शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

जल, पर्यावरण संवर्धनासाठी संघ घेणार पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 14:40 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख तशी तर सामाजिक संघटना म्हणून आहे. मात्र आता देशात जल व पर्यावरण संवर्धन व्हावे यासाठीदेखील संघाकडून पुढाकार घेण्यात येणार आहे. यासंदर्भात संघाच्या राष्ट्रीय पातळीवर संघटन बैठकीत सखोल मंथन झाले.

ठळक मुद्देसमाजाला सोबत घेऊन चळवळ राबविणार रुपरेषा तयार करण्याची प्रांतांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख तशी तर सामाजिक संघटना म्हणून आहे. मात्र आता देशात जल व पर्यावरण संवर्धन व्हावे यासाठीदेखील संघाकडून पुढाकार घेण्यात येणार आहे. यासंदर्भात संघाच्या राष्ट्रीय पातळीवर संघटन बैठकीत सखोल मंथन झाले. समाजाला सोबत घेऊन याबाबत देशपातळीवर चळवळ राबविण्याचा संकल्प यात घेण्यात आला. तसेच देशात प्रांतनिहाय रुपरेषा तयार करण्याची सूचनादेखील करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीला आंध्र प्रदेशमध्ये ३१ आॅगस्ट रोजी सुरुवात झाली. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत तसेच सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्यासह संघ परिवारातील व समाजातील विविध संघटनांच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची यात उपस्थिती होती. या बैठकीत वर्तमान सामाजिक, आर्थिक परिस्थिती, शिक्षणक्षेत्राची स्थिती, कृषी, पर्यावरण यांच्यासह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. पर्यावरण संवर्धन हा महत्त्वाचा विषय होता. केवळ शासनपातळीवर पुढाकार घेऊन प्रश्न सुटणार नाही. शाश्वत तोडग्यासाठी समाजाला घेऊन पुढाकार घेण्याची गरज आहे, असा बैठकीतील पदाधिकाऱ्यांचा सूर होता. संघाकडून देशातील काही क्षेत्रात जलसंवर्धन तसेच पर्यावरण रक्षणासाठी प्रकल्प राबविण्यात येतात. मात्र याचा आता विस्तार करण्यासाठी प्रयत्न व्हावेत आणि जनतेला जोडण्यासाठी पाऊल उचलले गेले पाहिजे, असे ठरविण्यात आले. जल व पर्यावरण संवर्धनासाठी नेमके काय प्रकल्प राबविता येतील, तसेच कुठे जास्त प्रमाणात प्रयत्नांची आवश्यकता आहे, याचा अभ्यास करण्यात येईल व त्यानंतर उपाययोजनांसाठी चळवळ उभारावी, अशी सूचना यावेळी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जैविक कृषी पद्धतीचा सुरू आहे प्रचार-प्रसारमागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात भोपाळ येथे संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीच्या बैठकीत जैविक कृषीपद्धतीच्या प्रचार-प्रसाराचा निर्णय झाला होता. यानुसार देशातील अनेक क्षेत्रात संघाचे प्रकल्प सुरू आहेत. विशेषत: ग्रामीण भागात लक्ष देण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

केरळ पुनर्वसनासाठी शक्य ती मदत करणारसेवा भारतीच्या माध्यमातून घरांची डागडुजी, पुनर्वसन यासाठीदेखील संघाकडून मदत करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत केरळमध्ये ३०० मदत शिबिरांच्या मार्फत लाखो लोकांपर्यंत मदत पोहोचविली जात आहे. एक लाखाहून अधिक स्वयंसेवक मदतकार्याला लागले आहेत, अशी माहितीदेखील सूत्रांनी दिली.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघWaterपाणी