शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

पात्रता निकष डावलून दिलेले प्रवेश अवैध

By admin | Updated: September 24, 2016 01:13 IST

अमरावती येथील दोन अभियांत्रिकी महाविद्यालयांनी पात्रता निकष डावलून दिलेले प्रवेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध ठरविले आहेत

हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय : अभियांत्रिकी महाविद्यालयांना दणकानागपूर : अमरावती येथील दोन अभियांत्रिकी महाविद्यालयांनी पात्रता निकष डावलून दिलेले प्रवेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध ठरविले आहेत. यामुळे महाविद्यालयांना जोरदार दणका बसला आहे.न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अतुल चांदूरकर यांनी हा निर्णय दिला. विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारे संचालित प्रा. राम मेघे अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय आणि श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाद्वारे संचालित अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात हे अवैध प्रवेश देण्यात आले. तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालकांनी १३ आॅगस्ट २०१६ रोजी दोन्ही महाविद्यालयांना पत्र पाठवून पात्रता निकष डावलून दिलेले प्रवेश अमान्य केले. याविरुद्ध महाविद्यालयांनी दोन रिट याचिका दाखल केल्या होत्या. न्यायालयाने या याचिका खारीज करून वरीलप्रमाणे निर्णय दिला.अभियांत्रिकी अभ्यासक्रमांतील एकूण जागांमध्ये २० टक्के व्यवस्थापन कोटा असतो. तसेच, केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनंतर रिक्त राहिलेल्या जागाही महाविद्यालयस्तरावर भरता येतात. परंतु, या जागा भरताना पात्रता निकष व गुणवत्ता डावलता येत नाही. नियमानुसार गुणवत्ता यादी तयार करून प्रवेश देणे आवश्यक आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांतील प्रवेशाकरिता अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के तर, आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५ टक्के गुणांची पात्रता निश्चित केली आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला ११ मार्च २०१६ पासून सुरुवात झाली. तेव्हापासून हे निकष अमलात आणण्यात आले. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत याच निकषानुसार सर्व प्रवेश देण्यात आले. यानंतर रिक्त राहिलेल्या जागा व व्यवस्थापन कोट्यातील जागा महाविद्यालयांना आपापल्यास्तरावर भरायच्या होत्या. यासंदर्भात २८ जुलै २०१६ रोजी परिपत्रक जारी करण्यात आले. असे असतानाही याचिकाकर्त्या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना पात्रता निकष डावलून प्रवेश दिलेत. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अक्षय सुदामे व अ‍ॅड. रणजित भुईभार तर, शासनातर्फे सहायक वकील नितीन रोडे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)संस्थेला तंबीया प्रकरणात श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने २१ आॅगस्ट २०१६ रोजी न्यायालयाच्या आदेशाबाबत गैरसमज पसरवणारी जाहिरात वृत्तपत्रांमध्ये दिली होती. न्यायालयाने यासंदर्भात कडक भूमिका घेऊन भविष्यात पुन्हा अशी चूक केल्यास गंभीर दखल घेतली जाईल अशी तंबी संस्थेला दिली.