शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

बडोद्यातील  साहित्य संमेलनातील निमंत्रितांना मानधन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 21:19 IST

यंदा बडोद्यात आयोजित करण्यात आलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्या निमंत्रकांना मानधन व प्रवासभत्ता देण्यात येणार नाही. इच्छुकांनीही स्वखर्चाने यावे, असे आवाहन संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केले.

ठळक मुद्देइच्छुकांनी स्वखर्चाने यावे : संमेलनाच्या आयोजकांचे पत्रपरिषदेत आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : यंदा बडोद्यात आयोजित करण्यात आलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्या निमंत्रकांना मानधन व प्रवासभत्ता देण्यात येणार नाही. इच्छुकांनीही स्वखर्चाने यावे, असे आवाहन संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केले. त्यांच्या आवाहनाला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनीही दुजोरा दिला. परंतु आयोजकांच्या या आवाहनाला साहित्य विश्वातून विविध प्रतिक्रिया उमटत असून, मानधन हा साहित्यिकांचा सन्मान आहे, आयोजक तो कसा नाकारू शकतात. क्षमता नसेल तर हा शिवधनुष्य हातात घेतला कशाला, असा प्रश्न साहित्य विश्वातून विचारला जात आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेत १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान बडोदा येथे होणार आहे. संमेलनात होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या संदर्भात महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी व दिलीप खोपकर यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली. स्वातंत्र्यपूर्व काळात बडोद्यातील संस्थानिकांनी मराठी भाषा व संस्कृती संवर्धनासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी भरपूर काम केले आहे. त्यामुळे संमेलनाच्या परिसराला ‘ महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी ’ असे नाव देण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन भारतीय ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त गुजराती लेखक रघुवीर चौधरी यांच्याहस्ते होणार आहे. त्याचबरोबर उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी, महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, गुजरातचे शिक्षणमंत्री चुडासमा उपस्थित राहणार आहे.संमेलनात एकाच परिसरातील विविध स्थळांवर चार परिसंवाद, कविसंमेलन, मान्यवरांचे काव्यवाचन, बोलीतील कविता, स्थानिकांचे बहुभाषिक संमेलन, प्रतिभावंतांचा सहवास, कथा-कथाकार, कथानुभव, टॉक-शो, या अभिनव कार्यक्रमांचे आयोजन मराठी भाषेचे वैभव व गौरवाचे दर्शन घडविणारा मराठी भाषा सुंदरी हा कार्यक्रम होणार आहे. ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, संगीत पहाट, शास्त्रीय गायन आदी कार्यक्रम होणार आहे. संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या कार्य-कर्तृत्वाचे सांगितिक दर्शन, बडोद्याच्या स्थानिक कलावंतांचा सहभाग असलेले बडोदा कला वैभव सोबतच कविकट्टा, प्रकाशन मंच, प्रकाशकांचा मेळावा होणार आहे. बडेजाव करण्यापेक्षा गुणात्मक संमेलनअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतलेल्या भूमिकेनुसार निमंत्रकांचे मानधन, प्रवासभत्ता यावरचा खर्च कमी केला आहे. संमेलनात फार असा बडेजाव केलेला नाही. संमेलन गुणात्मक कसे होईल, यावर आयोजकांचा भर आहे.

टॅग्स :Baroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलनnagpurनागपूर