शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

जल, पर्यावरण संवर्धनासाठी संघ घेणार पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 14:40 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख तशी तर सामाजिक संघटना म्हणून आहे. मात्र आता देशात जल व पर्यावरण संवर्धन व्हावे यासाठीदेखील संघाकडून पुढाकार घेण्यात येणार आहे. यासंदर्भात संघाच्या राष्ट्रीय पातळीवर संघटन बैठकीत सखोल मंथन झाले.

ठळक मुद्देसमाजाला सोबत घेऊन चळवळ राबविणार रुपरेषा तयार करण्याची प्रांतांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख तशी तर सामाजिक संघटना म्हणून आहे. मात्र आता देशात जल व पर्यावरण संवर्धन व्हावे यासाठीदेखील संघाकडून पुढाकार घेण्यात येणार आहे. यासंदर्भात संघाच्या राष्ट्रीय पातळीवर संघटन बैठकीत सखोल मंथन झाले. समाजाला सोबत घेऊन याबाबत देशपातळीवर चळवळ राबविण्याचा संकल्प यात घेण्यात आला. तसेच देशात प्रांतनिहाय रुपरेषा तयार करण्याची सूचनादेखील करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीला आंध्र प्रदेशमध्ये ३१ आॅगस्ट रोजी सुरुवात झाली. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत तसेच सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्यासह संघ परिवारातील व समाजातील विविध संघटनांच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची यात उपस्थिती होती. या बैठकीत वर्तमान सामाजिक, आर्थिक परिस्थिती, शिक्षणक्षेत्राची स्थिती, कृषी, पर्यावरण यांच्यासह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. पर्यावरण संवर्धन हा महत्त्वाचा विषय होता. केवळ शासनपातळीवर पुढाकार घेऊन प्रश्न सुटणार नाही. शाश्वत तोडग्यासाठी समाजाला घेऊन पुढाकार घेण्याची गरज आहे, असा बैठकीतील पदाधिकाऱ्यांचा सूर होता. संघाकडून देशातील काही क्षेत्रात जलसंवर्धन तसेच पर्यावरण रक्षणासाठी प्रकल्प राबविण्यात येतात. मात्र याचा आता विस्तार करण्यासाठी प्रयत्न व्हावेत आणि जनतेला जोडण्यासाठी पाऊल उचलले गेले पाहिजे, असे ठरविण्यात आले. जल व पर्यावरण संवर्धनासाठी नेमके काय प्रकल्प राबविता येतील, तसेच कुठे जास्त प्रमाणात प्रयत्नांची आवश्यकता आहे, याचा अभ्यास करण्यात येईल व त्यानंतर उपाययोजनांसाठी चळवळ उभारावी, अशी सूचना यावेळी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जैविक कृषी पद्धतीचा सुरू आहे प्रचार-प्रसारमागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात भोपाळ येथे संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीच्या बैठकीत जैविक कृषीपद्धतीच्या प्रचार-प्रसाराचा निर्णय झाला होता. यानुसार देशातील अनेक क्षेत्रात संघाचे प्रकल्प सुरू आहेत. विशेषत: ग्रामीण भागात लक्ष देण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

केरळ पुनर्वसनासाठी शक्य ती मदत करणारसेवा भारतीच्या माध्यमातून घरांची डागडुजी, पुनर्वसन यासाठीदेखील संघाकडून मदत करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत केरळमध्ये ३०० मदत शिबिरांच्या मार्फत लाखो लोकांपर्यंत मदत पोहोचविली जात आहे. एक लाखाहून अधिक स्वयंसेवक मदतकार्याला लागले आहेत, अशी माहितीदेखील सूत्रांनी दिली.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघWaterपाणी