शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

सिंचन अनुशेष, नागपूर महापुराचा संताप; मुख्य सचिव मनोज सौनिक यांना समन्स, हायकोर्टाचा दणका

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: December 20, 2023 22:10 IST

गुरुवारी दुपारी अडीच वाजता हजर होण्याचे निर्देश

नागपूर : विदर्भातील रखडलेले सिंचन प्रकल्प आणि अंबाझरी तलावातील पाण्यामुळे नागपुरात आलेला महापूर या दोन्ही गंभीर प्रकरणांमध्ये उदासीन, असंवेदनशील भूमिका घेतल्यामुळे राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने समन्स बजावला व गुरुवारी दुपारी अडीच वाजता न्यायालयात हजर राहून स्पष्टीकरण सादर करा, असे निर्देश दिले.

या दोन्ही प्रकरणांसदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहेत. त्यावर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. विदर्भातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पाचा प्रश्न राज्य सरकारच्या विविध विभागांशी संबंधित आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी त्या सर्व विभागांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यक आहे. १८ जुलै २०२३ रोजी न्यायालयाने ही बाब लक्षात घेता राज्याच्या मुख्य सचिवांना यावर १८ ऑगस्ट २०२३ पर्यंत सर्वसमावेशक प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर मुख्य सचिवांनी १० ऑगस्ट २०२३ रोजी प्रतिज्ञापत्र दाखल केले. न्यायालयाने बुधवारी त्या प्रतिज्ञापत्राचे अवलोकन केल्यानंतर त्यातील माहितीवर असमाधान व्यक्त केले. प्रतिज्ञापत्रातील सर्व माहिती उथळ व मोघम स्वरूपाची आहे, असे ताशेरे न्यायालयाने ओढले. याशिवाय, ६ डिसेंबर २०२३ रोजी न्यायालयाने मुख्य सचिवांना अंबाझरी तलावाची सुरक्षा व बळकटीकरणावर १७ डिसेंबर २०२३ पर्यंत उत्तर मागितले होते. परंतु, त्यांच्या वतीने महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्यात आले. त्यावरही न्यायालयाने प्रचंड नाराजी व्यक्त करून महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना राज्याच्या मुख्य सचिवांच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा अधिकारच नाही, याकडे लक्ष वेधले. तसेच, या दोन्ही प्रकरणांमध्ये राज्य सरकारद्वारे न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यामध्ये दाखविण्यात आलेल्या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेऊन मुख्य सचिव मनोज सौनिक यांना समन्स बजावला

टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय