शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भारताकडे जगाला नवी दिशा देण्याची क्षमता : ज्ञानेश्वर मुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 21:45 IST

भारताइतकी विविधता जगात कुठेही नाही. भाषा, पंथ, धर्म अशा अनेक विविधता आहेत. मात्र तरी ते एकत्र सुखी समाधानाने राहतात. हीच खरी येथील नागरिकांची क्षमता आहे. यातून आपण जगाला एक चांगले मॉडेल देऊ शकतो. जगाला नवी दिशा देण्याची क्षमता भारताकडे आहे. परंतु ते करीत असताना भारतीय संविधान हे एकमेव मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त पराराष्ट्र सचिव व माजी राजदूत डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी येथे केले.

ठळक मुद्देभारतीय संविधान हेच मार्गदर्शक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारताइतकी विविधता जगात कुठेही नाही. भाषा, पंथ, धर्म अशा अनेक विविधता आहेत. मात्र तरी ते एकत्र सुखी समाधानाने राहतात. हीच खरी येथील नागरिकांची क्षमता आहे. यातून आपण जगाला एक चांगले मॉडेल देऊ शकतो. जगाला नवी दिशा देण्याची क्षमता भारताकडे आहे. परंतु ते करीत असताना भारतीय संविधान हे एकमेव मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त पराराष्ट्र सचिव व माजी राजदूत डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी येथे केले.विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल (वेद)तर्फे शनिवारी सायंकाळी प्रेस क्लब सिव्हील लाईन्स येथे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारेख व राहुल उपगन्लावार प्रामुख्याने उपस्थित होते. ‘भारताची मागील ३५ वर्षाची वाटचाल’हा व्याख्यानाचा विषय होता.डॉ. मुळे म्हणाले, स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही आपली ओळख जात हीच आहे. निवडणूक सुद्धा जातीच्या आधारावरच लढवली जात आहे. आपण संकुचित विचारात जगतो आहोत. यातून बाहेर पडण्याची गरज आहे. इतर देशांचा अभ्यास करायला हवा. आज आपण ग्लोबल झालो आहोत. सोशल मीडियामुळे जगातील कुठल्याही देशातील व्यक्तीसोबत आपण जुळलेलो आहोत. हीच खरी सुंदरता आहे. राजदूत हा भारताबाहेर राहून देशाचे रक्षण करणारा खऱ्या अर्थाने देशाचा सैनिकच आहे. यावेळी त्यांनी विविध देशांमध्ये काम करीत असताना कशा प्रकारे देशाची सेवा करता आली, याचे किस्से सांगितले.संचालन योगिता कस्तुरे यांनी केले. शिवकुमार राव यांनी आभार मानले.जगात कुठेही फसलेल्या भारतीयाला सुरक्षित बाहेर काढण्याची क्षमताडॉ. मुळे यांनी सांगितले की, एक वेळ अशी होती की जागतिक स्तरावर काही समस्या निर्माण झाल्यास अमेरिकेकडे मदतीसाठी पाहावे लागत होते. परंतु आता तशी परिस्थिती राहिली नाही. आज जगात कुठल्याही देशात फसलेल्या भारतीयास सुरक्षित बाहेर काढण्याची क्षमता आपल्या देशात आहे. यासाठी विदेशी मंत्रालयाशी संपर्क करावा. आतापर्यंत ४० देशात फसलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेले आहे. जगाला आपली शक्ती दाखवण्याची ही एक चांगली संधी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.‘पासपोर्ट’ ही एक संधीडॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना पासपोर्ट मॅन म्हणूनही ओळखले जाते. परराष्ट्र विभागात सचिव असताना त्यांनी आपल्या कार्यकाळात देशभरात ५१० पासपोर्टऑफिस सुरू केले. याबाबत बोलताना डॉ. मुळे म्हणाले पासपोर्ट हे केवळ एक दस्तावेज नसून ती एक संधी आहे. आजचा पासपोर्टधारक उद्या विदेशी पासपोर्ट धारकही होऊ शकतो. जगभरात विविध संधी आहेत.आपण त्याला नोकरी देऊ शकत नसू किंवा संधी देऊ शकत नसू आणि ती संधी त्याला विदेशात मिळत असेल तर त्याला जाऊ द्या, असेही ते म्हणाले.

टॅग्स :IndiaभारतMediaमाध्यमे