शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर अंतर्गत गटबाजीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 21:55 IST

यवतमाळ येथे होऊ घातलेले ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. अशावेळी एकीकडे यजमान संस्थेद्वारे आयोजनाची तयारी आणि त्यासाठी आवश्यक आर्थिक जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न सुरू असताना याचवेळी आयोजन समितीतील अंतर्गत गटबाजीने अस्वस्थता निर्माण केली आहे. अंतर्गत पडलेले हे गट एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात कामामध्ये ढवळाढवळ करून काही व्यक्ती आणि गटाकडून यजमान संस्था आणि साहित्य महामंडाळवरच दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे संमेलनावर गटबाजीचे सावट निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देकुरघोडीच्या प्रयत्नात आयोजन समिती, महामंडळावर दबाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यवतमाळ येथे होऊ घातलेले ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. अशावेळी एकीकडे यजमान संस्थेद्वारे आयोजनाची तयारी आणि त्यासाठी आवश्यक आर्थिक जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न सुरू असताना याचवेळी आयोजन समितीतील अंतर्गत गटबाजीने अस्वस्थता निर्माण केली आहे. अंतर्गत पडलेले हे गट एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात कामामध्ये ढवळाढवळ करून काही व्यक्ती आणि गटाकडून यजमान संस्था आणि साहित्य महामंडाळवरच दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे संमेलनावर गटबाजीचे सावट निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.मराठी साहित्य संमेलन म्हणजे तमाम महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक समजले जाते. त्यामुळे आयोजनाचे यजमानपद मिळणे आणि त्याचा भाग होणे अभिमानाची बाब मानली जाते. ही संधी दुसऱ्यांदा यवतमाळला मिळाल्याने विदर्भ साहित्य संघाच्या यवतमाळ शाखेसाठी गौरवाची बाब असून तेवढीच ते यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे. कोणतेही मोठे आयोजन करताना आर्थिक गरज हा मोठा भाग असतो. यवतमाळ जिल्ह्यात सध्या भीषण दुष्काळाची स्थिती असल्याने आर्थिक गरज भागविण्याचे मोठे यत्न यजमान संस्थेला करावे लागत आहे. अशात ऐक्याने काम करण्याऐवजी गटबाजीतच धन्यता मानणाऱ्यांमुळे संमेलनाच्या प्रतिमेला तडा देण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र आहे.संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महामंडळातर्फे नुकतीच आयोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली. त्या बैठकीनुसार ठरलेली रूपरेखा महामंडळासोबतच्या बैठकीत मांडण्यात आली. यावेळी बैठकीत एका असंतुष्ट गटाने काही नवीन नावे घुसविण्याचा आग्रह धरल्याची माहिती यजमान संस्थेच्या सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. महामंडळाला स्वत:ला कोणतेच नाव एकदा निर्णय झाल्यावर सुचविता येत नसल्याचे नियम सांगून झाल्यावरही या गटाने बैठकीत नाराजी व्यक्त करून बाहेर अकारणच आदळआपट केल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे सदस्यांमधील ही गटबाजी कोणत्या टोकाला जाते, हे दिसून येत आहे. यादरम्यान यापूर्वी संमेलनाध्यक्ष झालेल्या महिला साहित्यिकांच्या साहित्यकृतीचा आढावा घेणाऱ्या एका स्टॉलची व्यवस्था करण्याचे मनोगत यजमान संस्थेने व्यक्त केले. या स्तुत्य उपक्रमावर कुणाकडूनही आक्षेप घेण्याचे कारण नव्हते. मात्र याबाबत विचारणा केली असता महामंडळाला कुठलीही कल्पना नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आयोजन संस्था आणि महामंडळ यांच्यात समन्वयच नसल्याचे चित्र त्यामुळे जाणीवपूर्वक उभे केले जात असल्याचा संशय व्यक्त होतो.वास्तविक संमेलनाध्यक्षाची निवडणूक रद्द केल्याने यातील राजकारण संपले, असे बोलले जात असले तरी आयोजनाच्या ठिकाणचे राजकारण माणसांची गटबाजी संपण्याचे चिन्ह दिसून येत नाही. वर्चस्वाची भावना व एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात यजमान संस्था आणि महामंडळावर दबाव आणून संमेलनच वेठीस धरण्याचा प्रयत्न काही लोक करीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे संमेलनावर अंतर्गत कलहाचे सावट निर्माण करण्याच्या मागे कोण कार्यरत आहे, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.स्टॉल नोंदणीला सुरुवातसंमेलनाच्या तयारीबाबत यजमान संस्थेचे कार्याध्यक्ष रमाकांत कोलते यांच्याशी संपर्क केला असता, राज्यभरातून येणाऱ्या पुस्तक विक्रेते व इतर संस्थांची स्टॉल नोंदणी सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय स्मरणिका निर्मितीचे कार्य व पाहुण्यांच्या निवास व्यवस्थेची तयारी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. आर्थिक अडचण नक्कीच आहे आणि यवतमाळसारख्या लहान शहरात निधी संकलन ही मोठी जबाबदारी आहे. मात्र हे संमेलन आपण यशस्वीपणे पार पाडू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनYavatmalयवतमाळ