शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

घोटाळ्यांशी निपटण्यासाठी लवकरच स्वतंत्र यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 21:32 IST

सार्वजनिक निधीच्या घोटाळ्यांशी निपटण्यासाठी सर्वांच्या हस्तक्षेपापासून लांब असणारी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्याचा विचार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बोलून दाखवला असून यासंदर्भात लवकरच आदेश जारी केला जाणार आहे.

ठळक मुद्देहायकोर्ट देणार आदेश : सरकारच्या उदासीन कारभारावर ताशेरे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सार्वजनिक निधीच्या घोटाळ्यांशी निपटण्यासाठी सर्वांच्या हस्तक्षेपापासून लांब असणारी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्याचा विचार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बोलून दाखवला असून यासंदर्भात लवकरच आदेश जारी केला जाणार आहे.सार्वजनिक निधीत घोटाळे करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी राज्य सरकार तातडीने पावले उचलत नसल्याची बाब न्यायालयाला खटकली आहे. एक -दोन नाही तर, अनेक प्रकरणांमध्ये असे झाल्याचे न्यायालयाला आढळून आले आहे. घोटाळेबाजांवर सरकार वेळीच योग्य कारवाई करीत नाही. बरेचदा न्यायालयाने आदेश दिल्यानंतर कारवाईची प्रक्रिया सुरू केली जाते. तेव्हापर्यंत महत्त्वपूर्ण पुरावे नष्ट होऊन जातात. घोटाळ्यांमुळे सार्वजनिक निधीचे नुकसान होते. घोटाळ्याच्या चौकशीमध्ये सरकारची ऊर्जा व्यर्थ जाते. प्रकरण न्यायालयात आल्यास न्यायव्यवस्थेचा किमती वेळ खर्ची होतो. शेवटी हातात ठोस म्हणावे असे काहीच लागत नाही. ही बाब लक्षात घेता जनहिताकरिता सार्वजनिक निधीच्या घोटाळ्यांशी निपटण्यासाठी सर्वांच्या हस्तक्षेपापासून लांब असणारी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्याची गरज दिसून येत आहे असे विचार न्यायालयाने व्यक्त केले आहेत. तसेच, यासंदर्भात आवश्यक निर्देश देण्यासाठी संबंधित प्रकरणावर २५ जुलै रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे.त्या प्रकरणात सहा वर्षानंतर कारवाईयवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी, राळेगाव व केळापूर तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गतच्या कामांत झालेल्या आर्थिक घोटाळ्यामध्ये सहा वर्षांनंतर कारवाई सुरू करण्यात आली. ही कामे मार्च-२०१२ पूर्वीची असून सुरुवातीच्या तक्रारीनंतर घोटाळ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते मधुकर निस्ताने यांनी २०१३ मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.न्यायालयाने दणका दिल्यानंतर सरकार खडबडून जागे झाले व सध्या उपलब्ध असलेल्या अपूर्ण रेकॉर्डवरून आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आले व विभागीय चौकशीकरिता दोषारोपपत्र निश्चित करण्यात आले. सरकारी उदासीनतेचा असाच प्रकार इतर अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयाला पहायला मिळाला आहे. त्यामुळे न्यायालयाने घोटाळे थांबविण्यासाठी व आरोपींवर कठोर कारवाई होण्यासाठी हा विषय व्यापकतेने हाताळण्याचा निश्चय केला आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. महेश धात्रक कामकाज पहात आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयfraudधोकेबाजी