शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील गोरेवाडा तलावात नाल्याचे दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 21:28 IST

शहरातील लक्ष्मीनगर, धरमपेठ व मंगळवारी झोनसह इतर भागांना गोरेवाडा तलावातून पाणीपुरवठा केला जातो. दाभा परिसरातील दूषित पाणी गणेशनगर नाल्याद्वारे या तलावात येते. तसेच तलावालगतच्या वस्त्यातील दूषित पाणी थेट तलावात सोडले जात आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देशहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील लक्ष्मीनगर, धरमपेठ व मंगळवारी झोनसह इतर भागांना गोरेवाडा तलावातून पाणीपुरवठा केला जातो. दाभा परिसरातील दूषित पाणी गणेशनगर नाल्याद्वारे या तलावात येते. तसेच तलावालगतच्या वस्त्यातील दूषित पाणी थेट तलावात सोडले जात आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.गोरेवाडा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घरे बांधण्यात आलेली आहेत. या वस्त्यातील दूषित पाणी तलावात सोडले जाते. यामुळे तलावातील पाणी दूषित होत आहे. शहराच्या अर्ध्या भागाला तलावातून पाणीपुरवठा केला जातो. तसेच गोरेवाडा जंगलातील वन्यजीव या तलावातील पाणी पित असल्याने वन्यजीवांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात नगरसेविका दर्शनी धवड यांनी महापालिकेच्या विशेष सभेत प्रश्न उपस्थित करून महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणली.गोरेवाडा तलावात गडरलाईनचे पाणी सोडण्याचा मुद्दा यापूर्वी सभागृहात अनेकदा उपस्थित करण्यात आला. परंतु महापालिका प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही. लोकांच्या आरोग्याशी संबंधित मुद्दा असूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने प्रशासन लोकांच्या आरोग्याविषयी गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले.गोरेवाडा क्षेत्रातील वन्यजीवाला धोकागोरेवाडा जंगल संरक्षित वनक्षेत्र आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात हरीण, मोर व अन्य वन्यप्राणी आहेत. वन्यप्राणी गोरेवाडा तलावातील पाणी पितात. दूषित पाणी पिल्याने वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे.आयुक्तांना चौकशीचे आदेशदूषित पाण्यामुळे गोरेवाडा तलावातील पाणी दूषित होत असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी आयुक्त अभिजित बांगर यांना दिले. महापौरांच्या आदेशानुसार याची चौकशी होते की नाही, याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.स्वतंत्र ट्रंक लाईनची गरजगोरेवाडा तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील वस्त्यातील दूषित पाणी तलावात येऊ नये यासाठी गडरलाईन ट्रंक लाईनला जोडण्याची गरज आहे. यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करावी लागणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी