शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

प्रेरणावाट : निवृत्तीनंतर ‘त्या महिलांनी’ स्वीकारली सामाजिक नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 23:03 IST

माणसाचे आयुष्य मेणबत्तीप्रमाणे असते. पडले असले की नाश पावते आणि जळत असले की इतरांना प्रकाश देत राहते. सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्यही असेच. काहींना ते ‘आता सर्व संपले’ असे वाटते, पण काहींना ते राहिलेल्या आकांक्षा पूर्ण करण्याची संधी वाटते. स्वावलंबीनगरच्या काही महिलांनाही समाजऋण म्हणून दिन, दुखितांच्या सेवेची इच्छा पूर्ण करण्याची संधी सेवानिवृत्तीनंतर मिळाली. त्यांनीही या एक नवीन सुरुवात म्हणून या संधीचे सोने करीत एकत्रितपणे ‘पूर्णब्रह्म सेवा समिती’च्या माध्यमातून सेवेचं व्रत स्वीकारले आणि फुलविले.

ठळक मुद्देपूर्णब्रह्म सेवा समितीचे प्रेरणादायी कार्य : गरजवंतांच्या मदतीसाठी पुढे आले हात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माणसाचे आयुष्य मेणबत्तीप्रमाणे असते. पडले असले की नाश पावते आणि जळत असले की इतरांना प्रकाश देत राहते. सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्यही असेच. काहींना ते ‘आता सर्व संपले’ असे वाटते, पण काहींना ते राहिलेल्या आकांक्षा पूर्ण करण्याची संधी वाटते. स्वावलंबीनगरच्या काही महिलांनाही समाजऋण म्हणून दिन, दुखितांच्या सेवेची इच्छा पूर्ण करण्याची संधी सेवानिवृत्तीनंतर मिळाली. त्यांनीही या एक नवीन सुरुवात म्हणून या संधीचे सोने करीत एकत्रितपणे ‘पूर्णब्रह्म सेवा समिती’च्या माध्यमातून सेवेचं व्रत स्वीकारले आणि फुलविले.आयुष्यभर घरासाठी, मुलांसाठी दगदग करताना समाजातील गरजवंतांसाठी काही तरी करण्याची मनोमन इच्छा. परंतु नोकरी आणि घर अशी दुहेरी जबाबदारी सांभाळताना ही इच्छा अपूर्ण राहिली होती. सेवानिवृत्तीनंतर मात्र या मनातल्या इच्छा पूर्ण करण्याची वेळ चालून आली. समाजातील अनाथ, अंध, अपंग, मूकबधिर मुले, वृद्ध व निराधार लोकांसाठी जे शक्य होईल ते करण्यासाठी १० ते १२ महिलांनी एकत्र येऊन ‘पूर्णब्रह्म’ हा उपक्रम सुरू केला. समितीच्या मीना मोहन अमरावतीकर यांनी सांगितले, महिलांनी स्वत:च्या बचतीमधील काही पैसे गोळा करून २०१७ च्या महिला दिनी हा उपक्रम सुरू केला. सुरुवात म्हणून पहिलीच भेट अदासा येथील वृद्धाश्रमाला दिली. त्यावेळी शक्य झाली ती मदत या वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना दिली. पुढे तीन महिन्यानंतर देवलापारजवळच्या निमडोह येथील आश्रमशाळेला भेट दिली. या शाळेत ६०० च्यावर अनाथ व निराधार मुले शिक्षण घेत आहेत. या मुलांना गोडधोड जेवण, शालेय साहित्य व संस्थेला पुस्तकांचा संच भेट दिला.समितीच्या कार्याने प्रेरित होऊन पुढे समाजसेवेची इच्छा असलेल्या अनेक महिलांनी यात सहभाग घेतला आणि पूर्णब्रह्मची संख्या ५० वर गेल्याचे मीना मोहन यांनी सांगितले. आता या उपक्रमाशी निवृत्तच नाही तर गृहिणी आणि नोकरी करणाऱ्या महिलाही जुळल्या आहेत. प्रत्येक महिलेकडून दर महिन्याला ५० रुपये जमा करायचे आणि तीन महिन्यानंतर एका अभावग्रस्त संस्थेला भेट देण्याची योजना बनवायची. पुन्हा शक्य होईल तेवढी राशी गोळा करून संस्थेच्या आवश्यकतेनुसार त्यांना मदत करायची, हा पूर्णब्रह्मचा नित्यक्रम. बाबा आमटे यांच्या आनंदवनमधील भेट अशीच अविस्मरणीय ठरल्याचे त्यांनी सांगितले.समाजाने नाकारलेल्या कुष्ठरुग्णांचे जगणे पाहून मन भारावले आणि त्यांच्या सेवेत वाहिलेल्या आनंदवनचे कार्य पाहून प्रेरणाही मिळाली. समितीच्या संपूर्ण टीमने येथील ज्येष्ठांसोबत रवाबेसनाच्या लाडूच्या गोडधोड भोजनासह वेळ घालविला. सोबतच येथील अंध, अपंग व गरजू मुलांना शालेय साहित्य भेट दिले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आमच्या हृदयाच्या कोपऱ्यात सामावल्याची भावना मीना मोहन यांनी व्यक्त केली. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या, अभावग्रस्त आणि उपेक्षित घटकांची मदत करण्यात खरी ईश्वरसेवा असून, तोच खरा धर्म होय आणि शक्य होईल त्याप्रमाणे ही सेवा करीत राहू, ही भावनाही त्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

 

टॅग्स :Womenमहिलाsocial workerसमाजसेवक