शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी पुन्हा पुढाकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 23:05 IST

बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी बौद्ध समाजातर्फे अनेक वर्षांपासून लढा सुरु आहे. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात सुलेखा कुंभारे यांनीही अनेक आंदोलने केली आहेत. आता त्या स्वत: राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्य आहेत. बौद्ध धर्म हा अल्पसंख्यक आहे. त्यादृष्टीने आयोगाच्या मार्फत बौद्ध नागरिकांची ही अतिशय जुनी मागणी कायदेशीररीत्या सुटावी, यासाठी सुलेखा कुंभारे या पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत.

ठळक मुद्देराष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगातर्फे शांती परिषद : जगभरातील बौद्ध प्रतिनिधींसोबत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी बौद्ध समाजातर्फे अनेक वर्षांपासून लढा सुरु आहे. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात सुलेखा कुंभारे यांनीही अनेक आंदोलने केली आहेत. आता त्या स्वत: राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्य आहेत. बौद्ध धर्म हा अल्पसंख्यक आहे. त्यादृष्टीने आयोगाच्या मार्फत बौद्ध नागरिकांची ही अतिशय जुनी मागणी कायदेशीररीत्या सुटावी, यासाठी सुलेखा कुंभारे या पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत.रविभवन येथे पत्रकारांशी बोलतांना त्यांनी याबाबतचे संकेत दिले. येत्या २८ एप्रिल रोजी महाबोधी महाविहार परिसरात आंतरराष्ट्रीय बौद्ध शांती परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने आयोजित केली, हे विशेष. या परिषदेमध्ये जगभरातील बौद्ध राष्ट्रांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या परिषदेत संपूर्ण राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग उपस्थित राहील.आपण या आंदोलनाशी आधीपासून जुळले असल्याने त्यांच्या मागण्या आपल्याला माहीत आहेत. परंतु नव्याने सर्वांशी चर्चा करून ती ऐकली जातील. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे टेम्पल अ‍ॅक्टमध्ये बदल करण्याची गरज आहे. येथील मंदिराच्या व्यवस्थापनात एकूण नऊ सदस्य आहेत. यात चार सदस्य हे बौद्ध आणि चार सदस्य हे हिंदू आहेत. तर अध्यक्ष हा जिल्हाधिकारी राहतो जिल्हाधिकारी हा हिंदू असावा, अशी त्यात अट आहे. ही अट रद्द करणे आणि व्यवस्थापनात सर्वच सदस्य हे बौद्ध असावे, ही मागणी आहे. यासंबंधात आयोग आपल्यापरीने एक अहवाल तयार करून सरकारला तो सादर करेल. याशिवाय मागील काही दिवस महाबोधी महाविहारावर दहशतवादी हल्ला झाला आहे. त्यादृष्टीने सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात याव्या आणि जगभरातील बौद्ध लोक येथे दर्शनाला येतात तेव्हा पर्यटकांच्या दृष्टीने विकास कामे करावीत, अशी मागणीही यात जोडण्यात येणार असल्याचे सुलेखा कुंभारे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला नगरसेविका वंदना भगत, भीमराव फुसे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Sulekha Kumbhareसुलेखा कुंभारेnagpurनागपूर