शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कृषी क्षेत्रात गुंतवणुकीची योजना

By admin | Updated: June 26, 2017 01:45 IST

राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली आहे. याचा राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस : कर्जमाफी हा अंतिम पर्याय नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली आहे. याचा राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. परंतु कर्जमाफी हा अंतिम पर्याय नाही. कर्जमाफीनंतरही शेतकरी कर्जबाजारी होणार नाही यासाठी कृषी क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची योजना राज्य सरकार राबविणार असून, याबाबतचे नियोजन सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. खापरी येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. कृषी क्षेत्रातील गुंतवणूक योजनेंतर्गत पुढील दोन वर्षांत शेतकऱ्यांना वीज, सिंचन, बाजारपेठ व वेअरहाऊस आदी सुविधा उपलब्ध केल्या जातील. यासाठी केंद्र सरकार व विदेशातून निधी उभारला जाईल. मागील सरकारच्या पापामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. आमच्या सरकारने शेतकऱ्यांना देशात आजवर दिलेल्या कर्जमाफीच्या तुलनेत सर्वाधिक कर्जमाफी दिली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तत्कालीन केंद्रातील यूपीए सरकारने ५२ हजार कोटींची कर्जमाफी दिली होती. यातील केवळ सात हजार कोटींचे कर्ज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे माफ करण्यात आले होते. विद्यमान राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे ३४ हजार कोटींचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचा स्वाभिमान जागृत करून स्वराज्याचे स्वप्न साकार करू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आत्महत्या रोखण्याचे प्रयत्न - गडकरी राज्य सरकारने राज्यातील पाच लाख शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच ३४ हजार कोटींची कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक व संवेदनशील निर्णय घेतला आहे सोबतच शेतकऱ्यांना नव्याने कर्ज उपलब्ध होईल. यातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. सरकारच्या प्रयत्नामुळे शेतकरी आत्महत्या करणार नाही, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिनंदनास पात्र असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केले.