शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

अफगाणिस्तानच्या पुनर्रचनेत भारताची भूमिका महत्त्वाची

By admin | Updated: February 25, 2017 02:09 IST

या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अफगाण व भारत मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ झाले आहेत.

सुब्बारायडू : राजस्व विभागातील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा समारोप नागपूर : या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अफगाण व भारत मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ झाले आहेत. भारत हा अफगाणिस्तानच्या पुनर्रचनेत व विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. क्षमतानिर्माणासाठी भारत सरकारने एक अरब डॉलरची तरतूद केली आहे, अशी माहिती केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव सुब्बारायडू यांनी दिली. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी, नागपूर येथे दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या अफगाणिस्तानच्या राजस्व विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षणाचा समारोप शुक्रवारी झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुंबईचे मुख्य आयकर आयुक्त विधू शेखर सिंघ, राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे प्रधान संचालक रंगनाथ झा, अतिरिक्त महासंचालिका लीना श्रीवास्तव व नौशीत अंसारी प्रामुख्याने उपस्थित होत्या. सुब्बारायडू पुढे म्हणाले, भारत- अफगाणिस्तानच्या व्यापारविषयक संबंधाच्या दृष्टीने रोड-कनक्टेविटी महत्त्वाची असून चाबहार बंदराच्या माध्यमातून या क्षेत्रात चांगले परिणाम दिसून येतील. सलमा डॅमच्या साहाय्याने विद्युत निर्मिती व सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले असून सिंचन विकास व जलव्यवस्थापन यांना प्राधान्य दिले जात आहे. इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, काबूल येथे चिकित्सा केंद्राची स्थापना केली जात आहे. क्षमता निर्माण कार्यक्रमाअंतर्गत दरवर्षी एक हजार अफगाण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात असून ती पुढील पाच वर्षांपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. विधू शेखर सिंघ म्हणाले, राजस्व संकलन हे अर्थव्यवस्थेचा कणा असून राजस्व अधिकारी बजावत असलेली भूमिका ही लक्षणीय आहे. भारत अफगाणिस्तानला विविध क्षेत्रात मदत करत असून राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीने या प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे दोनही देशाला कर-प्रशासनात दोघांसाठीही फायदेशीर ठरेल, अशी स्थिती निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)