शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन; हेकेखोरपणामुळे बोलीभाषेचे अस्तित्व संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 10:29 IST

अतिशुद्धीकरणाच्या अट्टाहासाने आणि इंग्रजीसाठीच्या हेकेखोरपणामुळे मराठी बोलीभाषा संपत असल्याचे संकेत सापडत आहेत.

प्रवीण खापरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या प्रमाणे मातेच्या उदरातून आपण जन्म घेतो, त्याच प्रमाणे प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या भाषेच्या उदरातच जन्माला येतो. तीला आपली मातृभाषा म्हटली जाते आणि मातृभाषेविषयी प्रत्येकाला प्रचंड आस्था असते.मात्र, अतिशुद्धीकरणाच्या अट्टाहासाने आणि इंग्रजीसाठीच्या हेकेखोरपणामुळे मराठी बोलीभाषा संपत असल्याचे संकेत सापडत आहेत. जगपातळीवर प्रत्येक भाषांची एक मुळ प्रमाणभाषा असते आणि त्याला जोडून नजिकच्या प्रदेशातील स्थळ, काळ आणि वातावरणानुसार भाषेची लय बदलत जाते. त्यात त्या त्या भागातील म्हणींचा वापर होतो, त्या प्रदेशाला अनुसरूण शब्दांची भर पडली असते, तेथील नागरिकांचा स्व:भावधर्मही त्यात उतरतो. तिच लय बोलिभाषा म्हणून प्रचलित होते.अशा बोलीभाषांची विशिष्ट लिपी नसते. प्रमाणभाषेच्या लिपितच या भाषा समाविष्ट होतात. जंगलात राहणाऱ्या आदिम जमातींच्या भाषांची स्वत:ची अशी लिपी नाही. या भाषाही बोलिभाषा म्हणून संबोधल्या जातात. पिढी दर पिढी या बोलिभाषा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होत आल्या आहेत. या बोलींमधील साहित्य हे पिढ्यांच्या स्मरणशक्तीवरच टिकून राहील्या. त्यात म्हणी, गाणी, दंतकथांचा समावेश होतो. या सगळ्या बोलीभाषा कुणाच्या तरी मातृभाषाच आहेत. अहिराणी, कोंकणी, वºहाडी, झाडीबोली, गोंडी, माणदेशी, मालवणी, तमिळनाडूमध्ये तंजावूर येथे बोलली जाणारी तंजावरी या भाषा मराठीतील बोलीभाषा आहेत.हा गोडवा त्याच्या त्याच्या मातृभाषेचा आहे. मात्र, हा गोडवा पुढे राहील का? अशी भिती वाटायला लागली आहे. त्याचे कारण म्हणजे, शाळांतून बोलिभाषेला गावंढळ म्हटले जाऊन विद्यार्थ्यांच्या तोंडी प्रमाणभाषेचा आग्रह धरला जातो आणि ज्या भागात प्रमाणभाषेचे प्राबल्य आहे, तेथे पालकांकडून इंग्रजीचा अट्टहास धरला जात आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठीचे प्रयत्न अद्याप फलित झालेले नाही आणि सरकारकडूनच मराठीला दुय्यम वागणूक दिली जाऊन मराठी शाळा बंद पाडल्या जात आहेत.

जिथे जावे, तिथे गोडवाप्रत्येक जिल्ह्णानूसार, जाती-धर्मानुसार भाषेच्या विशिष्ट शैलीही जपल्या जातात. जसे नागपूरची बोलीभाषा, अमरावतीपेक्षा भिन्न आहे. भंडारा, गोंदिया येथील भाषेची लहेजा आणि चंद्रपूर, गडचिरोलीपेक्षा वेगळाच भासतो. विदर्भाच्या पलिकडे गेले तर वाशिम, नांदेड, लातूर मध्ये भाषेचा स्वर बदललेला असतो. पुण्यापेक्षा मुंबईच्या बोलीत अंतर आहे. तिकडे पुन्हा धाराशिव, कोल्हापूर, सातारा येथील भाषेत भिन्नता सापडते आणि कोकणात वेगळ्या मराठी बोलीचा स्वर कानावर पडतो तर कोष्टी समाजाची कोष्टी बोली, कुणबी समाजाची कुणबी बोली, सिंध्यांची सिंधी बोली अन् मारवाड्यांची मारवाडी बोली याही कानावर पडतच असतात.

या दिनाचा संदर्भ२१ फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस जगभरात साजरा केला जातो. मुळात बांग्लादेशी नागरीकांच्या बॉन्ग्ला भाषा आंदोलनामुळे, हा दिवस युनेस्कोतर्फे सन २००० पासून जगभरात साजरा केला जातो. या दिवसाला नोव्हेंबर १९९९मध्ये मान्यता प्राप्त झाली. स्व:भाषा संवर्धन आणि बोलण्याचा अधिकार हा संदर्भ या मातृभाषा दिवसाच्या मागचा आहे.

टॅग्स :marathiमराठी