शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

सीसीटीव्ही फुटेजपासून तपास

By admin | Updated: January 10, 2016 03:29 IST

मनीषनगरातील पॉप्युलर सोसायटीत राहणारा चैतन्य नेहमीप्रमाणे मोन्टफोर्ट स्कूलच्या बसमधून दुपारी २.४० ला बेलतरोडीच्या बँक आॅफ बिकानेर शाखेजवळ उतरला.

नागपूर : मनीषनगरातील पॉप्युलर सोसायटीत राहणारा चैतन्य नेहमीप्रमाणे मोन्टफोर्ट स्कूलच्या बसमधून दुपारी २.४० ला बेलतरोडीच्या बँक आॅफ बिकानेर शाखेजवळ उतरला. गौरव ढोमणे नामक मित्रासह तो त्याच्या घराजवळ आला असताना अचानक सिल्व्हर कलरची मारुती ईको कार आली आणि त्यातील एका आरोपीने चैतन्यला कारमध्ये कोंबले. दुसऱ्या क्षणाला अपहरणकर्ते पसार झाले. चैतन्यचे अपहरण झाल्याचे गौरवने आपल्या आईला सांगताच ही माहिती चैतन्यची आई सुनंदा, वडील सुभाष आणि त्यानंतर सोनेगाव पोलिसांना कळविण्यात आली. चैतन्यचे अपहरण झाल्याची तक्रार मिळताच शहर पोलीस दल चैतन्य आणि त्याच्या अपहरणकर्त्यांच्या शोधासाठी धावपळ करू लागले. गौरवच्या सांगण्यावरून एका आरोपीचे स्केच काढण्यात आले. तसेच या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलेल्या अपहरणकर्त्यांच्या कारचे चित्र मिळवून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. मात्र, सीसीटीव्हीत कारचा क्रमांक आला नसल्याने आणि अपहरणकर्त्यांकडून खंडणी मागणारा कसलाही फोन न आल्यामुळे तब्बल २१ तास या अपहरणकांडात पोलीस अंधारात चाचपडत होते. मात्र, अखेर शुक्रवारी रात्री १०.३० च्या सुमारास पोलिसांनी अपहरणकर्त्यांना शोधून त्यांच्या तावडीतून चैतन्यची सुटका करण्यात यश मिळवले. तंत्रज्ञानाचा वापरअपहरणकर्त्याने ज्या नंबरवरून फोन केला ते सीम भलत्याच व्यक्तीच्या नावे असल्याने (बनावट नावाने सीम मिळवून) पोलीस काही वेळेसाठी घुटमळले; नंतर मात्र मोबाईलचा सीडीआर काढण्यात आला. धमकी देणारा आरोपी खापा-बडेगाव परिसरात वावरत असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यानच्या कालावधीत नागपुरातील सिल्व्हर कलरच्या १२०० मारुती ईको व्हॅनची पोलिसांनी माहिती मिळविली. त्यातील तीन कारधारक खापा येथे राहतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे कारमालकाला शोधून पोलिसांनी चौकशी केली. एका कारमालकाने आपली कार गुरुवारी नागपूरला भाड्याने गेली होती, असे सांगून कार नेणाऱ्याचे नाव सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता, त्याने ईशाकने १५०० रुपये देऊन कार मागितल्याची माहिती दिली. पोलिसांनी ईशाकचे घर शोधले, मात्र तो घरी नव्हता. ज्या फोनमध्ये दुसऱ्याचे सीमकार्ड टाकून वापरले तो मोबाईल फोन ईशाकच्या नावे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या अपहरणात ईशाक असल्याचा पोलिसांचा संशय घट्ट झाला. त्यांनी ईशाकचा शोध घेण्यासाठी या भागात नाकाबंदी लावली. वाहनांची झडती घेण्यात येत होती. त्याच्या मित्रांकडेही विचारणा केली जात होती. तब्बल १२ तपास पथके ईशाकला शोधू लागली. या भागातील सर्व मार्गांवर पोलीस दबा धरून बसले. रात्री १०.३० च्या दरम्यान बडेगाव जंगलातून मोटरसायकल येत असल्याचे दिसताच पोलीस सतर्क झाले. मोटरसायकल ईशाक चालवत होता अन् मागे चैतन्य बसला होता. ईशाकने स्वत:ची अन् चैतन्यची ओळख देतानाच आपण त्याला जवळच्या पोलीस ठाण्यात नेऊन सोडण्यासाठी निघाल्याचे म्हटले. त्याचवेळी पोलिसांनी त्याची मानगूट पकडून चैतन्यला जवळ घेतले.