शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

Independence Day 2018! झेंडा उंचा रहें हमारा ....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 10:34 IST

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून घोषित करण्यात आलेल्या मानाच्या राष्ट्रपती पदकांपैकी ८ शौर्यपदकांसह तब्बल ५१ पदके मिळवून महाराष्ट्राने देशात आपल्या शौर्याचा झेंडा फडकावला आहे.

ठळक मुद्देस्वातंत्र्यदिनाचे औचित्य : ५१ राष्ट्रपती पदक मिळवून महाराष्ट दुसऱ्या स्थानी

नरेश डोंगरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून घोषित करण्यात आलेल्या मानाच्या राष्ट्रपती पदकांपैकी ८ शौर्यपदकांसह तब्बल ५१ पदके मिळवून महाराष्ट्राने देशात आपल्या शौर्याचा झेंडा फडकावला आहे. सर्वाधिक ७७ पदके उत्तर प्रदेशाने मिळवली. मात्र, त्यातील शौर्यपदक केवळ एकच आहे हे येथे उल्लेखनीय.देशाच्या आणि देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सेवारत असलेल्या सुरक्षा यंत्रणा तसेच त्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांनी बजावलेल्या अत्युच्च कामगिरीचा आढावा घेत दरवर्षी स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध मानाच्या पदकाने सन्मानित केले जाते. अतुल्य शौर्य दाखविणाऱ्यांना राष्ट्रपती शौर्यपदक (पीपीएमजी), खडतर ठिकाणी शौर्यपूर्ण कामगिरी करणाऱ्यांना शौर्यपदक (पीएमजी), वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी बजावणाऱ्यांना (पीपीएम) आणि गुणवत्तापूर्ण सेवा देणाऱ्यांना (पीएम) हे मानाचे पदक देऊन संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव केला जातो. यावर्षी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यनिहाय आणि दलनिहाय ९४२ पदकं जाहीर करण्यात आली. त्यात २ राष्ट्रपती पोलीस पदकं, १७७ शौर्यपदकं, ८८ वैशिष्ट्यपूर्ण सेवापदकं आणि ६७५ गुणवत्तापूर्ण सेवापदकांचा समावेश आहे.यापैकी सर्वाधिक ७७ पदके उत्तर प्रदेशने मिळवली आहे तर ५१ पदके मिळवून महाराष्ट्रने आपला झेंडा देशाच्या सन्मानाच्या शिखरावर रोवला आहे. महाराष्ट्रातील आठ जणांना खडतर ठिकाणी सेवेबद्दल शौर्यपदकं , वैशिष्ट्यपूर्ण सेवेबद्दल तीन जणांना तर गुणवत्तापूर्ण सेवा देणाऱ्या ४० जणांना पदकं घोषित झाली आहेत. ३७ शौर्यपदकांसह एकूण ४७ पदकं प्राप्त करून जम्मू-काश्मीर तृतीय, ३२ पदकांसह आसाम चतुर्थ आणि २९ पदके मिळवून ओडिशा तसेच गुजरातने पाचवे स्थान पटकावले आहे.

नागपूरला सात पदकांचा सन्माननागपूरला सात पदकांचा सन्मान मिळाला. त्यापैकी नुकतेच नागपुरातून पुण्यात बदलून गेलेले सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांना वैशिष्ट्यपूर्ण सेवेबद्दल, पोलीस कर्मचारी रमाकांत बावीस्कर, कल्पना धवड, रेल्वे सुरक्षा दलातील हवलदार ए रामाक्रीष्णा आणि एएएसआय सी. बी. सिंग यांना तसेच नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कर्मचारी राजू हाते, संजय राजारामजी तलवारे तसेच विठ्ठल उगले आणि महेंद्र शहाणे यांनाही सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.

सीआरपीएफ अव्वलस्थानी !दलनिहाय (फोर्सवाईज) कामगिरीचा आढावा घेऊन जाहिर झालेल्या पदकांपैकी एकूण १५४ पदके मिळवत केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) देशात अव्वलस्थान मिळवले आहे. सीआरपीएफने दोन राष्ट्रपती शौर्य पदकं, ८९ शौर्यपदकं, पाच वैशिष्टयपूर्ण सेवा पदकं आणि ५८ गुणवत्तापूर्ण सेवा पदकं जाहिर झाली आहे. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) एकूण ६१ पदके मिळवली आहेत. आयबीने ३४, सीबीआयने ३० तर सीआयएसएफने २६ पदके पटकावली आहेत.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवस