शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

राज्यातील उद्योगांना नवीन ऑर्डरची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 11:48 IST

मोठ्या उद्योगांकडून लघुउद्योगांना ऑर्डर मिळणे बंद झाले आहे. स्थिती सुरळीत होण्यासाठी उद्योगांना आता नवीन ऑर्डरची प्रतीक्षा असल्याचे मत उद्योजकांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे राज्यांमध्ये उद्योगांसाठी सारखे नियम नाहीत; आर्थिक चक्र मंदावले

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनलॉकमध्ये उद्योजकांनी उत्साहाने उद्योग सुरू केले होते; पण ऑर्डर नसल्याने अनेक औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांनी उत्पादन कमी केले तर काहींनी उद्योग बंद केले आहेत. संपूर्ण देशात उद्योगांची स्थिती सुरळीत नसल्याने मोठ्या उद्योगांकडून लघुउद्योगांना ऑर्डर मिळणे बंद झाले आहे. स्थिती सुरळीत होण्यासाठी उद्योगांना आता नवीन ऑर्डरची प्रतीक्षा असल्याचे मत उद्योजकांनी व्यक्त केले.

लॉकडाऊनपूर्वी नागपूर जिल्ह्यात जवळपास २९०० उद्योग सुरू होते. त्यानंतर सर्वच उद्योगांनी नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी घेतली. त्यातील जवळपास २५५० उद्योग सुरू झाले. सध्या ४५ ते ५० टक्के उद्योग ५० ते ६० टक्के क्षमतेने सुरू आहेत. जूनच्या अखेरच्या आठवड्यापासून औद्योगिक क्षेत्राकडून विजेची मागणी कमी झाली. ही मागणी जुलैमध्ये फार कमी झाली आहे. उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. सामाजिक चक्रानंतर आर्थिक चक्र चालते. पण सध्या उद्योगांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. लघुउद्योगांचे सर्वात जास्त हाल होत असल्याचे उद्योजकांनी सांगितले.

कामगारांना पगार देणे कठीणउद्योगांना ऑर्डर मिळाल्यास कंत्राटी पद्धतीने आठवड्यासाठी कामगार कामावर ठेवावे लागतात. ऑर्डर तीन दिवसात पूर्ण झाली तर कामगारांना आठवड्याचा पगार द्यावा लागतो. सध्या मालाला उठाव नसल्याने कुणीही उद्योजक ऑर्डरविना उत्पादनाचा अतिरिक्त साठा करण्यास तयार नाही. हिंगणा आणि बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात इंजिनिअरिंग मालाचे जास्त उत्पादन होते. पण सध्या इंजिनिअरिंग उत्पादनांना फारच कमी मागणी आहे. उत्पादनांना मागणी येण्यास आणखी काही महिने लागणार आहे. त्यानंतरच स्थिती सुरळीत होईल, असे उद्योजकांनी स्पष्ट केले.

आर्थिक घडी सुरळीत होण्याची अपेक्षाराज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात प्रशासनाचे नियम सारखे नाहीत. राज्य शासनाचे प्रशासनावर नियंत्रण नाही. स्थानिक प्रशासन उद्योगधंदे बंद करण्यातच धन्यता मानत आहे. त्यामुळे महसूल संकलनावर परिणाम झाला आहे. विजेची मागणी ५० टक्क्यांवर आली आहे. कारखाना सुरू ठेवायचा की नाही, असे प्रश्न उद्योजकांसमोर उभे राहिले आहेत.कोडे सुटताना दिसत नाही. जास्त उत्पादनाचा साठा करून काय करणार, असा प्रश्न उद्योजकांसमोर आहे. त्यामुळे उद्योग पुन्हा काही दिवस बंद करण्यावर उद्योजकांचा भर दिसून येत आहे. घडी सुरळीत झाल्यानंतर आणि मागणी वाढल्यानंतरच उद्योगांना सुगीचे दिवस येतील, असे मत बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष मिलिंद कानडे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :businessव्यवसाय