शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

ग्रामीण विद्यार्थ्यांवर अन्याय? 'तालुक्यातील रहिवासी नसावा' अट हटवण्याची मागणी जोरात

By शुभांगी काळमेघ | Updated: April 28, 2025 16:24 IST

ही अट रद्द करा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील अन्यायकारक अटीविरोधात कायद्याच्या विद्यार्थ्याचे निवेदन

नागपूर : संपूर्ण देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीत कामकाज चालते. विशेषतः मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या समान संधी मिळाव्यात यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. याच उद्देशाने महाराष्ट्र सरकारने ८ जानेवारी २०१७ रोजी भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली.

या योजनेंतर्गत अनुसूचित जाती, नवबौद्ध व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि शैक्षणिक सुविधा यासाठी आर्थिक मदत थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दिली जाते. मात्र २६ डिसेंबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार, या योजनेत एक नविन अट घालण्यात आली की, विद्यार्थी ज्या महाविद्यालयात शिक्षण घेतो, तो त्या तालुक्याचा रहिवासी नसावा.

ही अट पूर्णतः अयोग्य, अन्यायकारक आणि विद्यार्थ्यांवर द्वेषभावनेने लादलेली असून, ग्रामीण व गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यास धोका निर्माण करते. तालुक्याची व्याप्ती मोठी असून, अनेक वेळा विद्यार्थी घरून ३०-४० किलोमीटर अंतरावरील तालुक्याच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतात. त्यामुळे तालुका आधारित ही अट मूळ उद्देशाशी विसंगत आहे.

२०१८ च्या शासन निर्णयात महानगरपालिका/नगरपालिका/ग्रामपंचायत/कटक मंडळ यांच्या हद्दीतील नसावा अशी अट होती, जी योग्य होती. तीच परत अंगिकारावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच १९ ऑक्टोबर २०२३ च्या मंत्रीमंडळ बैठकीत योजनेचा विस्तार जाहीर केला असला तरी, या अटीमुळे योजनेचा खरा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही.

ही अट त्वरित रद्द करून, सुधारित शासन निर्णय लवकर प्रसिद्ध करावा, आणि २०२४-२५ मध्ये अपात्र ठरवले गेलेले विद्यार्थी पुन्हा पात्र ठरवावेत, ही मागणी नितीन साहेबराव जामनिक यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूरgovernment schemeसरकारी योजना