शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल चोरट्याची आंतरराज्यीय टोळी जेरबंद : सात जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 23:47 IST

ठिकठिकाणचे मोबाईल चोरून ते झारखंड मार्गे बांगलादेशात पाठविणाऱ्या मोबाईल चोरट्याची आंतरराज्यीय टोळी धंतोली पोलिसांनी जेरबंद केली.

ठळक मुद्देसूत्रधारासह दोघे पळून गेले : सात मोबाईल जप्त : धंतोली पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ठिकठिकाणचे मोबाईल चोरून ते झारखंड मार्गे बांगलादेशात पाठविणाऱ्या मोबाईल चोरट्याची आंतरराज्यीय टोळी धंतोली पोलिसांनी जेरबंद केली. या टोळीतील सात आरोपींना पोलिसांनी अटक केली तर, सूत्रधारासह दोघे फरार झाले. टोळीत १० आणि १२ वर्षांच्या दोन बालकांचाही समावेश आहे, हे विशेष !आफताब ईबरार अन्सारी (वय १९, रा. भागलपूर, बिहार), अमरजीतकुमार गंगा महतो (वय १९), विशालकुमार गंगा महतो (वय २०), धर्मेंद्रकुमार बिहारी मंडल (वय १९), भोला बोधन महतो (वय २२), आस्तिक अनिल घोष (वय २०) आणि नंदकुमार उपेंद्र चौधरी (वय २०, सर्व रा. झारखंड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचे ७ मोबाईल जप्त केले. या टोळीचा सूत्रधार अमरजीत कुमार मंडल असून तो आणि त्याचा एक साथीदार मात्र पोलिसांच्या कारवाईनंतर नागपुरातून पळून गेला.अमरजीत मंडल आणि त्याच्या टोळीतील गुन्हेगार ठिकठिकाणी भाड्याने खोली घेऊन राहतात. उपरोक्त चोरट्यातील काही जण जोगीनगरात आणि काही जण ओंकार नगरात भाड्याने राहत होते. गर्दीची ठिकाणे किंवा आठवडी बाजारात शिरून ही टोळी बेमालूमपणे मोबाईल चोरतात. मोबाईल चोरल्यानंतर तो अल्पवयीन साथीदारांकडे दिला जातो. आठवडाभरात चोरलेले मोबाईल आणि झारखंडला आणि नंतर बांगलादेशला पाठविले जातात.गणेशचतुर्थी निमित्त मोठ्या प्रमाणात हार फुलांची मागणी होते. त्यामुळे सावनेर येथील विक्रांत चलपे १ सप्टेंबरला सकाळी ९ वाजता धंतोलीतील नेताजी फुल मार्केटमध्ये फुल घ्यायला आले होते. संधी साधून आफताब अन्सारीने चपलेच्या खिशातील १५ हजारांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्कतेमुळे अन्सारीला चपलेने रंगेहात पकडले. यावेळी बाजारात मोठी गर्दी होती. गोंधळ उडाल्याने पोलीसही पोहचले. पोलिसांनी आफताफ अन्सारीची तपासणी केली असता त्याच्याकडे तीन मोबाईल आढळले. त्यामुळे त्याला ठाण्यात नेऊन बोलते करण्यात आले. तेथे मोबाईल चोरीची कबुली देताना अन्सारीने आपले साथीदार जोगीनगरात राहत असल्याचे सांगितले. त्यावरून धंतोली पोलिसांनी तेथे छापा मारला. त्यावेळी पोलिसांना दोन बालकांसह ९ आरोपी सापडले. पोलिसांनी त्यांच्याकडून ४ (एकूण सात) मोबाईलही जप्त केले.पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता ही टोळी नागपूरसह ठिकठिकाणी भाड्याने राहून गर्दीच्या ठिकाणावरून मोबाईल चोरत असल्याचे उघड झाले. मोबाईल चोरताच चोरटा दुसºयाच्या आणि दुसरा तिसºयाच्या हातात देऊन दूर निघून जातो. झटपट चोरी झाल्याचे लक्षात आले तर संबंधित व्यक्ती संशयिताची झडती घेते मात्र त्याच्याकडे काहीच हाती लागत नाही. त्यामुळे पीडित तेथून निघून जातो आणिं चोरटाही सटकतो. मोबाईल चोरीत बालकांचाही पुढाकार असतो. अशा प्रकारे दर आठवड्यात किंवा पंधरवड्यात चोरलेले सर्व मोबाईल झारखंडमधील सूत्रधारांच्या हवाली केले जातात. तेथून ते बांगलादेशात पाठवून त्याची विक्री केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून या टोळीने ठिकठिकाणी चोरलेले हजारो मोबाईल बांगलादेशात पाठविले आहे. या टोळीतील चोरटे ९ सप्टेंबरपर्यंत पोलिसांच्या कस्टडीत असून त्यांच्याकडून अनेक मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलीस वर्तवित आहेत. पोलीस उपायुक्त विनिता साहू, सहायक आयुक्त राजेंद्र बोरावके यांच्या मार्गदर्शनाखाली धंतोलीचे ठाणेदार विजय आकोत यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक नरोटे, हवालदार आसिफ शेख, शिपायी वीरेंद्र गुळरांधे, विनोद कळसकर आणि देवेंद्र बोंडे यांनी ही कामगिरी बजावली.पगारदार चोरटे !एका झटक्यात ५ ते ५० हजारांपर्यंत मोबाईल चोरणारे हे चोरटे दिवसभरात किमान चार ते पाच मोबाईल चोरतात. अर्थात् सरासरी ते ४० ते ६० हजारांचे मोबाईल चोरतात. मात्र, त्यांना त्यांची किंमत पगाराच्या रुपात मिळते. ज्याने जेवढे मोबाईल चोरले, त्याला तेवढा जास्त पगार मिळतो. तो पाच ते १५ हजारांच्या दरम्यान असतो. अर्थात् कुणाला पाच हजार रुपये महिना मिळतो तर कुणाला १५ हजार रुपये मिळतात. बालकांचाही पगार याच स्वरूपात असतो.

टॅग्स :MobileमोबाइलtheftचोरीArrestअटक