शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

आठ कोटी गॅस कनेक्शन्सचे गौडबंगाल; फसवी घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 12:46 IST

यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत आठ कोटी महिलांना स्वयंपाकाच्या गॅसचे कनेक्शन्स देण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा फसवी आहे.

ठळक मुद्देआकडेवारीत तफावत

सोपान पांढरीपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत आठ कोटी महिलांना स्वयंपाकाच्या गॅसचे कनेक्शन्स देण्याची घोषणा केली आहे.ही घोषणा फसवी आहे. कारण २०१४ साली देशाची लोकसंख्या १२१ कोटी होती व कुटुंबांची एकूण संख्या २४.६६ कोटी होती व त्यापैकी ६६ टक्के म्हणजे १६.२५ कोटी कुटुंबांकडे गॅस कनेक्शन होते असे पेट्रोलियम मंत्रालयाच्या संकेतस्थळावर नमूद आहे.भारताची लोकसंख्या दरवर्षी १.२० टक्क्याने वाढते. २०१७ साली भारताची लोकसंख्या १२५.३५ कोटी होती व कुटुंबांची संख्या २५.०७ कोटी आहे.२०१८ मध्ये लोकसंख्या १२६.८५ कोटी व कुटुंबांची संख्या २५.३७ कोटी असेल असे मानव विकास मंत्रालयाचे संकेतस्थळ सांगते. दुसरीकडे पेट्रोलियम मंत्रालयाच्याच संकेत स्थळानुसार २०१४ ते २०१७ या काळात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत दोन कोटी गॅस कनेक्शन्स दिल्याने एकूण गॅस कनेक्शन्स १९ कोटी झाल्याचे दिसते.२०१८ ची अंदाजित लोकसंख्या १२६.८५ व कुटुंबांची अंदाजित संख्या २५.३७ कोटी आहे. जर १९ कोटी गॅस कनेक्शन्समध्ये ८ कोटीची भर २०१८ मध्ये पडली तर एकूण कनेक्शन्स २७ कोटींवर जाईल. तेव्हा ही १.६३ कोटी कुटुंबे जेटली कुठून आणणार हा खरा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर अर्थसंकल्पात नाही.

टॅग्स :Governmentसरकार