शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील गोरेवाडा तलावात नाल्याचे दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 21:28 IST

शहरातील लक्ष्मीनगर, धरमपेठ व मंगळवारी झोनसह इतर भागांना गोरेवाडा तलावातून पाणीपुरवठा केला जातो. दाभा परिसरातील दूषित पाणी गणेशनगर नाल्याद्वारे या तलावात येते. तसेच तलावालगतच्या वस्त्यातील दूषित पाणी थेट तलावात सोडले जात आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देशहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील लक्ष्मीनगर, धरमपेठ व मंगळवारी झोनसह इतर भागांना गोरेवाडा तलावातून पाणीपुरवठा केला जातो. दाभा परिसरातील दूषित पाणी गणेशनगर नाल्याद्वारे या तलावात येते. तसेच तलावालगतच्या वस्त्यातील दूषित पाणी थेट तलावात सोडले जात आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.गोरेवाडा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घरे बांधण्यात आलेली आहेत. या वस्त्यातील दूषित पाणी तलावात सोडले जाते. यामुळे तलावातील पाणी दूषित होत आहे. शहराच्या अर्ध्या भागाला तलावातून पाणीपुरवठा केला जातो. तसेच गोरेवाडा जंगलातील वन्यजीव या तलावातील पाणी पित असल्याने वन्यजीवांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात नगरसेविका दर्शनी धवड यांनी महापालिकेच्या विशेष सभेत प्रश्न उपस्थित करून महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणली.गोरेवाडा तलावात गडरलाईनचे पाणी सोडण्याचा मुद्दा यापूर्वी सभागृहात अनेकदा उपस्थित करण्यात आला. परंतु महापालिका प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही. लोकांच्या आरोग्याशी संबंधित मुद्दा असूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने प्रशासन लोकांच्या आरोग्याविषयी गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले.गोरेवाडा क्षेत्रातील वन्यजीवाला धोकागोरेवाडा जंगल संरक्षित वनक्षेत्र आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात हरीण, मोर व अन्य वन्यप्राणी आहेत. वन्यप्राणी गोरेवाडा तलावातील पाणी पितात. दूषित पाणी पिल्याने वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे.आयुक्तांना चौकशीचे आदेशदूषित पाण्यामुळे गोरेवाडा तलावातील पाणी दूषित होत असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी आयुक्त अभिजित बांगर यांना दिले. महापौरांच्या आदेशानुसार याची चौकशी होते की नाही, याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.स्वतंत्र ट्रंक लाईनची गरजगोरेवाडा तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील वस्त्यातील दूषित पाणी तलावात येऊ नये यासाठी गडरलाईन ट्रंक लाईनला जोडण्याची गरज आहे. यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करावी लागणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी