शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
2
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
3
Mumbai Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार
4
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
5
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
6
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
7
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
8
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
9
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
10
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
11
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
12
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
13
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
14
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
15
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
16
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
17
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
18
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
19
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
20
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

माहिती आयुक्त नाही; चार हजार अर्ज प्रलंबित

By admin | Updated: June 22, 2014 00:51 IST

केंद्र शासनाच्या माहिती अधिकार अधिनियम २००५ ची योग्य अंमलबजावणी व्हावी, माहिती मिळावी व न मिळाल्यास कारवाई व्हावी म्हणून विभागीय माहिती आयुक्तांची पदे निर्माण करण्यात आली़

वर्धा : केंद्र शासनाच्या माहिती अधिकार अधिनियम २००५ ची योग्य अंमलबजावणी व्हावी, माहिती मिळावी व न मिळाल्यास कारवाई व्हावी म्हणून विभागीय माहिती आयुक्तांची पदे निर्माण करण्यात आली़ ही पदे राज्यपालांद्वारे भरण्याची तरतूद करण्यात आली; पण आचार संहितेचे कारण पूढे करून गत एक वर्षापूर्वीपासून नागपूर कार्यालयात माहिती आयुक्तच नेमण्यात आलेले नाही़ यामुळे सुमारे चार हजार अर्ज प्रलंबित असल्याचे समोर आले आहे़माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या अंमलाकरिता योग्य रचना करण्यात आली़ यात प्रत्येक शासकीय कार्यालयात माहिती अधिकारी, प्रथम आणि द्वितीय अपिलीय अधिकारी, अशी रचना आहे़ यात शासकीय कार्यालयातील वरिष्ठ कर्मचाऱ्याला माहिती अधिकारी, अधिकाऱ्याला प्रथम अपिलीय अधिकारी तर विभागीय माहिती आयुक्तांना द्वितीय अपिलीय अधिकारी नेमण्यात आले आहे़ स्थानिक स्तरावर माहिती मिळत नसेल आणि सुनावणीही होत नसेल तर माहिती आयुक्तांकडे अपिल करता येते; पण गत एक वर्षापासून नागपूर विभागीय माहिती आयुक्तांचे पद रिक्त आहे़ या पदाचा कार्यभार औरंगाबाद येथील माहिती आयुक्तांकडे सोपविला आहे़ औरंगाबाद येथील कार्यालयातच कामाचा ताण अधिक असल्याने त्यांना नागपूर येथे येणे शक्य होत नाही़ लोकसभा निवडणुकीपूर्वी औरंगाबाद माहिती आयुक्तांनी दोन वेळा नागपूर माहिती आयुक्त कार्यालयात भेट देत सुनावणी घेतली़ या दोन दिवसांत केवळ १०० ते २०० अर्ज निकाली काढून आदेश पारित करण्यात आलेत; पण तेव्हापासून कुणीही अपिलांकडे ढुंकून पाहिले नाही़ यामुळे वर्षभरात सुमारे ३ हजार ५०० ते ४ हजार अपिल अर्ज प्रलंबित राहिले आहेत़ माहिती आयुक्त नेमल्यास या अर्जांवर सुनावणी होऊन ते निकाली काढण्यासाठी तब्बल ३ वर्षांचा कालावधी लागणार आहे़ या दरम्यान पुन्हा दाखल झालेल्या अपिल अर्ज माहिती आयुक्त कार्यालयात प्रलंबित राहणार आहेत़ या प्रकारामुळे आरटीआय कार्यकर्त्यांची गोची झाली आहे़ वर्षभरापासून अपिल अर्ज प्रलंबित असल्याने माहितीही मिळाली नाही आणि कायद्याची अवहेलना करणाऱ्यांवर कारवाईही करण्यात आली नाही़ राज्य शासनाद्वारे माहिती अधिकार कायद्याचे खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते करीत आहेत़ राज्यपालांसह राज्य शासनाने याकडे लक्ष देत नागपूर विभागीय माहिती आयुक्तांची नेमणूक करावी, अशी मागणी केली जात आहे़(कार्यालय प्रतिनिधी)