शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक

By admin | Updated: January 26, 2017 02:55 IST

राज्यातील २५ जिल्हा परिषदेत निवडणूक रणधुमाळी सुरू झालेली असून नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक काही काळ लांबली आहे.

जिल्हा परिषद निवडणूक : ‘आरक्षण’ वाढवितेय डोकेदुखी गणेश खवसे   नागपूर राज्यातील २५ जिल्हा परिषदेत निवडणूक रणधुमाळी सुरू झालेली असून नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक काही काळ लांबली आहे. वानाडोंगरी आणि पारशिवनीचा वाद न्यायालयापर्यंत पोहोचून त्यावर तोडगासुद्धा निघाला. यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झालेला असला तरी त्यासाठी किमान दोन महिन्यांचा वेळ लागणार आहे. त्यातच जिल्हा परिषद क्षेत्राचे पूर्वी काढण्यात आलेले आरक्षण तर बदलणार नाही ना, अशी चिंता आता इच्छुक उमेदवारांची डोकेदुखी वाढवित आहे. परिणामी इच्छा असतानाही त्यांना प्रचारात ‘रस’ दिसून येत नाही. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली होती. २०१२ च्या निवडणुकीनंतर मौदा आणि महादुला या नगर पंचायती अस्तित्वात आल्या. त्यानंतर कन्हान आणि वाडी नगर परिषदेला दर्जा मिळाला. तर काही महिन्यांच्या अवधीनंतर कुही, भिवापूर आणि हिंगणा नगर पंचायत झाली. वाडी नगर परिषद होताच तेथील जिल्हा परिषद सदस्याचे सदस्यत्व रद्द झाले. तर मौदा, महादुला, कन्हान, कुही, भिवापूर आणि हिंगणा या क्षेत्रातील सदस्यांचा मतदारसंघ काही प्रमाणात प्रभावित झाला. परंतु सदस्य मात्र कायम राहिले. या सर्व हालाचालीनंतर ५९ सदस्यसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या ५८ वर आली. तेवढ्याच सदस्यसंख्येचा विचार करून प्रभाग रचना निश्चित करण्यात आली. सोबतच आरक्षण सोडतही काढण्यात आली. दरम्यान राज्य शासनाने वानाडोंगरीला नगर परिषदेचा तर पारशिवनीला नगर पंचायतीचा दर्जा दिला. त्यामुळे त्या क्षेत्रातील जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक रद्द करण्यासाठी हालचाली सुरू होऊन याचिका दाखल करण्यात आली होती. याबाबत सर्व विचार करता नगर क्षेत्रात जिल्हा परिषदेने निवडणूक घेऊ नये, असे स्पष्ट करीत उर्वरित ठिकाणच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. मात्र दोन ठिकाणच्या जागांसाठी निवडणूक न घेतल्यास या दोन मतदारसंघातील ग्रामीण क्षेत्रातही निवडणूक होणार नाही, ही बाब समोर करीत पुन्हा नव्याने प्रभागरचना निश्चित करण्यात यावी, ही मागणी समोर आली. त्यानुसार आता नव्याने प्रभागरचना निश्चित केली जाणार आहे. असे केल्यास संबंधित क्षेत्रातील आरक्षण तर बदलणार नाही ना, अशी चिंता इच्छुक उमेदवारांना सतावत आहे. नवी प्रभागरचना, ५८ जागा जिल्हा परिषदसाठी पूर्वी ५९ सदस्य होते. वाडी नगर परिषद होताच एक सदस्य कमी झाला. नगर पंचायती झाल्या तरी अर्ध्यापेक्षा जास्त क्षेत्र ग्रामीण असल्याने सदस्यत्व कायम राहिले. या निवडणुकीसाठी ५८ जागांसाठी आरक्षण काढण्यात आले होते. परंतु पारशिवनीचे नगरपंचायतमध्ये व वानाडोंगरी नगर परिषदेत रूपांतर झाल्याने जागा कमी होण्याची सर्वाधिक शक्यता होती. परंतु माहितीनुसार तेवढ्याच अर्थात ५८ जागा कायम राहणार आहेत. हिंगणा तालुक्यात आठपैकी आता सात तर उमरेड तालुक्यात एक जिल्हा परिषद क्षेत्र वाढणार असल्याची माहिती आहे. दोन महिन्यानंतरच निवडणूक दोन जिल्हा परिषद क्षेत्र नगर परिषद व नगर पंचायतीमुळे बाधित झाल्याने निवडणूक लांबणीवर पडली. यासाठी आता नव्याने प्रभाग पुनर्रचना, आरक्षण आदी करावे लागणार आहे. यासाठी साधारणत: दोन महिन्यांचा कालावधी लागणार असून त्यानंतरच निवडणूक होईल. पूर्णच क्षेत्राची पुनर्रचना केली जाणार नसून केवळ वानाडोंगरीसाठी हिंगणा आणि पारशिवनी नगर पंचायतसाठी पारशिवनी तालुक्याची पुनर्रचना केली जाणार असून उमरेडमध्ये एक जागा वाढविण्यासाठी तेथेही थोडेफार बदल होणार आहे. उर्वरित आरक्षण आणि सर्कल ‘जैसे थे’ राहतील.