शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

नागपुरातील गोरेवाडा तलावात नाल्याचे दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 21:28 IST

शहरातील लक्ष्मीनगर, धरमपेठ व मंगळवारी झोनसह इतर भागांना गोरेवाडा तलावातून पाणीपुरवठा केला जातो. दाभा परिसरातील दूषित पाणी गणेशनगर नाल्याद्वारे या तलावात येते. तसेच तलावालगतच्या वस्त्यातील दूषित पाणी थेट तलावात सोडले जात आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देशहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील लक्ष्मीनगर, धरमपेठ व मंगळवारी झोनसह इतर भागांना गोरेवाडा तलावातून पाणीपुरवठा केला जातो. दाभा परिसरातील दूषित पाणी गणेशनगर नाल्याद्वारे या तलावात येते. तसेच तलावालगतच्या वस्त्यातील दूषित पाणी थेट तलावात सोडले जात आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.गोरेवाडा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घरे बांधण्यात आलेली आहेत. या वस्त्यातील दूषित पाणी तलावात सोडले जाते. यामुळे तलावातील पाणी दूषित होत आहे. शहराच्या अर्ध्या भागाला तलावातून पाणीपुरवठा केला जातो. तसेच गोरेवाडा जंगलातील वन्यजीव या तलावातील पाणी पित असल्याने वन्यजीवांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात नगरसेविका दर्शनी धवड यांनी महापालिकेच्या विशेष सभेत प्रश्न उपस्थित करून महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणली.गोरेवाडा तलावात गडरलाईनचे पाणी सोडण्याचा मुद्दा यापूर्वी सभागृहात अनेकदा उपस्थित करण्यात आला. परंतु महापालिका प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही. लोकांच्या आरोग्याशी संबंधित मुद्दा असूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने प्रशासन लोकांच्या आरोग्याविषयी गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले.गोरेवाडा क्षेत्रातील वन्यजीवाला धोकागोरेवाडा जंगल संरक्षित वनक्षेत्र आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात हरीण, मोर व अन्य वन्यप्राणी आहेत. वन्यप्राणी गोरेवाडा तलावातील पाणी पितात. दूषित पाणी पिल्याने वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे.आयुक्तांना चौकशीचे आदेशदूषित पाण्यामुळे गोरेवाडा तलावातील पाणी दूषित होत असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी आयुक्त अभिजित बांगर यांना दिले. महापौरांच्या आदेशानुसार याची चौकशी होते की नाही, याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.स्वतंत्र ट्रंक लाईनची गरजगोरेवाडा तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील वस्त्यातील दूषित पाणी तलावात येऊ नये यासाठी गडरलाईन ट्रंक लाईनला जोडण्याची गरज आहे. यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करावी लागणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी