शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

‘सिंचन’ चौकशीची तटकरेंना घाई

By admin | Updated: August 28, 2016 02:06 IST

आघाडी सरकारच्या काळात झालेल्या विविध सिंचन प्रकल्पांच्या कामांची सरकारतर्फे चौकशी सुरू आहे.

चौकशी लवकर पूर्ण करण्याची मागणी : सरकारची फक्त टिष्ट्वटरवर टिवटिवनागपूर : आघाडी सरकारच्या काळात झालेल्या विविध सिंचन प्रकल्पांच्या कामांची सरकारतर्फे चौकशी सुरू आहे. या चौकशीत आपलेही नाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही चौकशी सुरू असून आपण चौकशीला पूर्णपणे सहकार्य करीत आहोत. ही चौकशी लवकर पूर्ण व्हावी व सत्य जनतेसमोर यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केली. तटकरे यांनी चौकशीला गती देण्याची मागणी करून एकप्रकारे सरकारला आव्हानच दिल्याचे मानले जात आहे. तटकरे यांनी शनिवारी नागपुरात विदर्भातील सर्व जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, प्रभारी यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना तटकरे यांनी राज्यातील युती सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, राज्य सरकार फक्त टिष्ट्वटरवर टिवटिव करते. प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन प्रश्न समजून घेत नाही. सरकारने व्यापाऱ्यांना कोट्यवधींची एलबीटी माफी दिली. मात्र, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यालाही कर्जमाफी दिली नाही. धान, कापूस आदी पिकांना चांगला भाव दिला नाही. सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाहीनागपूर : सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही, अशी टीका त्यांनी केली. भाजप- शिवसेनेत सुरू असलेल्या धुसफुसीचा परिणाम शासकीय यंत्रणेवर होत आहे. म्हणूनच मुख्यमंत्र्यांना ५० टक्के नोकरशाही आमचे ऐकत नाही, असे सांगावे लागत आहे. सत्तेत राहून विरोधकांची भूमिका घेण्याचा शिवसेनेकडून होणारा प्रयत्न ही जनतेची फसवणूक आहे. विरोधकांसह सामान्य नागरिकांची गळचेपी करणाऱ्या प्रस्तावित अंतर्गत सुरक्षा कायद्याला चौफेर विरोध झाल्यामुळेच सरकारने मसुदा परत घेतला. पण असा कायदा आणण्याचा मानस सरकारने का केला, हे आधी स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली. विधान परिषदेत काँग्रेसतर्फे राणे आल्यामुळे राष्ट्रवादीचा प्रभाव कमी झालेला नाही. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, मी स्वत: व इतरही सहकारी आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. आमचा प्रभाव कमी झाला नाही व होणारही नाही. मात्र, राणेंच्या माध्यमातून काँग्रेस आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा चिमटाही त्यांनी काढला. या वेळी माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, आ. प्रकाश गजभिये, माजी आ. दीनानाथ पडोळे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, नागपूर शहर कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे, नाागपूर ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ ताकसांडे, अजय पाटील, रमेश फुले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)आघाडीचे अधिकार स्थानिक नेत्यांनाआगामी नगर पंचायत, जिल्हा परिषद व महापालिकेच्या निवडणुकीत समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात आले आहेत. काँग्रेसने तयारी दर्शविली तर सोबत लढू अन्यथा स्वतंत्र लढण्याचीही तयारी आहे. राष्ट्रवादी सर्वच निवडणुका ‘घड्याळा’वर लढेल. कुठेही स्थानिक पातळीवर शहर आघाडी किंवा विकास आघाडी अशा बॅनरखाली दुसऱ्या चिन्हावर लढणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आता आपल्याला जनता साथ देणार नाही याचा अंदाज आल्यामुळेच सरकारने निवडणूक पद्धधीतच बदल केला आहे. गादी वाचविण्यासाठी आगामी निवडणुकीत नगर परिषदेचा नगराध्यक्ष थेट निवडण्याचा तसेच महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला असल्याची टीकाही त्यांनी केली. विदर्भाबाबत जनभावना पक्षाला मान्यवेगळ्या विदर्भाबाबत विदर्भातील जनतेच्या ज्या भावना असतील त्या पक्षाला मान्य आहेत. पण तसे काही नसताना सरकारतर्फे वेगळी भूमिका मांडली जात आहे. गोव्यात वेगळ्या राज्यासाठी सार्वमत झाले होते. आता येथे कसा निर्णय घ्यायचा ते सरकारने ठरवावे. एकीकडे सरकारमध्ये एकत्र नांदायचे व बाहेर विदर्भाच्या मुद्यावर वेगवेगळी वक्तव्ये करायची, असा भाजप- सेनेचा खेळ सुरू आहे, अशी टीका तटकरे यांनी केली. विदर्भातील जे राष्ट्रवादीचे नेते आपली भूमिका मांडत आहेत, त्यांच्या मतांचा आमचा पक्ष आदर करतो, असेही त्यांनी सांगितले.