शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

कृषी क्षेत्रात गुंतवणुकीची योजना

By admin | Updated: June 26, 2017 01:45 IST

राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली आहे. याचा राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस : कर्जमाफी हा अंतिम पर्याय नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली आहे. याचा राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. परंतु कर्जमाफी हा अंतिम पर्याय नाही. कर्जमाफीनंतरही शेतकरी कर्जबाजारी होणार नाही यासाठी कृषी क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची योजना राज्य सरकार राबविणार असून, याबाबतचे नियोजन सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. खापरी येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. कृषी क्षेत्रातील गुंतवणूक योजनेंतर्गत पुढील दोन वर्षांत शेतकऱ्यांना वीज, सिंचन, बाजारपेठ व वेअरहाऊस आदी सुविधा उपलब्ध केल्या जातील. यासाठी केंद्र सरकार व विदेशातून निधी उभारला जाईल. मागील सरकारच्या पापामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. आमच्या सरकारने शेतकऱ्यांना देशात आजवर दिलेल्या कर्जमाफीच्या तुलनेत सर्वाधिक कर्जमाफी दिली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तत्कालीन केंद्रातील यूपीए सरकारने ५२ हजार कोटींची कर्जमाफी दिली होती. यातील केवळ सात हजार कोटींचे कर्ज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे माफ करण्यात आले होते. विद्यमान राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे ३४ हजार कोटींचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचा स्वाभिमान जागृत करून स्वराज्याचे स्वप्न साकार करू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आत्महत्या रोखण्याचे प्रयत्न - गडकरी राज्य सरकारने राज्यातील पाच लाख शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच ३४ हजार कोटींची कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक व संवेदनशील निर्णय घेतला आहे सोबतच शेतकऱ्यांना नव्याने कर्ज उपलब्ध होईल. यातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. सरकारच्या प्रयत्नामुळे शेतकरी आत्महत्या करणार नाही, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिनंदनास पात्र असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केले.