शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

संविधान व बाबासाहेबांमुळेच महिलांना स्वातंत्र्य व अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:00 IST

भारतीय सामाजिक व्यवस्थेत अस्पृश्यांसह हजारो वर्षांपासून महिलांनाही गुलामगिरीत जगावे लागले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही या स्थितीत फारसा बदल घडला नाही. मात्र महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानामुळेच खऱ्या अर्थाने भारतीय स्त्रियांना स्वातंत्र्य आणि अधिकार मिळाले, असे प्रतिपादन अ‍ॅड. जयश्री शेळके यांनी केले.

ठळक मुद्देदीक्षाभूमी : महिला परिषदेत जयश्री शेळके यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय सामाजिक व्यवस्थेत अस्पृश्यांसह हजारो वर्षांपासून महिलांनाही गुलामगिरीत जगावे लागले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही या स्थितीत फारसा बदल घडला नाही. मात्र महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानामुळेच खऱ्या अर्थाने भारतीय स्त्रियांना स्वातंत्र्य आणि अधिकार मिळाले, असे प्रतिपादन अ‍ॅड. जयश्री शेळके यांनी केले.६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहब आंबेडकर स्मारक समिती व दीक्षाभूमि महिला धम्म संयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यामाने सोमवारी दीक्षाभूमीवर आयोजित महिला परिषदेअंतर्गत ‘भारतीय संविधान आणि लोकशाहीसमोरील आव्हाने’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ता अ‍ॅड. शेळके बोलत होत्या. याप्रसंगी समितिच्या अध्यक्षा डॉ. कमलताई गवई, रेखाताई खोब्रागडे, अ‍ॅड. स्मिता कांबले, समितीच्या उपाध्यक्षा प्रा. डॉ. सरोज आगलावे, सहसचिव तक्षशिला वाघधरे, प्रा. डॉ. प्रज्ञा बागडे, डॉ. सरोज शामकुवर प्रामुख्याने उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, संविधानामुळेच प्रत्येकाला स्वातंत्र्य, समतेच्या मूल्याने हक्कांची लढाई लढता येते. धर्म स्वातंत्र्यामुळे प्रत्येकजन त्यांच्या धर्मानुसार आचरण करण्यास मोकळा आहे. त्यामुळे संविधानाचे रक्षण व सन्मान करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मात्र आज काही शक्ती संविधान हटविण्याचे षडयंत्र रचत आहेत. त्यांचा संघटीत होउन प्रतिकार करण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले.रेखा खोब्रागडे यांनी मनोगत व्यक्त करताना, संविधानाने प्रत्येक व्यक्तीला सुरक्षाकवच प्रदान केले असून त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा दर्जा वाढला असल्याचे मत व्यक्त केले. संविधानामुळेच देश एकसंघ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. काही विषमतावादी लोक संविधान बदनाम करून त्यास नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे संविधान रक्षणासाठी सर्वांनी एकत्रीत येण्याचे आवाहन प्रा. डॉ. सरोज आगलावे यांनी केले. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या तरुण कार्यकर्त्यांनी संविधान पोवाडा सादर केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तक्षीशीला वागधरे यांनी केले. संचालन वंदना जीवने यांनी तर लता गजभिये यांनी आभार मानले.आजपासून धम्मदीक्षा सोहळादीक्षाभूमीवर मंगळवारपासून धम्मदीक्षा सोहळ््याचे आयोजन करण्यात आले आहे. भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात सकाळी ९ वाजता दीक्षा सोहळा सुरू होईल. दीक्षा ग्रहण करण्यासाठी देशविदेशातून शेकडो लोक दीक्षाभूमीवर पोहचले आहेत.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीWomenमहिला