शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भारताला कुणाकडूनही बुद्ध शिकण्याची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 20:28 IST

चीनच्या मते आमचा बुद्ध धर्म श्रेष्ठ आहे, जपान आणि थायलंडही आमच्याकडून भारताला बुद्धीझम शिकावे लागेल, असे म्हणतो. परंतु जेथे बुद्धाचा जन्म झाला त्या भारत देशाला इतरांकडून बुद्ध शिकण्याची आणि उपदेश घेण्याची गरज नाही, असे प्रतिपादन थायलंड येथील प्रसिद्ध जागतिक बौद्ध विद्यापीठाचे कुलगुरू भदंत फ्रा अनिल शाक्य यांनी केले.

ठळक मुद्देभदंत अनिल शाक्य : आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चीनच्या मते आमचा बुद्ध धर्म श्रेष्ठ आहे, जपान आणि थायलंडही आमच्याकडून भारताला बुद्धीझम शिकावे लागेल, असे म्हणतो. परंतु जेथे बुद्धाचा जन्म झाला त्या भारत देशाला इतरांकडून बुद्ध शिकण्याची आणि उपदेश घेण्याची गरज नाही, असे प्रतिपादन थायलंड येथील प्रसिद्ध जागतिक बौद्ध विद्यापीठाचे कुलगुरू भदंत फ्रा अनिल शाक्य यांनी केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्रातर्फे आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात, कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम, पाली, प्राकृत विभागाचे प्रमुख डॉ. नीरज बोधी उपस्थित होते. भदंत अनिल शाक्य म्हणाले, खरा बुद्ध धर्म हा कुणालाच कळालेला नाही. भगवान बुद्धांनी ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सारनाथला दिलेल्या उपदेशामुळे रूढी, परंपरा, धर्मवादाला तडा गेला. शांतीसाठी आजकाल परिषदांचे आयोजन करण्यात येते. त्यात खरी शांती नसून प्रत्यक्ष कृती होत नाही. शांती ही जगण्याच्या सर्व वस्तू मिळाल्याशिवाय मिळत नाही. पाश्चात्यांनी अनेक बुद्ध धर्म निर्माण केले. लोकांना बुद्ध धर्मापासून दूर नेण्यासाठी त्यांनी मन कलुषित करण्याला सुरुवात केली. बुद्ध हे शाश्वत सत्य आहे. बुद्ध होणे म्हणजे शाश्वत सत्यापर्यंत पोहोचणे. आपल्याला मिळत असलेल्या मिळकतीपैकी २५ टक्के जवळ ठेवणे, २५ टक्के दान करणे आणि ५० टक्के समाजाला परत करणे हे बुद्धाचे जगण्याचे अर्थशास्त्र आहे. त्यामुळे बौद्ध अध्ययन केंद्रातून खरे बुद्धीस्ट तत्त्वज्ञान शिकविणे ही विद्यापीठाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात म्हणाले, सध्या देशात असमानता पसरली आहे. गरीब अधिकच गरीब होत चालला असून श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे. त्यामुळे वंचित शोषितांच्या विकासासाठी काम करणे हे प्रत्येकाचे ध्येय असले पाहिजेत. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी बुद्धांनी जगाला तारणारे महान तत्त्वज्ञान दिल्याचे सांगून करुणा, शांती, समानता ही मूल्ये जवळपास सर्वच धर्मात समान असल्याचे सांगितले. संचालन डॉ. विकास जांभुळकर यांनी केले. आभार डॉ. नीरज बोधी यांनी मानले. परिषदेला विविध देशातून आलेले प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.देशाला पुन्हा धम्मचक्र प्रवर्तनाची गरजसंयुक्त राष्ट्रातर्फे चिरंतन विकासाचा प्रचार-प्रसार करण्यात येत आहे. परंतु चिरंतन विकास म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन होत. यात धम्म म्हणजे धरुन ठेवणे, चक्र म्हणजे पुढे जाणे आणि प्रवर्तन म्हणजे बदल होय. त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन हेच चिरंतन विकासाचे मॉडेल असून देशाला शाश्वत विकासाकडे नेण्यासाठी पुन्हा धम्मचक्र प्रवर्तनाची गरज आहे, असे मत भदंत अनिल शाक्य यांनी मांडले. 

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठcultureसांस्कृतिक