शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

जातीअंताशिवाय भारत विकसित होऊ शकत नाही :राहुल वानखेडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:18 IST

आजही जातीयता जोपासली जात आहे. जोपर्यंत जातीयता आहे, तोपर्यंत भारत विकसित होऊच शकत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राहुल वानखेडे यांनी केले.

ठळक मुद्दे ‘भारतातील कामगारांचे भवितव्य’ यावर मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजही जातीयता जोपासली जात आहे. जोपर्यंत जातीयता आहे, तोपर्यंत भारत विकसित होऊच शकत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राहुल वानखेडे यांनी केले.महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि कामगार दिनानिमित्त कास्ट्राईब संघटनेतर्फे उद्योग भवन सिव्हील लाईन्स येथे आयोजित ‘भारतातील कामगारांचे भवितव्य’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनचे अध्यक्ष अरुण गाडे होते. तर वन कामगार संघटनेचे अध्यक्ष अजय पाटील, वनामतचे माजी अतिरिक्त संचालक राजरत्न कुंभारे, आत्माचे उपसंचालक रविकांत गौतमी, डॉ. प्रदीप आगलावे, भय्यासाहेब शेलारे, गजानन थुल प्रमुख पाहुणे होते.अरुण गाडे यांनी अध्यक्षीय भाषणात जातीवाद आणि भांडवलशाहीमुळे देश संक्रमणातून जात असल्याचे सांगितले. उच्चवर्ग व गरीब यांच्यात प्रचंड दरी निर्माण झाली आहे. सामान्य माणसाच्या प्रश्नांच्या वाव मिळत नाही. सर्वसामान्यांना न्याय प्राप्त करून द्यायचा असेल तर सर्व बहुजनांनी एकत्र येऊन आपला विकास घडवून आणावा, असे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र माणके यांनी केले. संचालन धर्मेश दुपारे यांनी तर सीताराम राठोड यांनी आभार मानले.विविध पुरस्कार प्रदानयावेळी कस्ट्राईब संघटनेतर्फे विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, साहित्यिक डॉ. सरोज आगलावे, माजी शिक्षणाधिकारी एन.ए. ठमके, सामाजिक कार्यकर्ता रमेश फुले, उपायुक्त सुधीर शंभरकर यांना कास्ट्राईब सामाजिक समता पुरस्कार प्रदान करण्यात आला. संजय गोडघाटे व राजेश ढेंगरे यांना उत्कृष्ट कामगार, महेंद्र माणके उत्कृष्ट अधिकारी, मिलिंद कीर्ती, अमन कांबळे, शरद नागदिवे, राजेशकुमार सिंग, मनोहर चव्हाण यांना पत्रकारिता तर सिद्धार्थ उके यांना उत्कृष्ट संघटक म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला.

टॅग्स :nagpurनागपूर