शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

एसीबीकडून ४०० सिंचन प्रकल्पांची चौकशी

By admin | Updated: February 20, 2016 03:18 IST

उच्च न्यायालयाच्या १२ डिसेंबर २०१४ च्या आदेशानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत ४०० सिंचन प्रकल्पांची खुली चौकशी केली जात आहे.

हायकोर्टात राज्य सरकारची माहितीनागपूर : उच्च न्यायालयाच्या १२ डिसेंबर २०१४ च्या आदेशानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत ४०० सिंचन प्रकल्पांची खुली चौकशी केली जात आहे. ही माहिती राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती प्रदीप देशमुख यांच्या खंडपीठापुढे देण्यात आली. सविस्तर माहितीसंदर्भात राज्य सरकारला शपथपत्र दाखल करता यावे, यासाठी या जनहित याचिकेवरील सुनावणी दोन आठवडे तहकूब करण्यात आली आहे.विदर्भातील विविध सिंचन प्रकल्पांमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला. ३८ सिंचन प्रकल्पांची कामे सुरू असून यात धरणे, कालवे आणि उपसा सिंचन योजनांचा समावेश आहे. त्यापैकी एकही प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रकल्पांचा खर्च अनेक पटींनी वाढला. एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च होत असताना काहीही केल्या प्रकल्प पूर्ण होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचत नाही. परिणामी विदर्भातील शेतकरी आत्महत्या करीत असून राजकीय पुढारी, कंत्राटदार आणि नोकरशहा यांनी मलिदा वाटून घेतला, हा घोटाळा ७० हजार कोटी रुपयांचा असून चौकशीची मागणी जनहित याचिकेद्वारे जनमंचने केली होती. त्यावर एसीबीच्या पोलीस संचालकांमार्फत सिंचन घोटाळ्याचा खुला तपास करण्यात येईल, माजी मंत्री अजित पवार, छगन भुजबळ, अधिकारी आणि कंत्राटदार यांच्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिले होते. या आश्वासनावर विश्वास ठेवून उच्च न्यायालयाने १२ डिसेंबर २०१४ रोजी ही जनहित याचिका निकाली काढली होती. प्रत्यक्षात एसीबीकडून या प्रकरणाचा तपास अतिशय संथ गतीने सुरू आहे. एकही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे जनमंचचे सल्लागार शरद पाटील यांनी नव्याने जनहित याचिका दाखल केली. सिंचन घोटाळ्याचा तपास संथ गतीने सुरू राहिल्यास दोषींविरुद्धचा तपास तो मरेपर्यंत पूर्ण होऊ शकणार नाही. तपास जलदगतीने व्हावा, यासाठी तो सीबीआयकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली. याचिकाकर्त्याची बाजू ऐकून न्यायालयाने राज्य सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले. गुन्हा दाखल करण्यात न आल्याने गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, एसीबीचे पोलीस महासंचालक, विदर्भ सिंचन विकास महामंडळ आणि नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकांना उच्च न्यायालयाने नोटीस जारी करून दोन आठवड्यात शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)‘त्या’ प्रकल्पांचा खर्च वाढलाया याचिकेतील ठळक मुद्दे असे की, २००९ मध्ये सात महिन्यात विदर्भ सिंचन महामंडळांतर्गत सुरू असलेल्या ३८ सिंचन प्रकल्पांचा अवाढव्य खर्च वाढवून तो ६ हजार ६७२ कोटीवरून २६ हजार ७२२ कोटी करण्यात आला. ३८ पैकी ३० प्रकल्पांना मोठ्या घाईने मंजुरी देण्यात आली. १४ आॅगस्ट २००९ रोजी ११, २४ जून २००९ रोजी १०, ७ जुलै २००९ रोजी ५, १८ आॅगस्ट २००९ रोजी ४ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ६ प्रकल्पांचा खर्च ६ पटहून ३३ पट वाढविण्यात आला. विदर्भ सिंचन विकास महामंडळाने मात्र २००९ मध्ये सात महिन्यात हा खर्च १७ हजार ७०१ कोटी रुपये झाल्याचा दावा शपथपत्र दाखल करून केला. न्यायालयात याचिकाकर्त्याच्या वतीने अ‍ॅड. फिरदोस मिर्झा तर सरकारच्या वतीने मुख्य सरकारी वकील भारती डांगरे यांनी काम पाहिले.