शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

कृषी क्षेत्रात गुंतवणुकीची योजना

By admin | Updated: June 26, 2017 01:45 IST

राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली आहे. याचा राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस : कर्जमाफी हा अंतिम पर्याय नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली आहे. याचा राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. परंतु कर्जमाफी हा अंतिम पर्याय नाही. कर्जमाफीनंतरही शेतकरी कर्जबाजारी होणार नाही यासाठी कृषी क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची योजना राज्य सरकार राबविणार असून, याबाबतचे नियोजन सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. खापरी येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. कृषी क्षेत्रातील गुंतवणूक योजनेंतर्गत पुढील दोन वर्षांत शेतकऱ्यांना वीज, सिंचन, बाजारपेठ व वेअरहाऊस आदी सुविधा उपलब्ध केल्या जातील. यासाठी केंद्र सरकार व विदेशातून निधी उभारला जाईल. मागील सरकारच्या पापामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. आमच्या सरकारने शेतकऱ्यांना देशात आजवर दिलेल्या कर्जमाफीच्या तुलनेत सर्वाधिक कर्जमाफी दिली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तत्कालीन केंद्रातील यूपीए सरकारने ५२ हजार कोटींची कर्जमाफी दिली होती. यातील केवळ सात हजार कोटींचे कर्ज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे माफ करण्यात आले होते. विद्यमान राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे ३४ हजार कोटींचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचा स्वाभिमान जागृत करून स्वराज्याचे स्वप्न साकार करू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आत्महत्या रोखण्याचे प्रयत्न - गडकरी राज्य सरकारने राज्यातील पाच लाख शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच ३४ हजार कोटींची कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक व संवेदनशील निर्णय घेतला आहे सोबतच शेतकऱ्यांना नव्याने कर्ज उपलब्ध होईल. यातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. सरकारच्या प्रयत्नामुळे शेतकरी आत्महत्या करणार नाही, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिनंदनास पात्र असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केले.