शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

कृषी क्षेत्रात गुंतवणुकीची योजना

By admin | Updated: June 26, 2017 01:45 IST

राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली आहे. याचा राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस : कर्जमाफी हा अंतिम पर्याय नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली आहे. याचा राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. परंतु कर्जमाफी हा अंतिम पर्याय नाही. कर्जमाफीनंतरही शेतकरी कर्जबाजारी होणार नाही यासाठी कृषी क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची योजना राज्य सरकार राबविणार असून, याबाबतचे नियोजन सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. खापरी येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. कृषी क्षेत्रातील गुंतवणूक योजनेंतर्गत पुढील दोन वर्षांत शेतकऱ्यांना वीज, सिंचन, बाजारपेठ व वेअरहाऊस आदी सुविधा उपलब्ध केल्या जातील. यासाठी केंद्र सरकार व विदेशातून निधी उभारला जाईल. मागील सरकारच्या पापामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. आमच्या सरकारने शेतकऱ्यांना देशात आजवर दिलेल्या कर्जमाफीच्या तुलनेत सर्वाधिक कर्जमाफी दिली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तत्कालीन केंद्रातील यूपीए सरकारने ५२ हजार कोटींची कर्जमाफी दिली होती. यातील केवळ सात हजार कोटींचे कर्ज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे माफ करण्यात आले होते. विद्यमान राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे ३४ हजार कोटींचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचा स्वाभिमान जागृत करून स्वराज्याचे स्वप्न साकार करू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आत्महत्या रोखण्याचे प्रयत्न - गडकरी राज्य सरकारने राज्यातील पाच लाख शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच ३४ हजार कोटींची कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक व संवेदनशील निर्णय घेतला आहे सोबतच शेतकऱ्यांना नव्याने कर्ज उपलब्ध होईल. यातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. सरकारच्या प्रयत्नामुळे शेतकरी आत्महत्या करणार नाही, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिनंदनास पात्र असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केले.