शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

प्रेरणावाट : निवृत्तीनंतर ‘त्या महिलांनी’ स्वीकारली सामाजिक नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 23:03 IST

माणसाचे आयुष्य मेणबत्तीप्रमाणे असते. पडले असले की नाश पावते आणि जळत असले की इतरांना प्रकाश देत राहते. सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्यही असेच. काहींना ते ‘आता सर्व संपले’ असे वाटते, पण काहींना ते राहिलेल्या आकांक्षा पूर्ण करण्याची संधी वाटते. स्वावलंबीनगरच्या काही महिलांनाही समाजऋण म्हणून दिन, दुखितांच्या सेवेची इच्छा पूर्ण करण्याची संधी सेवानिवृत्तीनंतर मिळाली. त्यांनीही या एक नवीन सुरुवात म्हणून या संधीचे सोने करीत एकत्रितपणे ‘पूर्णब्रह्म सेवा समिती’च्या माध्यमातून सेवेचं व्रत स्वीकारले आणि फुलविले.

ठळक मुद्देपूर्णब्रह्म सेवा समितीचे प्रेरणादायी कार्य : गरजवंतांच्या मदतीसाठी पुढे आले हात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माणसाचे आयुष्य मेणबत्तीप्रमाणे असते. पडले असले की नाश पावते आणि जळत असले की इतरांना प्रकाश देत राहते. सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्यही असेच. काहींना ते ‘आता सर्व संपले’ असे वाटते, पण काहींना ते राहिलेल्या आकांक्षा पूर्ण करण्याची संधी वाटते. स्वावलंबीनगरच्या काही महिलांनाही समाजऋण म्हणून दिन, दुखितांच्या सेवेची इच्छा पूर्ण करण्याची संधी सेवानिवृत्तीनंतर मिळाली. त्यांनीही या एक नवीन सुरुवात म्हणून या संधीचे सोने करीत एकत्रितपणे ‘पूर्णब्रह्म सेवा समिती’च्या माध्यमातून सेवेचं व्रत स्वीकारले आणि फुलविले.आयुष्यभर घरासाठी, मुलांसाठी दगदग करताना समाजातील गरजवंतांसाठी काही तरी करण्याची मनोमन इच्छा. परंतु नोकरी आणि घर अशी दुहेरी जबाबदारी सांभाळताना ही इच्छा अपूर्ण राहिली होती. सेवानिवृत्तीनंतर मात्र या मनातल्या इच्छा पूर्ण करण्याची वेळ चालून आली. समाजातील अनाथ, अंध, अपंग, मूकबधिर मुले, वृद्ध व निराधार लोकांसाठी जे शक्य होईल ते करण्यासाठी १० ते १२ महिलांनी एकत्र येऊन ‘पूर्णब्रह्म’ हा उपक्रम सुरू केला. समितीच्या मीना मोहन अमरावतीकर यांनी सांगितले, महिलांनी स्वत:च्या बचतीमधील काही पैसे गोळा करून २०१७ च्या महिला दिनी हा उपक्रम सुरू केला. सुरुवात म्हणून पहिलीच भेट अदासा येथील वृद्धाश्रमाला दिली. त्यावेळी शक्य झाली ती मदत या वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना दिली. पुढे तीन महिन्यानंतर देवलापारजवळच्या निमडोह येथील आश्रमशाळेला भेट दिली. या शाळेत ६०० च्यावर अनाथ व निराधार मुले शिक्षण घेत आहेत. या मुलांना गोडधोड जेवण, शालेय साहित्य व संस्थेला पुस्तकांचा संच भेट दिला.समितीच्या कार्याने प्रेरित होऊन पुढे समाजसेवेची इच्छा असलेल्या अनेक महिलांनी यात सहभाग घेतला आणि पूर्णब्रह्मची संख्या ५० वर गेल्याचे मीना मोहन यांनी सांगितले. आता या उपक्रमाशी निवृत्तच नाही तर गृहिणी आणि नोकरी करणाऱ्या महिलाही जुळल्या आहेत. प्रत्येक महिलेकडून दर महिन्याला ५० रुपये जमा करायचे आणि तीन महिन्यानंतर एका अभावग्रस्त संस्थेला भेट देण्याची योजना बनवायची. पुन्हा शक्य होईल तेवढी राशी गोळा करून संस्थेच्या आवश्यकतेनुसार त्यांना मदत करायची, हा पूर्णब्रह्मचा नित्यक्रम. बाबा आमटे यांच्या आनंदवनमधील भेट अशीच अविस्मरणीय ठरल्याचे त्यांनी सांगितले.समाजाने नाकारलेल्या कुष्ठरुग्णांचे जगणे पाहून मन भारावले आणि त्यांच्या सेवेत वाहिलेल्या आनंदवनचे कार्य पाहून प्रेरणाही मिळाली. समितीच्या संपूर्ण टीमने येथील ज्येष्ठांसोबत रवाबेसनाच्या लाडूच्या गोडधोड भोजनासह वेळ घालविला. सोबतच येथील अंध, अपंग व गरजू मुलांना शालेय साहित्य भेट दिले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आमच्या हृदयाच्या कोपऱ्यात सामावल्याची भावना मीना मोहन यांनी व्यक्त केली. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या, अभावग्रस्त आणि उपेक्षित घटकांची मदत करण्यात खरी ईश्वरसेवा असून, तोच खरा धर्म होय आणि शक्य होईल त्याप्रमाणे ही सेवा करीत राहू, ही भावनाही त्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

 

टॅग्स :Womenमहिलाsocial workerसमाजसेवक