शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

सिंचन अनुशेष, नागपूर महापुराचा संताप; मुख्य सचिव मनोज सौनिक यांना समन्स, हायकोर्टाचा दणका

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: December 20, 2023 22:10 IST

गुरुवारी दुपारी अडीच वाजता हजर होण्याचे निर्देश

नागपूर : विदर्भातील रखडलेले सिंचन प्रकल्प आणि अंबाझरी तलावातील पाण्यामुळे नागपुरात आलेला महापूर या दोन्ही गंभीर प्रकरणांमध्ये उदासीन, असंवेदनशील भूमिका घेतल्यामुळे राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने समन्स बजावला व गुरुवारी दुपारी अडीच वाजता न्यायालयात हजर राहून स्पष्टीकरण सादर करा, असे निर्देश दिले.

या दोन्ही प्रकरणांसदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहेत. त्यावर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. विदर्भातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पाचा प्रश्न राज्य सरकारच्या विविध विभागांशी संबंधित आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी त्या सर्व विभागांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यक आहे. १८ जुलै २०२३ रोजी न्यायालयाने ही बाब लक्षात घेता राज्याच्या मुख्य सचिवांना यावर १८ ऑगस्ट २०२३ पर्यंत सर्वसमावेशक प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर मुख्य सचिवांनी १० ऑगस्ट २०२३ रोजी प्रतिज्ञापत्र दाखल केले. न्यायालयाने बुधवारी त्या प्रतिज्ञापत्राचे अवलोकन केल्यानंतर त्यातील माहितीवर असमाधान व्यक्त केले. प्रतिज्ञापत्रातील सर्व माहिती उथळ व मोघम स्वरूपाची आहे, असे ताशेरे न्यायालयाने ओढले. याशिवाय, ६ डिसेंबर २०२३ रोजी न्यायालयाने मुख्य सचिवांना अंबाझरी तलावाची सुरक्षा व बळकटीकरणावर १७ डिसेंबर २०२३ पर्यंत उत्तर मागितले होते. परंतु, त्यांच्या वतीने महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्यात आले. त्यावरही न्यायालयाने प्रचंड नाराजी व्यक्त करून महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना राज्याच्या मुख्य सचिवांच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा अधिकारच नाही, याकडे लक्ष वेधले. तसेच, या दोन्ही प्रकरणांमध्ये राज्य सरकारद्वारे न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यामध्ये दाखविण्यात आलेल्या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेऊन मुख्य सचिव मनोज सौनिक यांना समन्स बजावला

टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय