शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

बालपणीचे प्रेम आंधळे आणि बहिरेही !

By admin | Updated: July 15, 2015 03:39 IST

बालपणीचे प्रेम आंधळे असते, अशी प्रेमवीरांच्या दुनियेतील एक म्हण आहे. प्रेम आंधळे तर असतेच शिवाय बहिरेही असते,

एमडी पत्नी आणि बीएस्सी पतीचे वैवाहिक नाते संपुष्टात कौटुंबिक न्यायालयाचा निकाल राहुल अवसरे नागपूरबालपणीचे प्रेम आंधळे असते, अशी प्रेमवीरांच्या दुनियेतील एक म्हण आहे. प्रेम आंधळे तर असतेच शिवाय बहिरेही असते, अशी प्रचिती कौटुंबिक न्यायालयातील एका घटस्फोटाच्या प्रकरणाने आली. प्रेमविवाह करून एका एमडी पत्नीने आणि बीएस्सी पतीने मांडलेला संसार काही काळातच विस्कटला. प्रमुख न्यायाधीश आय. एम. बोहरी यांच्या न्यायालयाने पत्नीची घटस्फोटाची याचिका मंजूर करून पती-पत्नीमधील वैवाहिक संबंध संपुष्टात आल्याचा निकाल दिला.शांतिदुताच्या वर्धेत या दोघांचे बालपण गेले. याचिकाकर्ती १९९८-९९ या काळात दहाव्या वर्गात शिकत असताना तिने एका शाळेत मुख्याध्यापक असलेल्या प्रतिवादीच्या वडिलांकडे शिकवणी वर्ग लावले होते. त्यामुळे तिचे प्रतिवादीच्या घरी येणे-जाणे होते. दोघेही समवयस्क होते. दोघांमध्ये जवळीक वाढत गेली. २००३-०४ या काळात प्रतिवादी हा बीएस्सी शिकत असताना दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला होता. तथापि याचिकाकर्तीच्या आई-वडिलांनी विरोध केला होता. विरोध झुगारून त्यांनी मित्रमंडळीच्या उपस्थितीत ५ डिसेंबर २००६ रोजी हिंदू वैदिक पद्धतीने प्रेमविवाह केला होता. विवाह समारंभात दोघांचेही नातेवाईक नव्हते. १७ फेब्रुवारी २००७ रोजी त्यांनी रीतसर विवाह नोंदणी केली होती. विवाहानंतर याचिकाकर्ती ही आपल्या आईवडिलांकडेच राहत होती. चार वर्षांपासून दोघांमध्ये दुरावानागपूर : ४ मार्च २००७ ते फेब्रुवारी २००८ पर्यंत या दोघांचे वैवाहिक संबंध होते. त्यावेळी तिने आपले एमबीबीएस पूर्ण केले होते. इन्टर्नशिप करीतच तिने एमडीची तयारी सुरू केली होती. एमडीच्या पहिल्या फेरीसाठी ती सर्वात आधी ती नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यानंतर दुसऱ्या फेरीसाठी नागपूरच्या इंदिरा गाधी वैद्यकीय महाविद्यालयात तिने प्रवेश घेतला होता. ती येथील वसतिगृहात राहत होती. प्रतिवादीने वर्धेत आपला व्यवसाय सुरू केला होता. मात्र तो वारंवार नागपुरात येऊन याचिकाकर्तीसोबत राहायचा. मार्च २०११ पासून या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. दरम्यान तिने आपले एमडी पूर्ण केले तर प्रतिवादीने बीएस्सी, बीए, बीएड् आणि एमबीए केले. याचिकाकर्तीनुसार ती स्वत:च्या आर्थिक खर्चाचा भार स्वत:च सांभाळत होती. उलट पतीला महिन्याला चार-पाच हजार रुपये द्यायची. (प्रतिनिधी)पतीने फेटाळले आरोपप्रतिवादीने न्यायालयात दाखल केलेल्या उत्तरात पत्नीचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. आपल्या सासू-सासऱ्याने आपणास कधीही जावई समजले नाही. त्यांना आपल्या पत्नीचा विवाह ओळखीच्या डॉक्टरसोबत करून द्यायचा आहे. आपण पत्नीसोबत संसारास तयार आहोत. परंतु आपली पत्नी आपल्या आई-वडिलांच्या दबावात आहे. आपल्या पत्नीची याचिका फेटाळून पर्जुरीची कारवाई केली जावी, अशी विनंती प्रतिवादीने न्यायालयाला केली होती.दोन्ही बाजूंच्या वकिलांचाही न्यायालयात युक्तिवाद झाला. न्यायालयाने सर्व बाजू ऐकून घेऊन याचिका मंजूर करीत पती-पत्नीमधील वैवाहिक संबंध संपुष्टात आल्याचा निवाडा दिला.