शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Indian Air Strike on Pakistan; ‘नाऊ द जोश इज हाय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 10:39 IST

भारतीय वायुसेनेने ‘सर्जिकल स्ट्राईक-२’च्या माध्यमातून जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केल्यानंतर संरक्षण दलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनीदेखील कारवाईचे स्वागत केले आहे.

ठळक मुद्देसैन्यातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची भावना‘एअर स्ट्राईक’चे केले स्वागतभारतीय वायुदलाच्या कामगिरीचा अभिमान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय वायुसेनेने ‘सर्जिकल स्ट्राईक-२’च्या माध्यमातून जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केल्यानंतर संरक्षण दलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनीदेखील कारवाईचे स्वागत केले आहे. भारतीय वायुदलाने परत एकदा आपली क्षमता दाखवून दिली असून खºया अर्थाने भारताकडे वाकडी नजर करून पाहणाऱ्यांना धडा शिकविल्याची प्रतिक्रिया त्यांच्याकडून उमटली. नागपुरातील काही सेवानिवृत्त अधिकाºयांच्या भावना ‘लोकमत’ने जाणून घेतल्या व प्रत्येकाच्या बोलण्यातून ‘नाऊ द जोश इज हाय’ असाच सूर निघाला.

तयारीनिशी ‘परफेक्ट’ कारवाईभारताकडून दहशतवादी तळांवर कारवाई अपेक्षितच होती. भारतीय वायुदलाने केलेली कारवाई ही ‘परफेक्ट’ अशीच म्हणावी लागेल. या हल्ल्यानंतर लगेच पाकिस्तान आंतरराष्ट्रीय मदतीसाठी धावेल असे वाटत होते. मात्र आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर अगोदरच त्यांची कोंडी केलेली आहे. पाकिस्तानने ‘प्रॉक्सी वॉर’च्या माध्यमातून भारताविरोधात कारवाया केल्या. त्यामुळे या ‘स्ट्राईक’नंतर पाकिस्तानला बोलण्यासाठी फारशी जागाच राहिलेली नाही. सर्वच पातळ््यांवर पाकिस्तानला एकटे पाडण्याची आवश्यकता आहे. यासाठी सर्व आवश्यक तयारी अगोदरच पूर्ण झाली असल्याचे चित्र आहे. तिन्ही संरक्षण दलेदेखील कुठल्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी सिद्धच आहेत.-रवींद्र थोडगे, लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त)

सरकारने असेच स्वातंत्र्य द्यावेभारतीय वायुदलाने केलेल्या कामगिरीला अद्वितीय असेच म्हणावे लागले. पाकिस्तान व दहशतवाद्यांना भारताची नेमकी क्षमता समजली असेल. शत्रूच्या घरात घुसून मारणे याला नियोजन, हिंमत व आत्मविश्वास लागतो. सोबतच पुलवामा येथे आपले जवान शहीद झाल्यानंतर केंद्र सरकारनेदेखील सैन्याला स्वातंत्र्य दिले होते. त्याचा परिणाम या ‘स्ट्राईक’च्या माध्यमातून दिसून आला. तसे पाहिले तर १४ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी हा कालावधी फारच कमी होता. मात्र त्यातही अतिशय योग्य नियोजन करून कारवाई करण्यात आली. आता नक्कीच पाकची घाबरगुंडी उडाली आहे. जर पाकिस्तानने पुढेदेखील कुरापती सुरूच ठेवल्या तर त्यांना याच भाषेत उत्तर द्यायला हवे. तसेच सरकारनेदेखील सैन्याला स्वातंत्र्य द्यावे.- अनिल बाम, मेजर जनरल (सेवानिवृत्त)

सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा ‘स्ट्राईक’पुलवामा येथे भ्याड हल्ला करून भारतीय जवानांचा बळी घेणारे दहशतवादी व त्यांना प्रोत्साहन देणाºया पाकिस्तानला योग्य प्रत्युत्तर देणे आवश्यकच होते. २०१६ साली भारताने केलेला ‘सर्जिकल स्ट्राईक’ पाकिस्तानने नाकारला होता. मात्र यंदा त्यांनीच याला दुजोरा दिला आहे. सामरिकदृष्ट्या हा अतिशय महत्त्वाचा ‘स्ट्राईक’ आहे. यातून भारतीय वायुसेनेची क्षमतादेखील सिद्ध झाली आहे. ‘मिराज’ विमानांची ‘नेव्हिगेशन’ प्रणाली सर्वोत्तम आहे. बालाकोट तसेच परिसरातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता येथे कारवाई करणे आव्हानात्मकच होते. वायुदलाने केलेली कामगिरी कौतुकास पात्र आहे. मात्र यानंतर पाकिस्तान काही तरी करण्याचा निश्चित प्रयत्न करेल. त्यामुळे सर्व पातळ््यांवर आपण सावध राहिले पाहिजे.-अभय पटवर्धन, कर्नल (सेवानिवृत्त)

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक