शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

करिअर निवडताना आवड महत्त्वाची

By admin | Updated: September 15, 2014 01:02 IST

दहावी, बारावीनंतर करिअरचे निर्णायक वळण येते. विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना फार गोंधळून जायला नको. आपली आवड आणि कल कशात आहे ते प्रथम ठरवा. यावरून आपले करिअर निवडा.

बारावी नंतर पुढे काय? : लोकमत युवा नेक्स्ट आणि नूतन भारत ज्युनियर कॉलेज यांचा कार्यक्रमनागपूर : दहावी, बारावीनंतर करिअरचे निर्णायक वळण येते. विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना फार गोंधळून जायला नको. आपली आवड आणि कल कशात आहे ते प्रथम ठरवा. यावरून आपले करिअर निवडा. दहावी नंतर विषयाची निवड करताना कोणत्या विषयाचा फायदा पुढे होईल याची माहिती घेऊन त्याची निवड करा. करिअरबाबत जे ठरवले आहेत, त्यात यश संपादित करण्यासाठी अधिक परिश्रम करण्याची तयारी ठेवा, असा संवाद मानसशास्त्रज्ञ व मोटिव्हेशनल ट्रेनर, सोशल सायन्स व्हीएनआयटीचे विभाग प्रमुख डॉ. योगेश देशपांडे यांनी विद्यार्थ्यांशी साधला.दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांना करिअर घडविण्याचे वेध लागतात. विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत सर्वजणच करिअर निवडीच्या चिंतेत असतात. अशा विद्यार्थ्यांना व पालकांना करिअर म्हणजे नेमके काय, हे कळण्यासाठी लोकमत युवा नेक्स्ट व भारतीय विद्या प्रसारक संस्था व नूतन भारत कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने रविवारी सकाळी करिअर गायडन्स कार्यक्र मांतर्गत दहावी व बारावी नंतर पुढे काय, या विषयावर मार्गदर्शन कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. सिव्हिल लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला मुख्य वक्ता म्हणून प्रा. संजय कुळकर्णी (पुणे) तर प्रमुख पाहुणे म्हणून किरण गडकरी, मनोज वाखरे, गाडे, प्रा. विजय दुबे, श्रीमती प्रधान व हारोडे भारतीय विद्या प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष बी.एम. शास्त्री, सचिव रमेश बक्षी, उपाध्यक्ष मिलिंद महाजन, सहसचिव अतुल गाडगे आदी उपस्थित होते. विद्यार्थी तसेच पालकांचा या कार्यक्र माला भरभरून प्रतिसाद लाभला. प्रा. देशपांडे यांनी करिअर निवडताना विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टीचा आवर्जून विचार करावा, कशाच्या आधारावर करिअर निवडावे आदींबाबत यावेळी विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)या तीन गोष्टी महत्त्वाच्याप्रा. संजय कुलकर्णी म्हणाले, विद्यार्थ्यांचे करिअर घडवताना अनेक पालकांना प्रश्न पडतो की, स्कोप कशात जास्त आहे. स्कोपवर करिअरची निवड करण्यापेक्षा या तीन गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे आहे. एक मुलाची आवड, दुसरी त्याची क्षमता, तिसरी महत्त्वाची त्याची पात्रता याचा विचार करून करिअर निवडले पाहिजे. अनेकजण उपलब्ध कोर्सपैकी सुरिक्षत करिअरची निवड करतात. करिअरच्या बाबतीत फार चोखंदळ बनू नका. आवडीचे करिअर तयार करण्यासाठी प्रयत्न करा. दुर्दैवाने आवडीचे करिअर मिळाले नाही तर निराश होऊ नका. करिअर म्हणजे आयुष्य जगण्याचा मार्ग. त्यासाठी सर्वस्व पणाला लावा, असा सल्लाही त्यांनी दिला.