शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
4
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
5
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
6
"इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
7
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
8
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
9
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
10
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
11
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
12
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
13
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
14
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
15
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
16
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
17
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
18
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
19
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
20
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
Daily Top 2Weekly Top 5

ध्वनी-वायू प्रदूषणामुळे मेंदूला इजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:18 IST

नागपूर : मेंदू खूप नाजूक असतो. त्याला वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषणामुळे इजा पोहोचू शकते. डास, कुत्री यांच्यामुळे होणाऱ्या आजारांचाही मेंदूवर परिणाम ...

नागपूर : मेंदू खूप नाजूक असतो. त्याला वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषणामुळे इजा पोहोचू शकते. डास, कुत्री यांच्यामुळे होणाऱ्या आजारांचाही मेंदूवर परिणाम होतो. रस्ते अपघातामुळे मेंदूला दुखापत होऊन जीव जाण्याची धोकाही असतो. या सर्व गोष्टी टाळल्या जाऊ शकतात व मेंदूला निरोगी ठेवले जाऊ शकते, असे मत मेंदूरोग तज्ज्ञांनी व्यक्त केले.

‘डब्ल्यूएफएन’च्या ‘ट्रॉपिकल अ‍ँड जिओग्राफीकल न्यूरोलॉजी स्पेशलिटी ग्रुप वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी व इंडियन अ‍ॅकेडमी ऑफ न्यूरोलॉजी’ यांच्या संयुक्त विद्यमाने मेंदू आरोग्य दिनानिमित्त आभासी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ‘इंडियन अ‍ॅकेडमी ऑफ न्यूरोलॉजी’चे अध्यक्ष डॉ. जेएमके मूर्ती यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

यावेळी मुंबईचे ज्येष्ठ न्यूरोलॉजिस्ट डॉ.सरोश कत्रक म्हणाले, शरीरातील प्रत्येक अवयव संचालित करण्याचे काम मेंदू करतोच, शिवाय, भाषा, संवाद, स्मृती, व्यक्तिमत्त्व, कल्पक विचार, भावनांचे नियंत्रणदेखील मेंदूद्वारे केले जाते. चेन्नई ‘आयएएन’चे सचिव डॉ. यू. मीनाक्षीसुंदरम् म्हणाल्या, मेंदू हा पाॅवर स्टेशन आहे. तेथून करंट निघाला, तर शरीर संचालित होते. डोकेदुखी, स्ट्रोक, एपिलिप्सी असे अनेक मेंदूशी संबंधित आजार असून, त्यावर उपचार करण्याचे काम न्यूरोलॉजिस्ट करतो. हैदराबादचे ज्येष्ठ न्यूरोलॉजिस्ट व स्ट्रोक विशेषज्ञ डॉ. सुभाष कौल म्हणाले, मेंदूला बाह्य कारणांसोबत मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, थायरॉइड या अंतर्गत समस्यांमुळेदेखील मेंदूला दुखापत होऊ शकते.

- दोन जेवणाच्या वेळांमध्ये आठ तासांचे अंतर हवे

राष्ट्रीय संयोजक डॉ. चंद्रशेखर मेश्राम म्हणाले, आपण जेव्हा जेव्हा खातो तेव्हा मेंदूतून इन्सुलिन प्रसवते. त्यामुळे शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते. त्यातून शरीरात फॅट्स वाढतात. दोन जेवणाची वेळांमध्ये किमान ८ ते ९ तासांचे, तर उपवासाच्या वेळांमध्ये किमान १५ ते १६ तासांचे अंतर असले पाहिजे. परंतु, हे करताना डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

-दुपारी १२ नंतर कॉफी, सायंकाळी ५ नंतर चहा घेऊ नये

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुधीर भावे म्हणाले, झोप मेंदूसाठी फार आवश्यक आहे. चांगल्या झोपेसाठी दुपारी १२ नंतर कॉफी आणि सायंकाळी ५ नंतर चहा घेऊ नये. झोपताना विचार करू नये. चांगली झोप यावी, यासाठी वातावरण निर्मिती करावी, असेही ते म्हणाले.