शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती घोटाळ्याची ‘सीबीआय’मार्फत चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 19:28 IST

शासनाचा हस्तक्षेप टाळण्यासाठी राज्यातील शिष्यवृत्ती घोटाळ्याची ‘सीबीआय’मार्फत चौकशी करण्यात यावी अशी विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला करण्यात आली आहे. न्यायालयाने सोमवारी राज्य शासन, विशेष तपास पथक व सर्व संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावून यावर १४ फेब्रुवारीपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाला विनंती : राज्य शासनाला मागितले उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाचा हस्तक्षेप टाळण्यासाठी राज्यातील शिष्यवृत्ती घोटाळ्याची ‘सीबीआय’मार्फत चौकशी करण्यात यावी अशी विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला करण्यात आली आहे. न्यायालयाने सोमवारी राज्य शासन, विशेष तपास पथक व सर्व संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावून यावर १४ फेब्रुवारीपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. रामटेक येथील दृष्टी बहुउद्देशीय शिक्षण, पर्यटन व पर्यावरण विकास संस्थेने यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे. शैक्षणिक संस्थांचे संचालक शासनाची शिष्यवृत्ती हडपण्यासाठी अभ्यासक्रमांत बोगस विद्यार्थ्यांचे प्रवेश दाखवतात. तसेच, विद्यार्थी अपात्र असतानाही शिष्यवृत्तीसाठी दावे सादर करतात. संस्था संचालक व शासकीय अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशिररीत्या शिष्यवृत्ती वाटप होत आहे. परिणामी, शासनाचे कोट्यवधी रुपये संस्था संचालक व अधिकाऱ्यांच्या खिशात जात आहेत असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.विशेष तपास पथकाने आतापर्यंत केवळ १३.४३ टक्के शिक्षण संस्थांची चौकशी करून २४ जुलै २०१७ अहवाल सादर केला आहे. पथकाने दोषी शिक्षण संस्थांवर काढलेली वसुली दोन हजार कोटी रुपयांवर आहे. पुढील चौकशी थांबविण्यात आली आहे. ही चौकशी पूर्ण केल्यास वसुलीचा आकडा १५ हजार कोटी रुपयांवर जाऊ शकतो. परिणामी, उर्वरित चौकशी पूर्ण करण्यात यावी व चौकशीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात यावा असेही याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. आदित्य देशपांडे यांनी बाजू मांडली.शासनावर ताशेरेशासनाने काढलेल्या शिष्यवृत्तीच्या वसुलीविरुद्ध काही शिक्षण संस्थांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. त्यात न्यायालयाला शासनाकडून समाधानकारक सहकार्य मिळाले नाही. परिणामी, न्यायालयाने शासनावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. शासनाने या प्रकरणाबाबत उदासीन भूमिका स्वीकारली आहे. न्यायालयाच्या आदेशाशिवाय एकही कागद पटलावर ठेवला जात नाही. हे सर्व खेदजनक आहे असे न्यायालयाने म्हटले. तसेच, मुख्य सचिवांना यावर एक आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिलेत. याप्रकरणात याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. आनंद परचुरे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयOrder orderआदेश केणे