शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

जातीअंताशिवाय भारत विकसित होऊ शकत नाही :राहुल वानखेडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:18 IST

आजही जातीयता जोपासली जात आहे. जोपर्यंत जातीयता आहे, तोपर्यंत भारत विकसित होऊच शकत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राहुल वानखेडे यांनी केले.

ठळक मुद्दे ‘भारतातील कामगारांचे भवितव्य’ यावर मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजही जातीयता जोपासली जात आहे. जोपर्यंत जातीयता आहे, तोपर्यंत भारत विकसित होऊच शकत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राहुल वानखेडे यांनी केले.महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि कामगार दिनानिमित्त कास्ट्राईब संघटनेतर्फे उद्योग भवन सिव्हील लाईन्स येथे आयोजित ‘भारतातील कामगारांचे भवितव्य’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनचे अध्यक्ष अरुण गाडे होते. तर वन कामगार संघटनेचे अध्यक्ष अजय पाटील, वनामतचे माजी अतिरिक्त संचालक राजरत्न कुंभारे, आत्माचे उपसंचालक रविकांत गौतमी, डॉ. प्रदीप आगलावे, भय्यासाहेब शेलारे, गजानन थुल प्रमुख पाहुणे होते.अरुण गाडे यांनी अध्यक्षीय भाषणात जातीवाद आणि भांडवलशाहीमुळे देश संक्रमणातून जात असल्याचे सांगितले. उच्चवर्ग व गरीब यांच्यात प्रचंड दरी निर्माण झाली आहे. सामान्य माणसाच्या प्रश्नांच्या वाव मिळत नाही. सर्वसामान्यांना न्याय प्राप्त करून द्यायचा असेल तर सर्व बहुजनांनी एकत्र येऊन आपला विकास घडवून आणावा, असे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र माणके यांनी केले. संचालन धर्मेश दुपारे यांनी तर सीताराम राठोड यांनी आभार मानले.विविध पुरस्कार प्रदानयावेळी कस्ट्राईब संघटनेतर्फे विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, साहित्यिक डॉ. सरोज आगलावे, माजी शिक्षणाधिकारी एन.ए. ठमके, सामाजिक कार्यकर्ता रमेश फुले, उपायुक्त सुधीर शंभरकर यांना कास्ट्राईब सामाजिक समता पुरस्कार प्रदान करण्यात आला. संजय गोडघाटे व राजेश ढेंगरे यांना उत्कृष्ट कामगार, महेंद्र माणके उत्कृष्ट अधिकारी, मिलिंद कीर्ती, अमन कांबळे, शरद नागदिवे, राजेशकुमार सिंग, मनोहर चव्हाण यांना पत्रकारिता तर सिद्धार्थ उके यांना उत्कृष्ट संघटक म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला.

टॅग्स :nagpurनागपूर