शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

प्रेरणावाट : निवृत्तीनंतर ‘त्या महिलांनी’ स्वीकारली सामाजिक नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 23:03 IST

माणसाचे आयुष्य मेणबत्तीप्रमाणे असते. पडले असले की नाश पावते आणि जळत असले की इतरांना प्रकाश देत राहते. सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्यही असेच. काहींना ते ‘आता सर्व संपले’ असे वाटते, पण काहींना ते राहिलेल्या आकांक्षा पूर्ण करण्याची संधी वाटते. स्वावलंबीनगरच्या काही महिलांनाही समाजऋण म्हणून दिन, दुखितांच्या सेवेची इच्छा पूर्ण करण्याची संधी सेवानिवृत्तीनंतर मिळाली. त्यांनीही या एक नवीन सुरुवात म्हणून या संधीचे सोने करीत एकत्रितपणे ‘पूर्णब्रह्म सेवा समिती’च्या माध्यमातून सेवेचं व्रत स्वीकारले आणि फुलविले.

ठळक मुद्देपूर्णब्रह्म सेवा समितीचे प्रेरणादायी कार्य : गरजवंतांच्या मदतीसाठी पुढे आले हात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माणसाचे आयुष्य मेणबत्तीप्रमाणे असते. पडले असले की नाश पावते आणि जळत असले की इतरांना प्रकाश देत राहते. सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्यही असेच. काहींना ते ‘आता सर्व संपले’ असे वाटते, पण काहींना ते राहिलेल्या आकांक्षा पूर्ण करण्याची संधी वाटते. स्वावलंबीनगरच्या काही महिलांनाही समाजऋण म्हणून दिन, दुखितांच्या सेवेची इच्छा पूर्ण करण्याची संधी सेवानिवृत्तीनंतर मिळाली. त्यांनीही या एक नवीन सुरुवात म्हणून या संधीचे सोने करीत एकत्रितपणे ‘पूर्णब्रह्म सेवा समिती’च्या माध्यमातून सेवेचं व्रत स्वीकारले आणि फुलविले.आयुष्यभर घरासाठी, मुलांसाठी दगदग करताना समाजातील गरजवंतांसाठी काही तरी करण्याची मनोमन इच्छा. परंतु नोकरी आणि घर अशी दुहेरी जबाबदारी सांभाळताना ही इच्छा अपूर्ण राहिली होती. सेवानिवृत्तीनंतर मात्र या मनातल्या इच्छा पूर्ण करण्याची वेळ चालून आली. समाजातील अनाथ, अंध, अपंग, मूकबधिर मुले, वृद्ध व निराधार लोकांसाठी जे शक्य होईल ते करण्यासाठी १० ते १२ महिलांनी एकत्र येऊन ‘पूर्णब्रह्म’ हा उपक्रम सुरू केला. समितीच्या मीना मोहन अमरावतीकर यांनी सांगितले, महिलांनी स्वत:च्या बचतीमधील काही पैसे गोळा करून २०१७ च्या महिला दिनी हा उपक्रम सुरू केला. सुरुवात म्हणून पहिलीच भेट अदासा येथील वृद्धाश्रमाला दिली. त्यावेळी शक्य झाली ती मदत या वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना दिली. पुढे तीन महिन्यानंतर देवलापारजवळच्या निमडोह येथील आश्रमशाळेला भेट दिली. या शाळेत ६०० च्यावर अनाथ व निराधार मुले शिक्षण घेत आहेत. या मुलांना गोडधोड जेवण, शालेय साहित्य व संस्थेला पुस्तकांचा संच भेट दिला.समितीच्या कार्याने प्रेरित होऊन पुढे समाजसेवेची इच्छा असलेल्या अनेक महिलांनी यात सहभाग घेतला आणि पूर्णब्रह्मची संख्या ५० वर गेल्याचे मीना मोहन यांनी सांगितले. आता या उपक्रमाशी निवृत्तच नाही तर गृहिणी आणि नोकरी करणाऱ्या महिलाही जुळल्या आहेत. प्रत्येक महिलेकडून दर महिन्याला ५० रुपये जमा करायचे आणि तीन महिन्यानंतर एका अभावग्रस्त संस्थेला भेट देण्याची योजना बनवायची. पुन्हा शक्य होईल तेवढी राशी गोळा करून संस्थेच्या आवश्यकतेनुसार त्यांना मदत करायची, हा पूर्णब्रह्मचा नित्यक्रम. बाबा आमटे यांच्या आनंदवनमधील भेट अशीच अविस्मरणीय ठरल्याचे त्यांनी सांगितले.समाजाने नाकारलेल्या कुष्ठरुग्णांचे जगणे पाहून मन भारावले आणि त्यांच्या सेवेत वाहिलेल्या आनंदवनचे कार्य पाहून प्रेरणाही मिळाली. समितीच्या संपूर्ण टीमने येथील ज्येष्ठांसोबत रवाबेसनाच्या लाडूच्या गोडधोड भोजनासह वेळ घालविला. सोबतच येथील अंध, अपंग व गरजू मुलांना शालेय साहित्य भेट दिले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आमच्या हृदयाच्या कोपऱ्यात सामावल्याची भावना मीना मोहन यांनी व्यक्त केली. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या, अभावग्रस्त आणि उपेक्षित घटकांची मदत करण्यात खरी ईश्वरसेवा असून, तोच खरा धर्म होय आणि शक्य होईल त्याप्रमाणे ही सेवा करीत राहू, ही भावनाही त्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

 

टॅग्स :Womenमहिलाsocial workerसमाजसेवक