शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

भारताला कुणाकडूनही बुद्ध शिकण्याची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 20:28 IST

चीनच्या मते आमचा बुद्ध धर्म श्रेष्ठ आहे, जपान आणि थायलंडही आमच्याकडून भारताला बुद्धीझम शिकावे लागेल, असे म्हणतो. परंतु जेथे बुद्धाचा जन्म झाला त्या भारत देशाला इतरांकडून बुद्ध शिकण्याची आणि उपदेश घेण्याची गरज नाही, असे प्रतिपादन थायलंड येथील प्रसिद्ध जागतिक बौद्ध विद्यापीठाचे कुलगुरू भदंत फ्रा अनिल शाक्य यांनी केले.

ठळक मुद्देभदंत अनिल शाक्य : आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चीनच्या मते आमचा बुद्ध धर्म श्रेष्ठ आहे, जपान आणि थायलंडही आमच्याकडून भारताला बुद्धीझम शिकावे लागेल, असे म्हणतो. परंतु जेथे बुद्धाचा जन्म झाला त्या भारत देशाला इतरांकडून बुद्ध शिकण्याची आणि उपदेश घेण्याची गरज नाही, असे प्रतिपादन थायलंड येथील प्रसिद्ध जागतिक बौद्ध विद्यापीठाचे कुलगुरू भदंत फ्रा अनिल शाक्य यांनी केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्रातर्फे आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात, कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम, पाली, प्राकृत विभागाचे प्रमुख डॉ. नीरज बोधी उपस्थित होते. भदंत अनिल शाक्य म्हणाले, खरा बुद्ध धर्म हा कुणालाच कळालेला नाही. भगवान बुद्धांनी ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सारनाथला दिलेल्या उपदेशामुळे रूढी, परंपरा, धर्मवादाला तडा गेला. शांतीसाठी आजकाल परिषदांचे आयोजन करण्यात येते. त्यात खरी शांती नसून प्रत्यक्ष कृती होत नाही. शांती ही जगण्याच्या सर्व वस्तू मिळाल्याशिवाय मिळत नाही. पाश्चात्यांनी अनेक बुद्ध धर्म निर्माण केले. लोकांना बुद्ध धर्मापासून दूर नेण्यासाठी त्यांनी मन कलुषित करण्याला सुरुवात केली. बुद्ध हे शाश्वत सत्य आहे. बुद्ध होणे म्हणजे शाश्वत सत्यापर्यंत पोहोचणे. आपल्याला मिळत असलेल्या मिळकतीपैकी २५ टक्के जवळ ठेवणे, २५ टक्के दान करणे आणि ५० टक्के समाजाला परत करणे हे बुद्धाचे जगण्याचे अर्थशास्त्र आहे. त्यामुळे बौद्ध अध्ययन केंद्रातून खरे बुद्धीस्ट तत्त्वज्ञान शिकविणे ही विद्यापीठाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात म्हणाले, सध्या देशात असमानता पसरली आहे. गरीब अधिकच गरीब होत चालला असून श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे. त्यामुळे वंचित शोषितांच्या विकासासाठी काम करणे हे प्रत्येकाचे ध्येय असले पाहिजेत. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी बुद्धांनी जगाला तारणारे महान तत्त्वज्ञान दिल्याचे सांगून करुणा, शांती, समानता ही मूल्ये जवळपास सर्वच धर्मात समान असल्याचे सांगितले. संचालन डॉ. विकास जांभुळकर यांनी केले. आभार डॉ. नीरज बोधी यांनी मानले. परिषदेला विविध देशातून आलेले प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.देशाला पुन्हा धम्मचक्र प्रवर्तनाची गरजसंयुक्त राष्ट्रातर्फे चिरंतन विकासाचा प्रचार-प्रसार करण्यात येत आहे. परंतु चिरंतन विकास म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन होत. यात धम्म म्हणजे धरुन ठेवणे, चक्र म्हणजे पुढे जाणे आणि प्रवर्तन म्हणजे बदल होय. त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन हेच चिरंतन विकासाचे मॉडेल असून देशाला शाश्वत विकासाकडे नेण्यासाठी पुन्हा धम्मचक्र प्रवर्तनाची गरज आहे, असे मत भदंत अनिल शाक्य यांनी मांडले. 

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठcultureसांस्कृतिक