शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

विद्यार्थ्यांच्या जेवणात सोंडे; नागपुरातल्या क्रीडा प्रबोधिनीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 11:59 IST

राज्यभरातून क्रीडा प्रशिक्षणासाठी नागपुरात आलेल्या विद्यार्थ्यांच्या जेवणात सोंडे निघाल्याची तक्रार केल्याच्या कारणावरून क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य सुभाष रेवतकर यांनी तक्रारकर्त्यांच्या कानशिलात हाणल्याचा आरोप क्रीडा प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांनी केला आहे.

ठळक मुद्देतक्रार केल्यामुळे प्राचार्यांकडून मारहाण झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरातून क्रीडा प्रशिक्षणासाठी नागपुरात आलेल्या विद्यार्थ्यांच्या जेवणात सोंडे निघाल्याची तक्रार केल्याच्या कारणावरून क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य सुभाष रेवतकर यांनी तक्रारकर्त्यांच्या कानशिलात हाणल्याचा आरोप क्रीडा प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी सोमवारी रात्रीच्या सुमारास मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.नागपुरातील कोराडी रोडवरील मानकापूर क्रीडा संकुल येथे असलेल्या क्रीडा प्रबोधिनीतर्फे राज्यभरातील निवडक विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण देण्यात येत असते. त्याच अनुषंगाने १० जूनपासून व्हॉलिबॉल आणि अ‍ॅथ्लेटिक्स क्रीडा प्रकारातील प्रशिक्षणासाठी राज्यभरातून ४० विद्यार्थी संकुलात दाखल झाले आहेत. हे प्रशिक्षण वर्षभरासाठीचे असते. मात्र, प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.शौचालयात पाणी नाही, शौचालयातील पाणीच जेवण बनविण्यासाठी वापरले जाते, दोन्ही वेळ दिले जाणारे जेवण निकृष्ट प्रतीचे आहे, सर्वत्र घाण असून स्वच्छता कर्मचारी नाही, जेवणात सोंडे आढळत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी सुरुवातीला मौखिक स्वरूपात संबंधितांना दिल्या. मात्र, या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यानंतर, या समस्यांची माहिती देणारे लेखी पत्र तक्रार स्वरूपात क्रीडा प्रबोधिनीच्या वॉर्डनला दोनवेळा देण्यात आले. वॉर्डनकडून या तक्रारी सोडविल्या जात नसल्याचे समजताच, विद्यार्थ्यांनी तक्रारींचा मोर्चा प्रबोधिनीचे प्राचार्य सुभाष रेवतकर यांच्याकडे वळवला. मात्र, तक्रारी ऐकून घेण्याऐवजी प्राचार्यांनी तक्रारकर्त्या मुलांवरच हात उगारल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. तक्रारींचे निवारण करण्याऐवजी मुलांवर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप करीत सोमवारी संध्याकाळच्या सुमारास प्रबोधिनीच्या ४० विद्यार्थ्यांनी मानकापूर पोलीस ठाण्यात एकसाथ तक्रार देण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने आदित्य बाळकृष्ण बुधेल यांच्यासह आकाश दुर्गे, सचिन जाधव, रोहन यादव, मुकुल खोडके, धनुष कांबळे, सोहेल खान, आदर्श वाकोडे, वैभव भंगे, रितेश माने या विद्यार्थ्यांनी मानकापूर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री प्रबोधिनीच्या वॉर्डन, प्राचार्य व प्रशासकाविरोधात तक्रारनोंदवली आहे.मेस चालकाला शनिवारी टर्मिनेट करणार-सुभाष रेवतकरमुलांनी गेल्या आठवड्यात जेवणासंदर्भात तक्रार केली होती. मेस चालकाला जेवणात सुधारणा करण्यासंदर्भात सांगितलेही होते. पण, सोमवारी विद्यार्थ्यांनी निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यामुळे आरडाओरड केली. त्यामुळे मेस चालकाला बोलावून घेतले. त्याला समजवीत असताना मुले तिथे आली आणि मेस चालकाला शिवीगाळ करू लागली आणि त्याच्या अंगावर धावून गेली. त्यामुळे मी मुलांवर चिडलो. पण मुले ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. मी शिवीगाळ केल्याचा आरोप करीत त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. माझा उद्देश केवळ शनिवारपर्यंत मेस सुरू ठेवण्याचा होता. शनिवारी मेस चालकाला टर्मिनेट करणार आहे. तोपर्यंत मुलांना दोनवेळचे जेवण मिळावे, ही अपेक्षा होती. त्यात मुलांवर मी रागावलो. माझा दुसरा कुठलाही हेतू नव्हता, असे प्राचार्य सुभाष रेवतकर म्हणाले.

टॅग्स :fraudधोकेबाजी