शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

नागपूर विमानतळावर ‘स्टॅम्प’च्या शाईमुळे जखम होण्याचा क्रम सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 15:42 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’ करण्यासाठी लावण्यात येणाऱ्या ‘स्टॅम्प’मुळे हातावर जखम होण्याचा क्रम सुरूच आहे.

ठळक मुद्देमनपाच्या अधिकाऱ्यांचे मौनशाईच्या दर्जाची तपासणी कधी होणार ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’ करण्यासाठी लावण्यात येणाऱ्या ‘स्टॅम्प’मुळे हातावर जखम होण्याचा क्रम सुरूच आहे. यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईबाबत बोलण्यास संबंधित अधिकारी टाळत आहेत.७ जून रोजी ‘स्टॅम्प’च्या शाईमुळे जखमी होण्याची तक्रार आली होती. त्यानंतर विमानतळ व्यवस्थापनाला जवळपास आठ तक्रारी मिळाल्या आहेत. या सर्व तक्रारी मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत. यानंतरदेखील तक्रारी येत आहेत. नागरिकांना निकृष्ट दर्जाच्या शाईमुळे होणाऱ्या जखमांच्या प्रकरणांना गंभीरतेने घेतले जात नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे. यासंबंधात प्रतिक्रियेसाठी मनपाचे अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.मुंबईत नोकरी करणारे स्नेहा व राकेश मून हे ५ जून रोजी पुणेमार्गे विमानाने नागपुरात पोहोचले होते. विमानतळावर ‘स्टॅम्प’ लावण्यात आलेली जागा सुजली होती. दोघांचाही उपचार करावा लागला. संबंधित शाई ही अतिशय निकृष्ट दर्जाची होती. त्यामुळे ‘इन्फेक्शन’ व जखम झाली. त्वचेवर शाईचा उपयोग करण्याच्या अगोदर त्याचा दर्जा व इतर बाबींची तपासणी झाली पाहिजे, असे मत ‘फिजिशिअन’ डॉ. सिद्धांत भरणे यांनी व्यक्त केले. याअगोदर गोवा व कोकणातदेखील असे प्रकरण झाले आहे.सर्व तक्रारी मनपाकडे जातातयासंदर्भात आम्हाला ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून जितक्या तक्रारी मिळाल्या, त्या सर्व मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांना ‘ऑनलाईन’च पाठविण्यात आल्या आहेत. १३ जून रोजी शाई बदलविण्यात आली होती, असे मनपाने सांगितले आहे.-आबिद रुही, वरिष्ठ विमानतळ संचालक‘टॅटू’सारखे ‘स्टॅम्पिंग’ केले जातेयहवाई प्रवास करून नागपुरात आल्यानंतर सोमवारी एका प्रवाशाने नाव न प्रकाशित करण्याच्या नावावर धक्कादायक माहिती दिली. ‘क्वारंटाईन’ करण्याच्या नावाखाली केवळ ‘टॅटू’प्रमाणे ‘स्टॅम्पिंग’ केले जाते. स्केच पेनाने तारीख लिहिली जाते व ती पाण्याने लवकरच मिटते. ज्या जागेवर ‘टॅटू’प्रमाणे ‘स्टॅम्प’ लावल्या जात आहे तेथेच जळजळ होते. यासाठी कुठली शाई वापरण्यात येत आहे व यात कुठले रसायन आहे याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस