सिंचन वाढेल, असे गडकरी म्हणाले. तांदूळ, गहू, कापसासारख्या पिकांमुळे शेती फायद्यात येऊ शकत नाही. या पिकांना वाढीव भाव देणेदेखील शक्य नाही. त्यामुळे शेतीला पूरक उद्योग शेतकºयांनी सुरू केले तर त्यांचे उत्पन्न सहज वाढू शकते, असे गडकरी म्हणाले. यावेळी डॉ. निंबाळकर यांनी पुस्तकातील महत्त्वाच्या मुद्यांवर प्रकाश टाकला. शोभा फडणवीस यांनी प्रास्ताविक केले. कर्जमाफीमुळे शेतकºयांच्या समस्या कधीच सुटणार नाहीत. शेतकºयांच्या मानसिकतेचा विचार करून धोरणे आखायला हवीत. विकासाचा केंद्रबिंदू शेतकरी असावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. स्मिता माहूरकर यांनी संचालन केले....अन्यथा आपल्यावरील विश्वास संपेलशेतीच्या समस्यांवर आंदोलन करणे सोपे असते. मात्र त्यावर मार्ग काढणे जास्त आवश्यक आहे. विरोधी पक्षात असताना आम्ही आंदोलने केली. आता सगळीकडेच आमची सत्ता आहे. त्यामुळे मी जनप्रतिनिधींना म्हणतो की चर्चा करण्यापेक्षा उत्तरे शोधा. अन्यथा जनतेचा आपल्यावरील विश्वास संपेल, असे गडकरी यावेळी म्हणाले.दिल्लीला पाण्याचे दु:ख कळलेच नाहीउत्तर भारतात सिंचनाची फारशी समस्या नाही. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रासारख्या राज्यातील लोकांचे पाण्याचे दु:ख माहीत नाही. आपण आजपर्यंत आपले दु:ख व समस्या योग्य पद्धतीने मांडू शकलो नाही व त्यांनादेखील पाण्याचे दु:ख कळले नाही. मात्र आता काहीही झाले तरी सिंचन वाढविण्यासाठी प्रयत्न करणार, असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले.