शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

बालकांसाठी काम करणाऱ्या संस्थांवर येणार गाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 12:19 IST

बाल न्याय अधिनियम २०१५ व महाराष्ट्र राज्य बाल न्याय नियम २०१८ अन्वये शासनाने बालकांसाठी काम करणाऱ्या संस्थांना नोंदणी करणे अनिवार्य केले आहे.

ठळक मुद्दे३० आॅगस्ट नोंदणीची अंतिम तिथी अन्यथा गुन्हे दाखल करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाल न्याय अधिनियम २०१५ व महाराष्ट्र राज्य बाल न्याय नियम २०१८ अन्वये शासनाने बालकांसाठी काम करणाऱ्या संस्थांना नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. येत्या ३० आॅगस्टपर्यंत ही नोंदणी करायची आहे. ज्या संस्था नोंदणी करणार नाही, त्या संस्था बंद पाडून, संबंधित संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.बालकांची काळजी आणि संरक्षणासाठी शासक ीय संस्थांबरोबरच स्वयंसेवी संस्थासुद्धा कार्यरत आहेत. दत्तकगृह, बालगृह मुलांची काळजी आणि संरक्षणाचे काम करतात. नागपूर जिल्ह्यात ख्रिश्चन मिशनरी, स्वयंसेवी संस्था व शासनाचे दत्तकगृह व बालगृह आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांनी अधिकृत नोंदणी केली नाही. परंतु गेल्या काही वर्षांत देशात बालकांच्या बाबतीत घडत असलेल्या अत्याचाराच्या घटना, दत्तकगृहातून होणाऱ्या मानवी तस्करीच्या घटना लक्षात घेता, सर्व स्वयंसेवी संस्थांचे बालगृह व दत्तकगृह शासनाच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी त्यांची नोंदणी करण्याचा निर्णय महिला व बालकल्याण आयुक्तालयाने घेतला आहे. या नोंदणीसाठी विभागाच्या वेबसाईटवर अर्जसुद्धा उपलब्ध आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ३२ स्वयंसेवी संस्थांनी नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. ज्या संस्था अद्यापही अर्ज करू शकल्या नाही त्यांना ३० आॅगस्टपर्यंत शेवटची संधी आहे. त्यानंतर अशा संस्था आढळल्यास थेट कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी विजयसिंग परदेसी यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्य