शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील उद्योगांना नवीन ऑर्डरची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 11:48 IST

मोठ्या उद्योगांकडून लघुउद्योगांना ऑर्डर मिळणे बंद झाले आहे. स्थिती सुरळीत होण्यासाठी उद्योगांना आता नवीन ऑर्डरची प्रतीक्षा असल्याचे मत उद्योजकांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे राज्यांमध्ये उद्योगांसाठी सारखे नियम नाहीत; आर्थिक चक्र मंदावले

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनलॉकमध्ये उद्योजकांनी उत्साहाने उद्योग सुरू केले होते; पण ऑर्डर नसल्याने अनेक औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांनी उत्पादन कमी केले तर काहींनी उद्योग बंद केले आहेत. संपूर्ण देशात उद्योगांची स्थिती सुरळीत नसल्याने मोठ्या उद्योगांकडून लघुउद्योगांना ऑर्डर मिळणे बंद झाले आहे. स्थिती सुरळीत होण्यासाठी उद्योगांना आता नवीन ऑर्डरची प्रतीक्षा असल्याचे मत उद्योजकांनी व्यक्त केले.

लॉकडाऊनपूर्वी नागपूर जिल्ह्यात जवळपास २९०० उद्योग सुरू होते. त्यानंतर सर्वच उद्योगांनी नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी घेतली. त्यातील जवळपास २५५० उद्योग सुरू झाले. सध्या ४५ ते ५० टक्के उद्योग ५० ते ६० टक्के क्षमतेने सुरू आहेत. जूनच्या अखेरच्या आठवड्यापासून औद्योगिक क्षेत्राकडून विजेची मागणी कमी झाली. ही मागणी जुलैमध्ये फार कमी झाली आहे. उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. सामाजिक चक्रानंतर आर्थिक चक्र चालते. पण सध्या उद्योगांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. लघुउद्योगांचे सर्वात जास्त हाल होत असल्याचे उद्योजकांनी सांगितले.

कामगारांना पगार देणे कठीणउद्योगांना ऑर्डर मिळाल्यास कंत्राटी पद्धतीने आठवड्यासाठी कामगार कामावर ठेवावे लागतात. ऑर्डर तीन दिवसात पूर्ण झाली तर कामगारांना आठवड्याचा पगार द्यावा लागतो. सध्या मालाला उठाव नसल्याने कुणीही उद्योजक ऑर्डरविना उत्पादनाचा अतिरिक्त साठा करण्यास तयार नाही. हिंगणा आणि बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात इंजिनिअरिंग मालाचे जास्त उत्पादन होते. पण सध्या इंजिनिअरिंग उत्पादनांना फारच कमी मागणी आहे. उत्पादनांना मागणी येण्यास आणखी काही महिने लागणार आहे. त्यानंतरच स्थिती सुरळीत होईल, असे उद्योजकांनी स्पष्ट केले.

आर्थिक घडी सुरळीत होण्याची अपेक्षाराज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात प्रशासनाचे नियम सारखे नाहीत. राज्य शासनाचे प्रशासनावर नियंत्रण नाही. स्थानिक प्रशासन उद्योगधंदे बंद करण्यातच धन्यता मानत आहे. त्यामुळे महसूल संकलनावर परिणाम झाला आहे. विजेची मागणी ५० टक्क्यांवर आली आहे. कारखाना सुरू ठेवायचा की नाही, असे प्रश्न उद्योजकांसमोर उभे राहिले आहेत.कोडे सुटताना दिसत नाही. जास्त उत्पादनाचा साठा करून काय करणार, असा प्रश्न उद्योजकांसमोर आहे. त्यामुळे उद्योग पुन्हा काही दिवस बंद करण्यावर उद्योजकांचा भर दिसून येत आहे. घडी सुरळीत झाल्यानंतर आणि मागणी वाढल्यानंतरच उद्योगांना सुगीचे दिवस येतील, असे मत बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष मिलिंद कानडे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :businessव्यवसाय