शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

१.२० लाख हेक्टरमधील सिंचन वांंध्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:08 IST

नत्थू घरजाळे लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : पेंच नदीवर मध्य प्रदेशात चाैराई धरणाची निर्मिती करण्यात आली असून, त्यात ...

नत्थू घरजाळे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : पेंच नदीवर मध्य प्रदेशात चाैराई धरणाची निर्मिती करण्यात आली असून, त्यात पाणी अडविण्यात आल्याने याच नदीवरील ताेतलाडाेह व पेंच प्रकल्पातील जलासाठा कमी झाला आहे. त्यामुळे या दाेन्ही प्रकल्पावर अवलंबून असलेले नागपूर व भंडारा जिल्ह्यातील शेतीचे सिंचन वांध्यात आले आहे. ही समस्या साेडविण्यासाठी राज्य शासनाने मध्य प्रदेशातील कन्हान नदीवरील लाेहघाेगरी प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे दाेन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा प्रकल्प पूर्ण हाेण्याची प्रतीक्षा आहे.

पेंच नदीवरील ताेतलाडाेह आणि पेंच प्रकल्प नागपूर व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले हाेते. या दाेन्ही प्रकल्पातील पाण्यामुळे नागपूर व भंडारा जिल्ह्यातील ७० हजार हेक्टरमधील खरीप व ५० हजार हेक्टरमधील रबी पिकांचे असे एकूण १ लाख २० हजार हेक्टरमधील विविध पिकांचे सिंचन व्हायचे. ताेतलाडाेह प्रकल्पातील पाणी पेंच प्रकल्पात साेडून पुढे ते कालव्याद्वारे ओलितासाठी दिले जाते.

ताेतलाडाेह प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ही १,०१६ दलघमी तर पेंच जलाशयाची एकूण पाणी साठवण क्षमता १,३४६ दलघमी आहे. याच नदी मध्य प्रदेशातील चाैराई (जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) येथे माचागाेरा चाैराई धरणाची निर्मिती करण्यात आली असून, सन २०१६ पासून पाणी साठवायला सुरुवात झाली. परिणामी, पेंच नदीद्वारे मध्य प्रदेशातून येणार पाणी चाैराई धरणात अडविण्यात आल्याने ताेतलाडाेह व पेंच प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरणे बंद झाले. याचा परिणाम या दाेन्ही प्रकल्पाच्या सिंचन क्षमतेवर अर्थात त्यावर अवलंबून असलेल्या दाेन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झाला.

ही समस्या साेडविण्यासाठी राज्य शासनाने लाेहघाेगरी प्रकल्पाला २०१८ साली मंजुरी दिली. हा प्रकल्प मध्य प्रदेशतील कन्हान नदीवर असून, त्यातील पाणी टनेलद्वारे ताेतलाडाेह प्रकल्पात साेडले जणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प आशेचा किरण बनला असून, ताे पूर्णत्वास कधी जाते याकडे नागपूर व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

...

४२१ दलघमी पाण्याची कमतरता

चाैराई धरणामुळे ताेतलाडाेह व पेंच प्रकल्पांमध्ये एकूण ४२१ दलघमी पाण्याची कमतरता जाणवायला सुरुवात झाली. लाेहघाेगरी (मध्य प्रदेश) येथून ६५ किमीचा टनेल तयार करून त्यातील पाणी ताेतलाडाेह जलाशयात साेडण्याची याेजनाही राज्य शासनाने आखली व त्याला मंजुरी दिली. लाेहघाेगरी जमघाट (मध्य प्रदेश)पासून आठ किमी अंतरावर आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी राज्य शासनाने २,५०० काेटी रुपये मंजूर केले आहेत. या प्रकल्पातून ३०० दलघमी पाणी मिळणार आहे. या पाण्यापासून १६० मेगावॅट विजेचे उत्पपादनही हाेणार आहे.

....

सन २०१८ च्या पुनरावृत्तीची शक्यता

चाैराई धरणामुळे ताेतलाडाेह व पेंच जलाशयातील पाणीसाठा कमी झाल्याने सन २०१८ मध्ये नागपूर व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळाले नव्हते. त्यामुळे धानाच्या पिकाचे माेठे नुकसान झाले हाेते. शिवाय, या दाेन्ही जिल्ह्यांमध्ये १५ ऑगस्टपर्यंत पाऊस न झाल्याने धानाच्या राेवण्याही रखडल्या हाेत्या. त्यानंतर सन २०१९ व २०२० साली ताेतलाडाेह व पेंच प्रकल्प ओव्हरफ्लाे झाले हाेते. लाेहघाेगरी प्रकल्पा लवकर पूर्णत्वास न गेल्यास सन २०१८ ची पुनरावृत्ती हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.