शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामना; ‘मॅच’साठी तगडा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 09:53 IST

पुलवामा हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील जामठा स्टेडियमवर मंगळवारी भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना पार पडणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने पोलिसांनी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारली आहे.

ठळक मुद्देहॉटेल, स्टेडियमला गराडा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुलवामा हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील जामठा स्टेडियमवर मंगळवारी भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना पार पडणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने पोलिसांनी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. यापूर्वीच्या क्रिकेट सामन्याच्या बंदोबस्ताच्या तुलनेत यावेळी ३० टक्के पोलीस बंदोबस्त जास्त लावण्यात आल्याची माहिती सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी दिली. ५ मार्चला जामठ्याला होऊ घातलेल्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने पोलिसांनी कशी सुरक्षा व्यवस्था केली, त्याची माहिती सहआयुक्त कदम यांनी रविवारी सायंकाळी पोलीस जिमखान्यात पत्रकारांना दिली. यावेळी वाहतूक शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे, गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम, विशेष शाखेच्या उपायुक्त निर्मलादेवी आणि परिमंडळ-१चे उपायुक्त विवेक मासाळ उपस्थित होते. कोणत्याही प्रकारच्या घातपाताची धमकी नाही. मात्र, सध्याची स्थिती लक्षात घेता पोलिसांनी सुरक्षेसंबंधाने खबरदारीच्या सर्व उपाययोजना आखल्या आहेत.छत्रपती चौक ते जामठा स्टेडियमपर्यंत बंदोबस्ताची विभागणी १२ सेक्टरमध्ये करण्यात आली आहे. त्यासाठी १२०० पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण १५०० पोलीस अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तात तैनात राहणार आहेत. याव्यतिरिक्त वाहतूक शाखेचे ४२५ पोलीसही सुरक्षा व्यवस्थेत तैनात राहणार असल्याचे सहआयुक्त कदम म्हणाले. स्टेडियमच्या आत-बाहेर आणि सभोवताल पोलिसांचे सुरक्षा कवच राहणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियातील खेळाडू ज्या हॉटेल्समध्ये थांबणार आहेत, त्या हॉटेल्सच्या आत-बाहेर आणि परिसरातही चोख बंदोबस्त लावण्यात येईल. कोणत्याच अनोळखी व्यक्तीला आजूबाजूच्या परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. मैदानाच्या आत-बाहेर पोलिसांव्यतिरिक्त शीघ्र कृती दलाच्या (क्यूआरटी) तुकड्या सज्ज राहणार असून, चार बॉम्ब शोधक आणि नाशक पथकेही (बीडीडीएस) तैनात करण्यात आली आहेत. ऐनवेळी उद्भवणाऱ्या स्थितीमुळे वेळेवर धावपळ होऊ नये म्हणून अग्निशमन दल आणि अ‍ॅम्बुलन्सही तयार ठेवण्यात येणार असल्याचे सहआयुक्त कदम यांनी सांगितले.

१० सेक्टरमध्ये वाहतूक पोलीसविविध वाहनांनी विविध भागातून येणारे क्रिकेट रसिक आणि त्यामुळे या मार्गावर अचानक वाढणारी वाहनांची गर्दी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन बिघडविणारी ठरते. त्यामुळे वाहतूक शाखेचे पोलीस १० सेक्टरमध्ये बंदोबस्ताची धुरा सांभाळणार आहेत. त्यानुसार छत्रपती चौकातून जामठा स्टेडियमपर्यंत वाहतूक शाखेचे पोलीस रंगीत तालीम करणार आहेत, असे यावेळी वाहतूक शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे यांनी सांगितले.खबरदारीचे दावे प्रत्येक वेळी केले जातात मात्र प्रत्येक सामन्याच्या वेळी वाहतूक रखडते आणि रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो, ही बाब लक्षात आणून दिली असता, यावेळी तसे काही होणार नाही, याची आम्ही काळजी घेत असल्याचे उपायुक्त भरणे म्हणाले. त्या अनुषंगानेच वर्धा मार्ग दोन भागात विभाजित करण्यात आला असून आणीबाणीच्या वेळेस किंवा रुग्ण अडकून पडल्यास या एका मार्गाचा वापर केला जाणार आहे, असे ते म्हणाले.

प्रत्येकाची कसून तपासणीसामना बघण्यासाठी सुमारे ४५ हजार प्रेक्षक येण्याचा अंदाज आहे. सुरक्षेच्या योजनेनुसार स्टेडियमच्या आतच नव्हे तर परिसरातही कुणाला सहजपणे प्रवेश मिळणार नाही. विमानतळावर होते, त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती आणि वाहनाची कसून तपासणी केली जाईल. पोलीस आयुक्त, सहआयुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त सकाळपासून रात्रीपर्यंत बंदोबस्ताचा मिनिट टू मिनिट आढावा घेत राहतील. ऐनवेळी वाहनांना आग लागली किंवा धावपळ निर्माण झाली तर चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण होणार नाही, याचीही पुरती काळजी घेण्यात आली आहे.

टॅग्स :India vs Australiaभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया